Homeन्यूज अँड व्ह्यूजदरवर्षी दीड लाखांहून...

दरवर्षी दीड लाखांहून अधिकांचा रस्ते अपघातात मृत्यू!

2021 वर्षासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिस विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, देशातील रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या 1,53,972 आणि गंभीररीत्या जखमी झालेल्यांची संख्या 1,72,278 इतकी होती. डीआयएमटीएस ने TRIPP-IIT दिल्लीच्या सहकार्याने “भारतातील रस्ते अपघाताची सामाजिक-आर्थिक किंमत” यावर केलेल्या संशोधनाच्या अहवालानुसार, रस्ते अपघातांची सामाजिक-आर्थिक किंमत देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या सुमारे 3.14% आहे.

शिक्षण, अभियांत्रिकी (रस्ते आणि वाहने दोन्ही), अंमलबजावणी आणि आपत्कालीन सेवा यावर आधारित रस्ते सुरक्षेची समस्या सोडवण्यासाठी मंत्रालयाने बहु-आयामी धोरण आखले असून त्यानुसार विविध उपक्रम हाती घेतले आहेत.

त्याबाबत अधिक माहिती खालीलप्रमाणे:

  • रस्ते सुरक्षेबाबत प्रभावीपणे जनजागृती करण्यासाठी मंत्रालयाने सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक  आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रचार आणि जनजागृती मोहीमा राबवल्या. तसेच जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि रस्ते सुरक्षा बळकट करण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा माह /सप्ताह पाळणे.
  • मंत्रालयाअंतर्गत सर्व रस्ते एजन्सीच्या अधीक्षक अभियंता किंवा समकक्ष स्तरापर्यंतच्या तांत्रिक अधिकार्‍यांसाठी रस्ते सुरक्षा लेखापरीक्षक अभ्यासक्रम अनिवार्य करण्यात आला आहे.
  • तसेच नियोजनाच्या टप्प्यावर रस्ते सुरक्षा हा रस्त्यांच्या रचनेचा अविभाज्य भाग बनवण्यात आला आहे. सर्व राष्ट्रीय महामार्गांचे रचना, बांधकाम, परिचालन आणि देखभाल या सर्व टप्प्यांवर थर्ड पार्टी ऑडिटर्स/तज्ज्ञांमार्फत रस्ते सुरक्षा लेखापरीक्षण बंधनकारक करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्गांवर ब्लॅक स्पॉट्स/अपघातप्रवण क्षेत्रे ओळखणे आणि ती दुरुस्त करण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे.
  • मंत्रालयाच्या अंतर्गत आदर्श सुरक्षित रस्ते म्हणून विकसित करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील 130 मार्ग निवडण्यात आले आहेत.
  • मंत्रालयाने वाहनातील पुढील सीटवर चालकाच्या शेजारी बसलेल्या प्रवाशासाठी एअरबॅगची अनिवार्य तरतूद अधिसूचित केली आहे. त्याचबरोबर 15 फेब्रुवारी 2022 च्या अधिसूचनेद्वारे मोटारसायकल चालवताना किंवा त्यावरून नेताना चार वर्षांखालील मुलांसाठी सुरक्षा उपायांशी संबंधित निकष निर्धारित केले आहेत. तसेच सेफ्टी हार्नेस, क्रॅश हेल्मेटचा वापर करण्याची सूचना केली असून वेग मर्यादा ताशी 40 किमी निश्चित केली आहे. 
  • वर्ष 2016-2018 च्या आकडेवारीच्या आधारे महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावरील ब्लॅक स्पॉटची संख्या 25 इतकी आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Continue reading

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...
Skip to content