Homeमुंबई स्पेशलआनंद लुटा फळाफुलांच्या...

आनंद लुटा फळाफुलांच्या प्रदर्शनाचा एरोप्लेन गार्डनमध्ये!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांनी पश्चिम उपनगरातल्या सांताक्रूज पश्चिम येथील जुहू लायन्स म्युनिसिपल पार्क अर्थात एरोप्लेन गार्डन येथे फळे फुले भाज्यांचे प्रदर्शन आयोजित केले आहे.

गुलाब, झेंडू ,झिनीया, शेवंती, विविध प्रकारच्या ऑर्किड यांचे मिळून सुंदर देखावे याठिकाणी तयार करण्यात आले आहेत. यात विविध रंगांच्या फुलांच्या सजावटीसोबत प्रत्येक रंगाचा आपल्या आयुष्यात असलेला अर्थ स्पष्ट केला आहे. ‘चला जगूया रंग आयुष्याचे’ या संकल्पनेवर आधारित विविध फुलांच्या मदतीने इंद्रधनुष्य तयार करण्यात आलेला आहे. त्यातले विविध रंग, आपल्या जीवनात असलेले महत्त्व असा प्रदर्शनाचा आशय आहे. लाल रंग प्रेम दर्शवतो. हिरवा रंग सृष्टी आणि त्याची वाढ दर्शवतो. पिवळ्या रंग आनंद, नारंगी रंग नवनिर्मिती असे विविध रंग त्याचे अर्थ आणि त्या रंगांच्या फुलांनी निर्माण केलेल्या कलाकृती याठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत.

आनंद, आशा, अपेक्षा, ज्ञान, योग, अध्यात्मिकता, प्रेम, विश्वास अशा विविध मानवी भावना दर्शवणारे रंग आणि त्यांची फुलं यांचा मिळून आकर्षक देखावे तयार करण्यात आले आहेत. फळे, फुले, भाज्या, आयुर्वेदिक वनस्पती, हंगामी फुलझाडे या सर्वांनी युक्त हे प्रदर्शन नागरिकांसाठी आज, रविवार सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत व उद्या, सोमवारी सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत विनामूल्य खुले राहणार आहे.

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content