Homeटॉप स्टोरीराज्यपाल भगतसिंग कोश्यारी...

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पदमुक्त! रमेश बैस यांची नेमणूक!!

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा देण्याचा मनोदय आज पूर्ण झाला. त्यांनी व्यक्त केलेली इच्छा प्रमाण मानत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदमुक्त केले आहे. त्यांच्या जागी झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची नेमणूक करण्यात आली आहे.

राष्ट्रपती मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनातून जारी केलेल्या एका आदेशाद्वारे आज 13 राज्यपाल तसेच नायब राज्यपाल यांच्या नेमणुका करण्यात आल्या. निवृत्त लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्राम पारनाईक यांची अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. लक्ष्मण प्रसाद आचार्य सिक्कीमचे राज्यपाल असतील. सी. पी. राधाकृष्णन यांची झारखंडच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली असून हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून शिवप्रताप शुक्ला काम पाहणार आहेत. गुलाबचंद कटारिया आसामचे नवे राज्यपाल असतील.

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस

निवृत्त न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर यांची आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. विश्व भूषण हरिचंदन यांची छत्तीसगडचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. याआधी ते आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून काम पाहत होते. छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसुया ओकिये यांची मणिपूरच्या राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मणिपूरचे राज्यपाल एल. ए. गणेशा यांची नागालँडचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांची मेघालयाचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांची बिहारचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल निवृत्त ब्रिगेडियर डॉ. बी. डी. मिश्रा यांची लडाखचे नायब राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

Continue reading

‘आठवणीतले बाळासाहेब’ व्याख्यानाने होणार जय महाराष्ट्र नगर व्याख्यानमालेचा शुभारंभ

यंदाचे वर्ष हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे असे आवाहन केले आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी ४४ वर्षांपूर्वी मुंबईच्या...

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...
Skip to content