Homeकल्चर +‘छपाई ते लेखणी’चे...

‘छपाई ते लेखणी’चे शानदार प्रकाशन!

मराठे उद्योग समुहातील तिसऱ्या पिढीचे उद्योजक यशवंत मराठे यांनी लिहिलेले ‘छपाई ते लेखणी’ हे पुस्तक म्हणजे सहज आणि सोप्या पद्धतीने वाचकांशी सुसंवाद साधणारे आहे. लेखनशैली अत्यंत पारदर्शक आहे. लेखक आपल्याशी गप्पा मारतोय असे वाटते. तसेच काही महत्त्वाच्या विषयांना हात घालण्याचे धाडस दिसून येते. असेच लिखाण वाचकांना भावते, असे विचार सुप्रसिद्ध लेखक आणि उद्योजक जयराज साळगावकर यांनी व्यक्त केले.

उद्योजक यशवंत मराठे यांनी व्यावसायिक कार्य सांभाळत आपल्यातील साहित्यिक गुणांना वाव देत `सरमिसळ’ नावाचे स्फूटलेखन केले. यात इतिहास, संस्कृती, चालू घडामोडी, तत्त्वज्ञान, आठवणी, व्यक्तिचित्रणे, प्रवास वर्णने, बालपणाच्या आठवणी अशा अनेकविध विषयांना समाविष्ट केले आहे. त्याच्या एकत्रित संकलनातून `छपाई ते लेखणी’ हे पुस्तक ग्रंथालीने प्रकाशित केले असून त्याचे शानदार प्रकाशन प्रभादेवी येथील मराठे उद्योग भवनात जयराज साळगावकर, ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

`छपाई ते लेखणी’ ही साहित्यकृती नव-सृजन या निकषात बसणारी आहे. व्यक्तिचित्रणे हा या पुस्तकातील एक अत्यंत तरल आणि मनोज्ञ असा भाग आहे. प्रत्येक लेख हा वास्तववादी आणि अभ्यासपूर्ण असून लेखकाची चिकित्सक वृत्ती त्यातून दिसून येते, असे विचार सुधीर जोगळेकर यांनी व्यक्त केले.

उद्योगपती ते सामाजिक कार्य ते आता हौशी लेखक असा हा प्रवास आहे. सच्चेपणाने लिहिणे हे माझे ब्रीदवाक्य आहे. मनातील विचार कागदावर उतरवून मन हलके करत असतानाच ते कधी साहित्यात आणि पुस्तकरुपाने परावर्तित झाले, हे समजलेच नाही. त्यामुळे हे सारे काही नकळत आणि उत्सफूर्तपणे होत गेले, असे विचार लेखक यशवंत मराठे यांनी व्यक्त केले.

उत्तम साहित्यकृती प्रकाशित करणे हे ग्रंथालीचे वैशिष्ट्य असून यशस्वी उद्योजकाचे चौफेर लेखन असे या पुस्तकाचे वर्णन करता येईल. हे साहित्य वाचकांपुढे सादर करून एक उत्तम साहित्यकृती वाचल्याचा अनुभव त्यांना नक्कीच येईल, असा विश्वास ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूर यांनी व्यक्त केला.

Continue reading

दुसऱ्यांच्या घरी धुणी-भांडी करणारी महिला झाली आमदार!

जिद्द, चिकाटी आणि लोकशाहीवरचा विश्वास असेल, तर एखादी सामान्य व्यक्ती किती मोठी झेप घेऊ शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे कलिता माजी. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात अनेक दिग्गजांचा पराभव झाला असला, तरी औसग्राम विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेल्या...

इराणने युद्धविराम तोडला!

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला युद्धविराम आज अखेर इराणने तोडला. इराणने आज होर्मूझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदीला असलेल्या अमेरिकेच्या युद्धनौकेवरच हल्ला केल्याचे वृत्त आहे. अमेरिकेची ही युद्धनौका इराणच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला असता इराणने या...

‘जीनोम सिक्वेन्सिंग’मुळेच रत्नागिरीतला हापूस पोहोचला सातासमुद्रापार!

जगप्रसिद्ध जीनोम शास्त्रज्ञ जे. क्रेग वेंटर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ जागतिक विज्ञान क्षेत्राचीच हानी झाली नाही, तर कोकणच्या आणि पर्यायाने भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेला 'डिजिटल' ताकद देणारा एक आधारवड हरपला आहे. वेंटर यांनी विकसित केलेल्या जीनोम सिक्वेन्सिंग...
Skip to content