Homeब्लॅक अँड व्हाईटकेंद्र सरकार ‘भारत...

केंद्र सरकार ‘भारत आटा’ प्रति किलो ₹ 27.50 दराला करणार उपलब्ध!

गहू आणि गव्हाची कणीक किफायतशीर दराला उपलब्ध व्हावी, याकरता केंद्रीय भांडार, नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनसीसीएफ), अर्थात भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघटना, आणि नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनएएफईडी), अर्थात भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघटना (नाफेड), यासारख्या निमशासकीय आणि सहकारी संस्थांना खुल्या बाजारात विक्री योजने [OMSS(D)] अंतर्गत, गहू खरेदी करून, त्याची कणीक, प्रति किलो रु. 27.50 इतक्या कमाल किरकोळ दरापर्यंत ‘भारत आटा’ ब्रँड अंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करण्याकरीता, 2.5 लाख मेट्रिक टन गहू, प्रति किलो रु.21.50 दराने वितरित करण्यात आला आहे. सर्वसामान्य नागरिकांना केंद्रीय भांडार, नाफेड, एनसीसीएफ आणि राज्य सरकारांच्या सहकारी संस्थांच्या प्रत्यक्ष अथवा फिरत्या विक्री केंद्रांवर किफायतशीर दराने गव्हाची कणीक उपलब्ध व्हावी, हे यामागचे उद्दिष्ट आहे.

या संस्थांद्वारे भारत आटा ₹ 27.50/Kg पेक्षा जास्त नसलेल्या किमान किरकोळ दराला विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल, जो कणकेच्या अखिल भारतीय सरासरी किरकोळ किमतींपेक्षा कमी आहे. केंद्र सरकारच्या गोदामात 16 नोव्हेंबर 2023 पर्यंत 209.85 लाख मेट्रिक टन इतका गव्हाचा साठा होता.

भारत सरकार केंद्रीय/राज्य सहकारी संस्थांच्या देशभरातली प्रत्यक्ष/फिरत्या किरकोळ विक्री केंद्रांच्या माध्यमातून, प्रक्रिया करण्याकरता आणि कणीक बनवून विक्री करण्याकरता गहू उपलब्ध करणार आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Continue reading

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...

समाजमाध्यमांवरच्या 11 हजार संदेशांविरूद्ध निवडणूक आयोगाची कारवाई

देशातली पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुका तसेच काही ठिकाणी होत असलेल्या पोटनिवडणुका यासंदर्भात 15 मार्च 2026 रोजी घोषणा झाल्यापासून आतापर्यंत 11 हजारांपेक्षा अधिक समाजमाध्यम संदेश, यूआरएल शोधण्यात आले असून त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आशय काढून टाकणे, प्रथम माहिती अहवाल नोंदविणे, स्पष्टीकरणे आणि खंडन यांचा समावेश आहे. केंद्रीय...

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...
Skip to content