Homeएनसर्कलमौनी अमवास्येनिमित्त साडेचार...

मौनी अमवास्येनिमित्त साडेचार लाख भाविकांनी केला रेल्वे प्रवास

भारतीय रेल्वेने मौनी अमावस्येनिमित्त 244 विशेष रेल्वेगाड्या चालवल्या, ज्यातून फक्त दोन आठवड्यांत साडेचार लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. 18 जानेवारीला प्रयागराजमध्ये 40 विशेष गाड्यांनी नियमित सेवांमध्ये कोणताही व्यत्यय न आणता 1 लाख प्रवाशांसाठी सेवा उपलब्ध केली.

भारतीय रेल्वेने मौनी अमावस्येच्या काळात रेल्वे वाहतुकीचे यशस्वी व्यवस्थापन केले. 3 जानेवारीपासून देशभरात 244 विशेष रेल्वेगाड्या चालवून भाविकांसाठी सुरळीत प्रवासाची खात्री केली. उत्तर रेल्वेवर 31, उत्तरमध्य रेल्वेवर 158 आणि पूर्वोत्तर रेल्वेवर 55 अशा विशेष रेल्वेगाड्यांमधून सुमारे 4.5 लाख प्रवाशांनी प्रवास केला. सणासुदीच्या काळात त्रासमुक्त आणि सुरक्षित प्रवासाची सोय व्हावी यासाठी या विशेष सेवांचे नियोजन करण्यात आले होते.

18 जानेवारीला प्रयागराजमध्ये सणासुदीच्या प्रवासाचा उच्चांक दिसून आला. उत्तर रेल्वेवर 11, उत्तरमध्य रेल्वेवर 22 तर पूर्वोत्तर रेल्वेवर 7 गाड्यांसह एकूण 40 विशेष गाड्या चालवण्यात आल्या. त्यातून अंदाजे 1 लाख प्रवाशांनी प्रवास केला. विशेष म्हणजे यावेळी सर्व नियमित गाड्या नियोजित वेळेनुसार धावल्या. या विशेष गाड्यांचे यशस्वी परिचालन सणासुदीच्या गर्दीच्या काळात प्रवाशांना सुरक्षित आणि अखंड सेवा प्रदान करण्याच्या रेल्वेच्या प्रयत्नांचे प्रतीक आहे. मोठ्या प्रमाणावरील प्रवासी वाहतूक कार्यक्षमतेने व्यवस्थापित करण्यासाठी भारतीय रेल्वे तंत्रज्ञान, संसाधन नियोजन आणि विविध विभागांमधील समन्वयाचा वापर करत आहे.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content