Homeटॉप स्टोरीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ...

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि यापुढेही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच राहतील, असे स्पष्ट विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आपल्या सहकाऱ्यांसह सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर काही दिवसातच अजित पवार मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा काही जणांकडून केली जात आहे. अजित पवार यांचा नुकताच वाढदिवस झाला. यानिमित्ताने त्यांचे सहकारी आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत अजितदादा लवकरच मुख्यमंत्री होतील असे सूचित केले. आज सकाळीच काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील असा दावा केला. येत्या काही दिवसांतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरतील. त्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा निर्णय घेतला जाईल, असे चव्हाण म्हणाले.

शिंदे

हा धागा पकडून उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हल्ली काहीजण राजकीय भविष्यवेत्ते झाले आहेत. परंतु तसे काहीही होणार नाही. येत्या नऊ तारखेलाही नाही, दहा तारखेलाही नाही आणि अकरा तारखेलाही नाही. महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहतील. मुख्यमंत्री बदलला जाणार नाही. पण झाला तर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि तेही मुख्यमंत्री शिंदे ठरवतील. महायुतीतल्या एका मोठ्या पक्षाचा नेता म्हणून मी हे सांगतो.

महायुती निर्माण करतानाच अजित पवार यांना ते कोणत्या पदावर असणार आहेत, याची कल्पना दिलेली आहे आणि ते त्यांनाही माहित आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मी तसेच अजित पवार या तिन्ही पक्षांच्या नेत्यांना कोण काय असणार आहे माहित आहे आमच्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. मात्र महायुतीतले काहीजण उगाचच संभ्रम निर्माण करण्याचे काम करतात. विरोधी पक्षातले नेतेही तसाच प्रयत्न करतात. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश येणार नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content