Homeटॉप स्टोरीमराठी भाषा गौरव...

मराठी भाषा गौरव दिनीच राज्यपालांचे हिंदीत भाषण!

मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहात नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांनी हिंदीमध्ये भाषण केले. राष्ट्रवादी काँग्रेसने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

राज्यपालांच्या भाषणाला कॅबिनेटमध्ये परवानगी दिली जाते याचा अर्थ ही परवानगी हिंदी भाषेला दिली गेली. आज मराठी भाषा दिन आहे. त्याचदिवशी हिंदीत अभिभाषण व्हावे हे दुर्दैवी आहे असे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

महाराष्ट्र आणि मुंबईच्या मातीला मराठी भाषेचा सुगंध आहे. त्या प्रांतात येऊन ती भाषा न बोलता उत्तर भारतातील हिंदी इथल्या माणसांच्या डोक्यावर बसवण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे, असा आरोपही त्यांनी केला.

हिरकणी कक्षाच्या दुरवस्थेवरून आमदार अहिरे नाराज

विधानभवनातील हिरकणी कक्षाच्या दुरवस्थेवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांनी आज तीव्र नाराजी व्यक्त केली. मी कधीही अधिवेशन बुडविले नाही. पण जर अशी सुविधा असेल तर मी इथून निघून जाईन, अशा शब्दात त्यांनी आपली उद्विग्नता व्यक्त केली.

बाळ आजारी असल्याने आपण त्यांनी तशी कल्पनाही दिली होती. त्यानंतर त्या आपल्या तान्ह्या बाळासह विधान भवनातील नव्या हिरकणी कक्षात दाखल झाल्या. पण हिरकणी कक्षात स्वच्छतागृहाची सुविधाच नव्हती. सगळीकडे धूळ असल्याने आपल्या आजारी बाळाला ठेवायचे कुठे, असा प्रश्न त्यांना पडला. या हिरकणी कक्षाचा काही उपयोग नाही. माझ्या जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मी इथे आलेले असताना मलाच सुविधा उपलब्ध होत नसेल तर जनतेला न्याय तरी कसा मिळेल, अशा भावना नंतर त्यांनी व्यक्त केल्या.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content