Homeटॉप स्टोरीराज्यपाल भगतसिंग कोश्यारी...

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पदमुक्त! रमेश बैस यांची नेमणूक!!

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा देण्याचा मनोदय आज पूर्ण झाला. त्यांनी व्यक्त केलेली इच्छा प्रमाण मानत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदमुक्त केले आहे. त्यांच्या जागी झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची नेमणूक करण्यात आली आहे.

राष्ट्रपती मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनातून जारी केलेल्या एका आदेशाद्वारे आज 13 राज्यपाल तसेच नायब राज्यपाल यांच्या नेमणुका करण्यात आल्या. निवृत्त लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्राम पारनाईक यांची अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. लक्ष्मण प्रसाद आचार्य सिक्कीमचे राज्यपाल असतील. सी. पी. राधाकृष्णन यांची झारखंडच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली असून हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून शिवप्रताप शुक्ला काम पाहणार आहेत. गुलाबचंद कटारिया आसामचे नवे राज्यपाल असतील.

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस

निवृत्त न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर यांची आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. विश्व भूषण हरिचंदन यांची छत्तीसगडचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. याआधी ते आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून काम पाहत होते. छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसुया ओकिये यांची मणिपूरच्या राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मणिपूरचे राज्यपाल एल. ए. गणेशा यांची नागालँडचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांची मेघालयाचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांची बिहारचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल निवृत्त ब्रिगेडियर डॉ. बी. डी. मिश्रा यांची लडाखचे नायब राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content