7 ते 15 वर्षांची मुले करू शकतील मोफत आधार अपडेट

जनहिताचा निर्णय म्हणून भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने 7 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी अनिवार्य असलेल्या बायोमेट्रिक अपडेटचे सर्व शुल्क माफ केले आहे. या निर्णयामुळे जवळजवळ 6 कोटी मुलांना त्यांचे आधार कार्डाचे विनामूल्य बायोमेट्रिक अपडेट करता येतील. 1 ऑक्टोबर 2025पासून शुल्कमाफीचे हे नियम लागू झाले असून ते पुढील एक वर्षासाठी अंमलात राहतील.

पाच वर्षांखालील मुलांचा आधार नोंदणी करताना फक्त छायाचित्र, नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता आणि जन्मप्रमाणपत्र घेतले जाते. या वयात मुलांचे बोटांचे ठसे आणि डोळ्यांचे (आयरिस) बायोमेट्रिक परिपक्व नसल्याने त्यांची नोंद घेतली जात नाही. सध्याच्या नियमांनुसार, मुलगा किंवा मुलगी पाच वर्षांचा झाल्यावर त्याचे किंवा तिचे बोटांचे ठसे, आयरिस आणि छायाचित्र अद्ययावत करणे बंधनकारक असते. याला पहिले अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट असे म्हटले जाते. तसेच मुलगा किंवा मुलगी 15 वर्षांचा झाल्यावर पुन्हा एकदा बायोमेट्रिक अद्ययावत करणे आवश्यक असते, ज्याला दुसरे अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट म्हटले जाते. पहिला आणि दुसरा अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट अनुक्रमे 5 ते 7 आणि 15 ते 17 वर्षे वयोगटात केल्यास त्यासाठी शुल्क आकारले जात नाही. त्यानंतर प्रत्येक अनिवार्य बायोमेट्रिक अपडेटसाठी 125 रुपये शुल्क आकारले जाते. या नव्या निर्णयामुळे आता 5 ते 17 वयोगटातील सर्व मुलांसाठी अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट वर्षासाठी मोफत झाले आहे.

अद्ययावत बायोमेट्रिक असलेल्या आधारमुळे मुलांचे दैनंदिन जीवन सुलभ होते. शाळेत प्रवेश, प्रवेश परीक्षांसाठी नोंदणी, शिष्यवृत्ती आणि थेट बँक खात्यात पैसे जमा (थेट लाभ हस्तांतरण), योजनांचा लाभ घेणे यांसारख्या सेवांचा अखंडित वापर करता येतो. आईवडील किंवा पालकांनी आपल्या मुलांचे किंवा पाल्यांचे आधार बायोमेट्रिक तातडीने अद्ययावत करावेत, असे आवाहन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.

Continue reading

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...

आता फक्त २०० रुपयात करा कुटुंबातच होणाऱ्या वाटणीची मोजणी!

राज्यशासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत जमीन मोजणीच्या शुल्क आणि प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, आता कुटुंबातच होणाऱ्या संमतीच्या किंवा कोर्टाच्या वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपये प्रति पोटहिस्सा या नाममात्र शुल्कात केली...
Skip to content