Homeबॅक पेजएलटीटी रेल्वेस्थानकातही आता...

एलटीटी रेल्वेस्थानकातही आता ‘बोगी वोगी’!

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसनंतर आता मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनसवरील पहिले आणि मुंबईतील दुसऱ्या ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ चे उद्घाटन हल्दीरामच्या सहकार्याने केले. या उद्घाटनप्रसंगी मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी तसेच हल्दीरामचे संचालक नीरज अग्रवाल आदी उपस्थित होते. हे रेस्टॉरंट वापरातून काढून टाकलेल्या रेल्वे डब्यात तयार केले आहे. ज्याला बोगी वोगी, असे नाव देण्यात आले आहे.

या रेस्टॉरंटमध्ये ४० जणांना बसण्याची सोय असून प्रवाशांना शाकाहारी आणि मांसाहारी असा दोन्ही जेवणांचा आस्वाद घेता येतो. सीएसएमटीवरील रेस्टॉरंट ऑन व्हील्स सुरू झाल्यापासून आजतागायत हजारो प्रवाशांनी यामधील खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतला आहे. त्यानंतर मध्य रेल्वेने दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनसवर रेस्टॉरंट सुरू करण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर  लोकमान्य टिळक टर्मिनस येथे रेस्टोरंट ऑन व्हील्स सुरू झाले आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनसवर येथील ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ची उत्तमरीत्या रंगरंगोटी केली गेली आहे. तसेच खाद्यपदार्थाच्या किमती कंत्राटदाराने मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी विचारविनिमय करून निश्चित केल्या आहेत. १० टेबलसह ४० जणांना बसण्याची सोय करण्यात आली आहे. प्रवाशांना शाकाहारी आणि मांसाहारी असा दोन्ही जेवणांचा आस्वाद घेता येणार आहे. यापूर्वी हल्दीरामने नागपूर येथे रेस्टॉरंट ऑन व्हील्स ही संकल्पना सुरू केली होती. आता त्याचा विस्तार करण्यात आला असून एलटीटी येथे मुंबईतील दुसरे रेस्टॉरंट ऑन व्हील्स सुरू करण्यात आले आहे. येथे ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातूनसुद्धा मध्य रेल्वेचे प्रवाशी खाद्य पदार्थ ऑर्डर करू शकतात. ही सेवा प्रवाशांसाठी रात्रभर उपलब्ध राहणार आहे.

यावेळी हल्दीरामचे संचालक नीरज अग्रवाल यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दलचा उत्साह व्यक्त केला. ते म्हणाले की, हल्दीराम्समध्ये, आम्ही विशिष्ट आणि अविस्मरणीय जेवण तयार करण्यासाठी वचनबद्ध आहोत. रेल्वे-थीम असलेल्या या रेस्टॉरंटमध्ये आपण स्वादिष्ट अन्नाचा आस्वाद घेऊ शकतो तसेच या ठिकाणी आम्ही प्रवाशांना २४ तास दिवसरात्र अविरत सेवा देणार आहोत.

Continue reading

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...

१४ व १५ मे रोजी मुंबईत रंगणार अ. भा. महापौर केसरी कुस्ती स्पर्धा

बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई शहर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ३२वी अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६चे आयोजन करण्यात आले असून, देशभरातील नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही प्रतिष्ठेची स्पर्धा १४ व १५ मे २०२६...

देश चालवणे ही मोदींच्या आवाक्याबाहेरची गोष्ट!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील आवाहनांवर कडाडून टीका केली आहे. 'देश चालवणे मोदींच्या आवाक्यातली गोष्ट नाही' अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानांनी नागरिकांना सोने न खरेदी करण्याचे आणि परदेश दौरा टाळण्याचे जे आवाहन केले...
Skip to content