Homeबॅक पेजलाकडाच्या वाहतुकीसाठी आता...

लाकडाच्या वाहतुकीसाठी आता ‘एक राष्ट्र-एक पास’!

देशभरात लाकूड, बांबू आणि इतर वनोपजांची विनाअडथळा वाहतूक सुलभ करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल आणि कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी काल संपूर्ण देशासाठी राष्ट्रीय मालवाहतूक परवाना प्रणालीचा (एनटीपीएस) प्रारंभ केला.

सध्या, राज्यांच्या विशेष मालवाहतूक नियमांच्या आधारे लाकूड आणि वन उत्पादनांच्या वाहतुकीसाठी मालवाहतूक परवाने दिले जातात. “एक राष्ट्र-एक पास” व्यवस्था अशी एनटीपीएसची संकल्पना आहे. त्यामुळे देशभरात विनाअडथळा मालवाहतूक शक्य होईल. व्यवसाय सुलभतेसाठी हा उपक्रम देशभरातील कृषी वनीकरणामध्ये सहभागी असलेल्या वृक्ष उत्पादकांना आणि शेतकऱ्यांसाठी एकात्मिक ऑनलाईन पद्धत  वापरून लाकूड मालवाहतूक परवानग्या जारी करणे सुलभ करेल.

राष्ट्र

यासंदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि एनटीपीएस वापरण्याची व्यवहार्यता आणि सुलभता दाखवण्यासाठी, वनोपजांची वाहतूक करणाऱ्या देशभरातील भारतीय वाहनांना भूपेंद्र यादव यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. गुजरात आणि जम्मू आणि काश्मीरमधून पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूसाठी लाकूड आणि इतर वनोपज घेऊन जाणाऱ्या दोन वाहनांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

एनटीपीएसच्या देशव्यापी अंमलबजावणीसह ही ऐतिहासिक कामगिरी आहे, असे भूपेंद्र यादव यांनी या वाहनांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केल्यांनतर सांगितले. एनटीपीएसमुळे भारताच्या विकासाची पंतप्रधान नरेंद्र मोदींची हमी दिलेल्या अधिक पारदर्शकतेच्या दिशेने प्रवास बळकट करण्यात मदत होईल, असे ते म्हणाले.

एनटीपीएस हे कृषी वनीकरण आणि जंगलाबाहेरील झाडांसाठी परिवर्तनकारी ठरेल यावर, पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी भर दिला.

वापरकर्त्यांच्या सोयीच्या दृष्टीने  एनटीपीएसची रचना करण्यात आली आहे, ज्यामध्ये सुलभ नोंदणी आणि परवाना अर्जांसाठी डेस्कटॉप आणि मोबाइल ॲप्लिकेशन्स आहेत. एनटीपीएससाठी  https://ntps.nic.in या संकेतस्थळाला भेट देता येईल.

Continue reading

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...

समाजमाध्यमांवरच्या 11 हजार संदेशांविरूद्ध निवडणूक आयोगाची कारवाई

देशातली पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुका तसेच काही ठिकाणी होत असलेल्या पोटनिवडणुका यासंदर्भात 15 मार्च 2026 रोजी घोषणा झाल्यापासून आतापर्यंत 11 हजारांपेक्षा अधिक समाजमाध्यम संदेश, यूआरएल शोधण्यात आले असून त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आशय काढून टाकणे, प्रथम माहिती अहवाल नोंदविणे, स्पष्टीकरणे आणि खंडन यांचा समावेश आहे. केंद्रीय...

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...
Skip to content