Homeपब्लिक फिगरसहकारी संस्थांच्या धर्तीवर...

सहकारी संस्थांच्या धर्तीवर महिला बचतगटांनाही कर्ज द्या!

सहकारी संस्थांना ज्याप्रमाणे शासनाकडून भागभांडवल व राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून (एनसीडीसी) कर्ज उपलब्ध करून देण्यात येते, त्याच धर्तीवर राज्यातील महिला बचतगटांनाही भागभांडवल आणि कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी आमदार गीता जैन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना ही मागणी तपासून प्रस्ताव सादर करण्यास सांगितल्याची माहिती गीता जैन यांनी दिली. राज्यातील महिला बचतगटांना महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत बँकांमार्फत अर्थसहाय्य करण्यात येते; मात्र या बचतगटांना बँकांमार्फत देण्यात येणाऱ्या कर्जाची रक्कम अतिशय कमी असते. तसेच बँका या बचतगटांना अर्थसहाय्य करण्यास फारशा उत्सुकही नसतात. महिला बचतगटांचे कार्य छोटे वाटत असले तरी महिला त्यामुळे स्वावलंबी होत असतात. साहजिकच यामुळे कुटुंबाचा, गावाचा आणि अंतिमतः देशाचा विकास होत असतो, असे त्या म्हणाळ्या.

सहकारी संस्थांना ज्याप्रमाणे शासनाकडून भागभांडवल आणि एनसीडीसीकडून कर्ज उपलब्ध करून देण्यात येते तसेच कर्ज महिला बचतगटांनादेखील उपलब्ध करून दिले पाहिजे. महिला बचतगटांचा कर्जाचा एनपीए शून्य टक्के आहे. त्यामुळे शासनाची बचतच होणार आहे. महिला बचतगटांना याप्रकारे कर्ज आणि एनसीडीसीच्या योजनांमध्ये महिला बचतगटांना आरक्षण उपलब्ध करून दिल्यास महाराष्ट्र हे तसा निर्णय घेणारे पहिलेच राज्य ठरणार असल्याचेही गीता जैन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content