Homeएनसर्कलमौनी अमवास्येनिमित्त साडेचार...

मौनी अमवास्येनिमित्त साडेचार लाख भाविकांनी केला रेल्वे प्रवास

भारतीय रेल्वेने मौनी अमावस्येनिमित्त 244 विशेष रेल्वेगाड्या चालवल्या, ज्यातून फक्त दोन आठवड्यांत साडेचार लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. 18 जानेवारीला प्रयागराजमध्ये 40 विशेष गाड्यांनी नियमित सेवांमध्ये कोणताही व्यत्यय न आणता 1 लाख प्रवाशांसाठी सेवा उपलब्ध केली.

भारतीय रेल्वेने मौनी अमावस्येच्या काळात रेल्वे वाहतुकीचे यशस्वी व्यवस्थापन केले. 3 जानेवारीपासून देशभरात 244 विशेष रेल्वेगाड्या चालवून भाविकांसाठी सुरळीत प्रवासाची खात्री केली. उत्तर रेल्वेवर 31, उत्तरमध्य रेल्वेवर 158 आणि पूर्वोत्तर रेल्वेवर 55 अशा विशेष रेल्वेगाड्यांमधून सुमारे 4.5 लाख प्रवाशांनी प्रवास केला. सणासुदीच्या काळात त्रासमुक्त आणि सुरक्षित प्रवासाची सोय व्हावी यासाठी या विशेष सेवांचे नियोजन करण्यात आले होते.

18 जानेवारीला प्रयागराजमध्ये सणासुदीच्या प्रवासाचा उच्चांक दिसून आला. उत्तर रेल्वेवर 11, उत्तरमध्य रेल्वेवर 22 तर पूर्वोत्तर रेल्वेवर 7 गाड्यांसह एकूण 40 विशेष गाड्या चालवण्यात आल्या. त्यातून अंदाजे 1 लाख प्रवाशांनी प्रवास केला. विशेष म्हणजे यावेळी सर्व नियमित गाड्या नियोजित वेळेनुसार धावल्या. या विशेष गाड्यांचे यशस्वी परिचालन सणासुदीच्या गर्दीच्या काळात प्रवाशांना सुरक्षित आणि अखंड सेवा प्रदान करण्याच्या रेल्वेच्या प्रयत्नांचे प्रतीक आहे. मोठ्या प्रमाणावरील प्रवासी वाहतूक कार्यक्षमतेने व्यवस्थापित करण्यासाठी भारतीय रेल्वे तंत्रज्ञान, संसाधन नियोजन आणि विविध विभागांमधील समन्वयाचा वापर करत आहे.

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content