Homeडेली पल्सनक्षलवादी हिंसाचाराच्या घटनांमध्ये...

नक्षलवादी हिंसाचाराच्या घटनांमध्ये गेल्या 4 वर्षांत 36%ने घट!

नक्षली हिंसाचाराच्या घटनांमध्ये वर्ष 2018च्या आकडेवारीच्या तुलनेत 2022मध्ये 36%ची लक्षणीय घट झाली आहे. नक्षलवादी हिंसाचारात मृत्युमुखी पडणाऱ्या सुरक्षा दल आणि नागरिकांच्या संख्येत 59% घट झाली आहे. गृहराज्यमंत्री  नित्यानंद राय यांनी काल लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

नक्षली हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या नागरीक / सुरक्षा दलातील व्यक्ती यांच्या कुटुंबाला सानुग्रह मदत, सुरक्षा दलांचे प्रशिक्षण आणि कार्यान्वयन गरजा, आत्मसर्पण केलेल्या एलडब्ल्यूई कॅडरचे पुनर्वसन, समुदाय स्तरावर पहारा, सुरक्षा दलातील कर्मचारी/नागरिकांना नक्षल्यांनी केलेल्या मालमत्तेच्या नुकसानीसाठी भरपाई, इत्यादी अंतर्गत नक्षलग्रस्त राज्यांना, क्षमतावृद्धीसाठी, सुरक्षा संबंधित खर्च (एसआरई) योजनेंतर्गत निधी दिला जातो. योजनेंतर्गत वर्ष 2018-19पासून नक्षलग्रस्त राज्यांना 1648.23 कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत.

भारतीय राज्यघटनेच्या सातव्या अनुसूचीनुसार पोलीस आणि सार्वजनिक सुव्यवस्था हे विषय राज्य सरकारांकडे आहेत. तथापि नक्षलवादाने ग्रस्त राज्यांना त्यांच्या प्रयत्नांमध्ये भारत सरकार साहाय्य करते. नक्षली समस्येचे (एलडब्ल्यूई) समग्रपणे निराकरण करण्यासाठी, वर्ष 2015मध्ये राष्ट्रीय धोरण आणि कृती आराखडा मंजूर करण्यात आला. त्यात सुरक्षा संबंधित उपाय, विकास उपक्रम, स्थानिक समुदायांचे अधिकार आणि हक्क सुनिश्चित करणे इत्यादींचा समावेश असलेल्या बहुआयामी धोरणाची संकल्पना आहे.

सुरक्षेसंदर्भात केंद्र सरकार नक्षलवादाने ग्रस्त राज्य सरकारांना केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या बटालियन, प्रशिक्षण आणि सुरक्षा संबधी खर्च (एसआरई) आणि विशेष पायाभूत सुविधा योजना, यासारख्या योजनांच्या माध्यमातून निधीची तरतूद, राज्य पोलीस दलांच्या आधुनिकीकरणासाठी निधी, साधने आणि शस्त्रे, गुप्त माहितीचे आदानप्रदान, सुसज्ज पोलीस ठाण्यांचे बांधकाम अशा प्रकारचे साहाय्य करते. विकासाच्या संदर्भात, केंद्र सरकारने नक्षलग्रस्त भागात रस्ते बांधणे, मोबाईल टॉवर्स बसवणे, बँका, पोस्ट ऑफिसचे जाळे वाढवणे, आरोग्य आणि शिक्षण सुविधा यासह विविध उपाययोजना हाती घेतल्या.

विकासासंदर्भात, भारत सरकारच्या  प्रमुख योजनांसोबतच, नक्षल प्रभावित राज्यांमध्ये रस्त्यांच्या जाळ्याचा विस्तार, दूरसंचार कनेक्टिव्हिटी सुधारणे, कौशल्य विकास आणि आर्थिक समावेशन यावर विशेष भर देऊन अनेक विशिष्ट उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

Parameter/Year20182019202020212022Decrease in 2022 in comparison to 2018
Incidents(All LWE Affected States)833670665361*413*36%
148**118**
Chhattisgarh392263315188*246*22%
67**59**
Deaths(All LWE Affected States)2402021831479859%
(Civilians & Security Forces)Chhattisgarh153771111016160%

* डाव्या विचारसरणीच्या अतिरेक्यांनी घडवलेल्या घटना

** सुरक्षा दलांनी सुरू केलेल्या कारवाईच्या घटना

Continue reading

बहुभाषिक ॲक्शन चित्रपट ‘राजा शिवाजी’ महाराष्ट्रदिनी होणार प्रदर्शित!

जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनीने आज एक अत्यंत महत्वाकांक्षी घोषणा केली आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत, भव्य ऐतिहासिक ॲक्शन ड्रामा 'राजा शिवाजी' हा चित्रपट येत्या महाराष्ट्रदिनी, १ मे २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मराठी,...

पटकथेसाठीचे वनलाईनर गुंफून लिहिलेले ‘फिल्मी कथा’चे प्रकाशन

सुमारे ३० ते ३५ वनलाईनर एकत्र गुंफून अभिनेते आणि सिद्धहस्त लेखक प्रकाश राणे यांनी लिहिलेला "फिल्मी कथा" हा कथासंग्रह डिंपल प्रकाशनच्या वतीने अंधेरी येथे प्रकाशित करण्यात आला. या पुस्तकाचे प्रकाशन सुसंवादिनी मंगला खाडिलकर, निर्माती दिग्दर्शिका कांचन अधिकारी, अभिनेत्री गायिका रसिका धामणकर (अबोली मालिकेमधील...

‘कप बशी’त दिसणार पूजा सावंत आणि ऋषी मनोहर!

नवनवे प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपटसृष्टीत होत असतात. आता आगामी "कप बशी" या चित्रपटातून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवी जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. अत्यंत मजेशीर, मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उलगडणार असून सध्या मुंबईत या चित्रपटाचे चित्रिकरण...
Skip to content