Homeन्यूज ॲट अ ग्लांसमहाराष्ट्रात कोरडे हवामान...

महाराष्ट्रात कोरडे हवामान सुरू!

आयएमडी बुलेटिननुसार, ओदिशा आणि छत्तीसगडच्या काही भागांमधून आणि ईशान्येकडील राज्यांच्या उर्वरित भागातूनही मान्सून माघारला आहे. आतापर्यंत देशाच्या एकूण परतीच्या क्षेत्रापैकी 85 टक्के भागातून मान्सून परतलेला आहे. पुढील 2 दिवसांत देशाच्या उर्वरित भागातून मान्सून परतण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. महाराष्ट्रातून मान्सून परतल्यानंतर राज्यात कोरडे हवामान सुरू झाल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. मान्सून माघारी जाताच राज्यातील तापमानात वाढ होऊ लागली आहे. गडचिरोली वगळता महाराष्ट्राला मान्सूनने गुडबाय केले असून देशभरातून उद्या, 16 ऑक्टोबरपर्यंत मान्सूनची माघार जवळजवळ निश्चित मानली जाते.

यंदा तब्बल साडेचार महिने बरसत राहिलेल्या नैऋत्य मान्सूनने अखेर गडचिरोली वगळता संपूर्ण महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) अधिकृतरित्या ही घोषणा केली आहे. आतापर्यंत कारवार, कलबुर्गी, निजामाबाद, कांकेर, चांदबलीच्या रेषेतील वरच्या संपूर्ण भागातून मान्सून परतला आहे. गडचिरोलीसह संपूर्ण देशभरातून 16 ऑक्टोबरपर्यंत मान्सूनची माघार घेतली जाईल, अशी शक्यता आयएमडीने वर्तविली आहे. दरवर्षी साधारणत: 15 ऑक्टोबरच्या दरम्यान संपूर्ण देशातून मान्सून माघार घेतो.

काही प्रदेशात ईशान्य मान्सून पावसाळी गतिविधी

दुसरीकडे, दक्षिण द्वीपकल्पीय भारत तसेच दक्षिण आणि लगतच्या मध्य बंगालच्या उपसागरावर पूर्वेकडील आणि ईशान्येकडील वारे वाहत आहेत. या कालावधीत आग्नेय द्वीपकल्पीय प्रदेशात ईशान्य मान्सून पावसाळी गतिविधी सुरू होण्याची शक्यता आहे.

येत्या काही दिवसात विदर्भात पावसाची शक्यता

ईशान्य मान्सून पावसाळी गतिविधीमुळे दक्षिणेसह देशातील काही भागात पाऊस सुरू राहणार आहे. महाराष्ट्रात उकाडा वाढत असताना तामिळनाडूच्या वरच्या बाजूला दोन सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाली आहेत. हे वारे महाराष्ट्राच्या दिशेने येणार असल्याने महाराष्ट्रात पुढील 2-3 पावसाची शक्यता राहू शकते. हा पाऊस मुख्यत: विदर्भ आणि लगतच्या मराठवाड्यातील काही भागात राहील. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पाऊस राहू शकेल. अर्थात, हा अतिशय हलका ते तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस राहणार असल्याने विशेष काळजीचे काही कारण नाही. याशिवाय, नरक चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रातील काही भागात ढगाळ वातावरण राहण्याचीही शक्यता आहे.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content