Homeपब्लिक फिगरसंभाजी भिडेंवर त्वरित...

संभाजी भिडेंवर त्वरित गुन्हा दाखल करा!

मनोहर ऊर्फ ​​संभाजी भिडे यांनी अमरावती येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरोधात केलेल्या निंदनीय वक्तव्याच्या निषेधार्थ आज उत्तर-मध्य मुंबई महिला जिल्हा व चांदिवली महिला काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष मो. आरिफ (नसीम) खान यांच्या नेतृत्त्वाखाली चांदिवली मतदारसंघात विरोध प्रदर्शन करण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधीं व इतर महापुरुषांच्या विरोधात सातत्याने वादग्रस्त विधाने करणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी नसीम खान यांनी यावेळी केली.

यावेळी मुंबई महिला अध्यक्ष अनिशा बागुल, मुंबई सेवादल अध्यक्ष सतीश मनचंदा, मुंबई उपाध्यक्ष शरीफ खान, महासचिव प्रभाकर जावकर, उत्तर-मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष जगदीश आमिन, महिला जिल्हाध्यक्ष प्रियतमा सावंत, उत्तर भारतीय सेल जिल्हाध्यक्ष भरत सिंह, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष भालेराव, जिल्हा कार्याध्यक्ष अरशद आजमी, माजी नगरसेवक अशरफ आजमी, दिलशाद आजमी, शरद पवार, सविता पवार, मसुद अंसारी यांच्यासह प्रदेश प्रतिनिधी गौस शेख, गणेश चव्हाण, महिला तालुकाध्यक्ष माया खोत, वजीर मुल्ला यांच्यासह चांदिवली, कुर्ला आणि कलिना विधानसभेतील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content