Homeटॉप स्टोरीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ...

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि यापुढेही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच राहतील, असे स्पष्ट विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आपल्या सहकाऱ्यांसह सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर काही दिवसातच अजित पवार मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा काही जणांकडून केली जात आहे. अजित पवार यांचा नुकताच वाढदिवस झाला. यानिमित्ताने त्यांचे सहकारी आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत अजितदादा लवकरच मुख्यमंत्री होतील असे सूचित केले. आज सकाळीच काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील असा दावा केला. येत्या काही दिवसांतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरतील. त्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा निर्णय घेतला जाईल, असे चव्हाण म्हणाले.

शिंदे

हा धागा पकडून उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हल्ली काहीजण राजकीय भविष्यवेत्ते झाले आहेत. परंतु तसे काहीही होणार नाही. येत्या नऊ तारखेलाही नाही, दहा तारखेलाही नाही आणि अकरा तारखेलाही नाही. महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहतील. मुख्यमंत्री बदलला जाणार नाही. पण झाला तर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि तेही मुख्यमंत्री शिंदे ठरवतील. महायुतीतल्या एका मोठ्या पक्षाचा नेता म्हणून मी हे सांगतो.

महायुती निर्माण करतानाच अजित पवार यांना ते कोणत्या पदावर असणार आहेत, याची कल्पना दिलेली आहे आणि ते त्यांनाही माहित आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मी तसेच अजित पवार या तिन्ही पक्षांच्या नेत्यांना कोण काय असणार आहे माहित आहे आमच्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. मात्र महायुतीतले काहीजण उगाचच संभ्रम निर्माण करण्याचे काम करतात. विरोधी पक्षातले नेतेही तसाच प्रयत्न करतात. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश येणार नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content