Homeटॉप स्टोरीमराठी भाषा गौरव...

मराठी भाषा गौरव दिनीच राज्यपालांचे हिंदीत भाषण!

मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहात नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांनी हिंदीमध्ये भाषण केले. राष्ट्रवादी काँग्रेसने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

राज्यपालांच्या भाषणाला कॅबिनेटमध्ये परवानगी दिली जाते याचा अर्थ ही परवानगी हिंदी भाषेला दिली गेली. आज मराठी भाषा दिन आहे. त्याचदिवशी हिंदीत अभिभाषण व्हावे हे दुर्दैवी आहे असे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

महाराष्ट्र आणि मुंबईच्या मातीला मराठी भाषेचा सुगंध आहे. त्या प्रांतात येऊन ती भाषा न बोलता उत्तर भारतातील हिंदी इथल्या माणसांच्या डोक्यावर बसवण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे, असा आरोपही त्यांनी केला.

हिरकणी कक्षाच्या दुरवस्थेवरून आमदार अहिरे नाराज

विधानभवनातील हिरकणी कक्षाच्या दुरवस्थेवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांनी आज तीव्र नाराजी व्यक्त केली. मी कधीही अधिवेशन बुडविले नाही. पण जर अशी सुविधा असेल तर मी इथून निघून जाईन, अशा शब्दात त्यांनी आपली उद्विग्नता व्यक्त केली.

बाळ आजारी असल्याने आपण त्यांनी तशी कल्पनाही दिली होती. त्यानंतर त्या आपल्या तान्ह्या बाळासह विधान भवनातील नव्या हिरकणी कक्षात दाखल झाल्या. पण हिरकणी कक्षात स्वच्छतागृहाची सुविधाच नव्हती. सगळीकडे धूळ असल्याने आपल्या आजारी बाळाला ठेवायचे कुठे, असा प्रश्न त्यांना पडला. या हिरकणी कक्षाचा काही उपयोग नाही. माझ्या जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मी इथे आलेले असताना मलाच सुविधा उपलब्ध होत नसेल तर जनतेला न्याय तरी कसा मिळेल, अशा भावना नंतर त्यांनी व्यक्त केल्या.

Continue reading

‘आठवणीतले बाळासाहेब’ व्याख्यानाने होणार जय महाराष्ट्र नगर व्याख्यानमालेचा शुभारंभ

यंदाचे वर्ष हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे असे आवाहन केले आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी ४४ वर्षांपूर्वी मुंबईच्या...

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...
Skip to content