Homeबॅक पेजबेघरांकडे मुख्यमंत्री आणि...

बेघरांकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे!

मुंबईतील पदपथावर राहणाऱ्या बेघरांच्या हक्कांसाठी राज्यशासनाने विविध योजनांची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे. शासनाच्या योजनां यशस्वी करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्यास उद्दिष्ट पूर्ण होईल आणि प्रश्न कायमस्वरुपी सुटतील, असे प्रतिपादन आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी नुकतेच केले.

जागतिक बेघर दिवस निमित्ताने मुंबईतील पहचान संस्थेच्या पुढाकाराने वरळी येथे बेघरांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष आणि राज्य निवारा सनियंत्रण समितीचे सदस्य ब्रिजेश आर्य यांनी याकरीता पुढाकार घेतला होता.

सततच्या पाठपुराव्यानंतर आता मुंबई महापालिकेने बेघरांसाठी प्रशिक्षण आणि निवारा देण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्वांना हक्काची घरे मिळाल्यास प्रश्न मार्गी लागतील, असे गलगली यांनी सांगितले.

ब्रिजेश आर्य म्हणाले की, समस्या फार आहेत आणि आता सकारात्मक बदल दिसून येत आहेत. निवडणूक आयोग, कॅनरा बँक, तहसीलदार आणि शिधावाटप अधिकारी यांच्या सहकार्याने बेघरांना मदत मिळत आहे. 2011च्या लोकसंख्या गणनेनुसार मुंबईत 57, 416 इतके बेघर आहेत. मुंबईत 125 निवारा केंद्रांची आवश्यकता असून सध्या केवळ 25 निवारा केंद्रं आहेत.

यावेळी सुभाष रोकडे, रेखा खारवी, शांताबाई सोनटक्का, पूजा वाघरी, गीता खारवी, भारती भोजया, संजना, मंदा जोशी, सुनिता कांबळे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या एसआयपी स्वयंसेवकांपैकी मीनाक्षी बिपीन, बीनी कोचर, महक वाधवा, स्नेहा सायजी, रेचल, ऐमिनी मॅथ्यू, विश्वजीत ध्रुवशाह आदी उपस्थित होते.

Continue reading

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...

१४ व १५ मे रोजी मुंबईत रंगणार अ. भा. महापौर केसरी कुस्ती स्पर्धा

बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई शहर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ३२वी अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६चे आयोजन करण्यात आले असून, देशभरातील नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही प्रतिष्ठेची स्पर्धा १४ व १५ मे २०२६...

देश चालवणे ही मोदींच्या आवाक्याबाहेरची गोष्ट!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील आवाहनांवर कडाडून टीका केली आहे. 'देश चालवणे मोदींच्या आवाक्यातली गोष्ट नाही' अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानांनी नागरिकांना सोने न खरेदी करण्याचे आणि परदेश दौरा टाळण्याचे जे आवाहन केले...
Skip to content