Homeटॉप स्टोरीमराठी भाषा गौरव...

मराठी भाषा गौरव दिनीच राज्यपालांचे हिंदीत भाषण!

मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहात नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांनी हिंदीमध्ये भाषण केले. राष्ट्रवादी काँग्रेसने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

राज्यपालांच्या भाषणाला कॅबिनेटमध्ये परवानगी दिली जाते याचा अर्थ ही परवानगी हिंदी भाषेला दिली गेली. आज मराठी भाषा दिन आहे. त्याचदिवशी हिंदीत अभिभाषण व्हावे हे दुर्दैवी आहे असे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

महाराष्ट्र आणि मुंबईच्या मातीला मराठी भाषेचा सुगंध आहे. त्या प्रांतात येऊन ती भाषा न बोलता उत्तर भारतातील हिंदी इथल्या माणसांच्या डोक्यावर बसवण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे, असा आरोपही त्यांनी केला.

हिरकणी कक्षाच्या दुरवस्थेवरून आमदार अहिरे नाराज

विधानभवनातील हिरकणी कक्षाच्या दुरवस्थेवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांनी आज तीव्र नाराजी व्यक्त केली. मी कधीही अधिवेशन बुडविले नाही. पण जर अशी सुविधा असेल तर मी इथून निघून जाईन, अशा शब्दात त्यांनी आपली उद्विग्नता व्यक्त केली.

बाळ आजारी असल्याने आपण त्यांनी तशी कल्पनाही दिली होती. त्यानंतर त्या आपल्या तान्ह्या बाळासह विधान भवनातील नव्या हिरकणी कक्षात दाखल झाल्या. पण हिरकणी कक्षात स्वच्छतागृहाची सुविधाच नव्हती. सगळीकडे धूळ असल्याने आपल्या आजारी बाळाला ठेवायचे कुठे, असा प्रश्न त्यांना पडला. या हिरकणी कक्षाचा काही उपयोग नाही. माझ्या जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मी इथे आलेले असताना मलाच सुविधा उपलब्ध होत नसेल तर जनतेला न्याय तरी कसा मिळेल, अशा भावना नंतर त्यांनी व्यक्त केल्या.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content