Homeटॉप स्टोरीबिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात...

बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करा!

राज्यातील विविध समाजाचे आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित असताना जातनिहाय जनगणना हाच एक उपाय आहे. त्यामुळे बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करावी आणि याचा कालबध्द कार्यक्रम महायुती सरकारने जाहीर करावा, अशी आग्रही मागणी राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज केली.

जातनिहाय जनगणना करून सर्व माहिती लोकांसमोर मांडल्याबद्दल बिहार सरकारचे अभिनंदन करत वडेट्टीवार म्हणाले की, राहुल गांधी सातत्याने जातीनिहाय जनगणना करावी अशी मागणी करत आहेत. मात्र हे सरकार त्यापासून पळ काढत आहे. या सरकारला पळ काढण्याचे कारण काय? हिंदुत्वाचे राजकारण करताना देशात ओबीसी हिंदू नाहीत का? त्यांना आरक्षण मिळायला नको का? त्यातूनही हे सरकर पळ काढत असेल तर ते दुर्दैव आहे.

काँग्रेसच्या काळात २०११ साली जातनिहाय जनगणना झाली होती. या जनगणनेमध्ये प्रत्येक जातीचा डेटा गोळा केलेला आहे. ती माहिती उघड करावी ही मागणी राहुल गांधी यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांतील आरक्षण कायम राहावे म्हणून ही भूमिका मांडली. मात्र त्यातही सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

एकाबाजूला ओबीसी जनजागरण यात्रा काढायची आणि दुसरीकडे या मूलभूत प्रश्नाला बगल द्यायची अशी दुट्टप्पी भूमिका सरकार घेत असून ओबीसींना हक्कापासून वंचित ठेवायचे महापाप हे सरकार करत आहे. जातनिहाय जनगणना करताना संघ आडवा येतो का? असा सवाल करत मनुवादी विचाराने तुम्ही सरकार चालवणार का? अशी विचारणा वडेट्टीवार यांनी केली. राज्यात विविध समाजाचे आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यावर एकच उपाय जातनिहाय जनगणना हीच आहे. बहुजनांच्या हिताचा विचार करून न्याय देणार का, असेही ते म्हणाले.

इंडिया आघाडीने केले शक्तीप्रदर्शन

दरम्यान, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत इंडिया आघाडीने आज दुपारी ‘मी पण गांधी’ ही पदयात्रा आयोजित केली होती. फॅशन स्ट्रीटजवळ ही पदयात्रा पोहोचल्यानंतर तिथे पोलिसांनी पदयात्रा रोखली. त्यानंतर पोलीस आणि इंडिया आघाडीतल्या पक्षांचे कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली. काँग्रेस, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी आणि कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते आणि काही नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी पोलीस आणि इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. यावेळी पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स तोडून आघाडीचे कार्यकर्ते आणि नेते पुढे चालू लागले. काही जणांनी तेथेच बसकण मारली. म. गांधींचा पुतळाही यावेळी समोर ठेवण्यात आला होता. या आंदोलनात सुरूवातीच्या टप्प्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाचा एकही नेता नजरेस पडला नाही. सर्व बाजूंनी टीका होऊ लागल्यावर नंतर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आपल्या समर्थकांसह दाखल झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

आघाडीचे कार्यकर्ते फॅशन स्ट्रीटजवळच्या म. गांधींच्या पुतळ्याजवळ पोहोचण्याचा प्रयत्न केला. इंडिया आघाडीने दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमा ते महात्मा गांधी पुतळा अशी पदयात्रा काढण्याची परवानगी मागितली होती. परंतु, हे शांतता क्षेत्र असल्याने तसेच उच्च न्यायालयाचे निर्बंध असल्याचे कारण देत या पदयात्रेला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतर पोलिसांनी रीगल सिनेमा ते गांधी पुतळा या मार्गाने पदयात्रेची परवानगी दिली. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, माजी खासदार संजय निरुपम या पदयात्रेत सहभागी झाले होते.

या पदयात्रेवरील कारवाईनंतर आमदार वर्षा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त इंडिया आघाडीने शांततेच्या मार्गाने पदयात्रा काढली होती. प्रेम आणि सौहार्दाचा संदेश देणं हा या पदयात्रेचा एकमेव उद्देश होता. परतु, गांधी जयंतीच्या दिवशीच आमच्या पदयात्रेवर कारवाई करण्यात आली. आमची पदयात्रा रोखण्याचा प्रयत्न झाला. नथुराम गोडसेचे पुजारी गांधीजींचा आवाज दाबू शकत नाहीत, असे त्या म्हणाल्या.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content