हरारे येथे झालेल्या १९ वर्षांखालील युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या भारतीय संघाने इंग्लंडचा १०० धावांनी पराभव करून जेतेपदाचा शानदार षटकार ठोकला. उभय संघात २०२२मध्येदेखील अंतिम फेरीत लढत झाली होती. त्यावेळीदेखील भारतीय युवा संघच सरस ठरला होता. त्याच विजयाची पुनरावृत्ती भारतीय संघाने ४ वर्षांनतर पुन्हा हरारेत करुन दाखवली. गतवेळचा पराभवाचा बदला इंग्लंड संघाला घेता आला नाही. कारण भारतीय संघाने त्यांना तशी संधीच दिली नाही. सामन्यातील महत्त्वाची नाणेफेक भारताने जिंकून इंग्लंडसमोर विजयासाठी ४१२ धावांचे अशक्यप्राय लक्ष्य ठेवले. भारताचा युवा धडाकेबाज फलंदाज, अवघ्या १४ वर्षीय वैभव सुर्यवंशीने ८० चेंडुत १५ चौकार...
भारतात पर्यटन क्षेत्र वेगाने वृद्धींगत होत आहे. इतकेच नव्हे तर, देशातील आर्थिक वृद्धी व गुंतवणूक संधींना पर्यटन उद्योगामुळे प्रचंड चालना मिळत आहे. भारतातील समृद्ध संस्कृती, इतिहास आणि नैसर्गिक सौंदर्य जगभरातील पर्यटकांना आकर्षित करत आहे. सरकारी उपक्रम, तंत्रज्ञानातील प्रगती आणि ग्राहकांच्या आवडीनिवडींमधील बदल यामुळे पर्यटन उद्योगक्षेत्रात लक्षणीय परिवर्तन घडून येत असून, त्यामुळे या उद्योगाकडे अनेक गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले जात आहे.
२०१९मध्ये प्रवास आणि पर्यटनावर १४० बिलियन डॉलर्स खर्च केले गेले होते. २०३० सालापर्यंत ही रक्कम ४०६ बिलियन डॉलर्सपर्यंत वाढेल अशी अपेक्षा आहे. स्मार्ट शहरे विकसित करणे आणि वाहतुकीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासारख्या पर्यटनाच्या पायाभूत सोयीसुविधांमध्ये प्रगती घडवून आणण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे या वाढीला चालना मिळत आहे.
टाटा ऍसेट मॅनेजमेंटचे प्रॉडक्ट्स विभागाच्या प्रमुख शेली गंग सांगतात की, मूलभूत गरजांव्यतिरिक्त इतरत्र खर्च करण्यायोग्य उत्पन्नात होत असलेली वाढ आणि मध्यमवर्गीयांची वाढती लोकसंख्या यामुळे प्रवास व फुरसतीच्या वेळेवर खर्च करणाऱ्या भारतीयांची संख्यादेखील वाढत आहे. अनुभव घेण्यासाठी प्रवास करणाऱ्या मिलेनियल्सच्या वाढत्या लोकसंख्येमुळे या ट्रेंडला अजून जास्त चालना मिळत आहे. भारतात एकूण पर्यटनापैकी ९९% देशांतर्गत पर्यटन आहे.
टाटा ऍसेट मॅनेजमेंट कंपनीने नुकताच देशातील पहिला 'टाटा निफ्टी इंडिया टुरिजम इंडेक्स फंड' आणला आणि गुंतवणूकदारांना भारतातील वेगाने वृद्धींगत होत असलेल्या प्रवास, पर्यटन व हॉस्पिटॅलिटी व्यवसायांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करवून दिली. हा फंड देशांतर्गत पर्यटनाशी संबंधित आहे, ज्याची देशातील एकूण पर्यटनातील हिस्सेदारी ९९% आहे. परदेशात प्रवास करणाऱ्या तसेच भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या त्यांच्या मानाने खूपच कमी आहे.
खूप मोठ्या लोकसंख्येची आर्थिक क्षमता वाढत असणे ही पर्यटन क्षेत्राच्या वृद्धीसाठी एक लक्षणीय संधी आहे. बजेटमध्ये सहज बसतील, भरपूर अनुभव मिळवून देतील अशी आरामदायी ठिकाणे, थेट विमानसेवेची आणि शिथिल व्हिजा नियमांची सुविधा यांचा भारतीय प्रवासी मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहेत. भारतातील समृद्ध संस्कृती व परंपरा, ऐतिहासिक ठिकाणे आणि वैविध्यपूर्ण निसर्गरम्य दृश्ये यामुळे दरवर्षी हजारो पर्यटक आकर्षित होतात. जादुई हिमालयापासून मनमोहक समुद्रकिनाऱ्यांपर्यंत, डोळे दिपवून टाकणाऱ्या सणांपासून ते जगप्रसिद्ध स्मारकांपर्यंत अनेक वेगवेगळी आकर्षणे भारतात आहेत. भारतातील विविधता भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करते, पर्यटन ...
भटके आणि विमुक्तांना ओळखपत्र वा वास्तव्याचा पुरावा नसला तरी त्यांना शिधापत्रिका देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचा शासननिर्णयदेखील निर्गमित करण्यात आला आहे. कोणतेही...
राज्याच्या ज्या भागात पावसाअभावी पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे, तिथे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल. एकाही तालुक्यात किंवा खेड्यात पाण्यापासून कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता...
पीक विमा भरताना आधार कार्ड, सातबारा उतारा यावरील नावांत किरकोळ (अल्प) बदल असला तरी विमा अर्ज स्वीकृत करण्यात येतील, असे महाराष्ट्राच्या कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
यावर्षीपासून...
स्वातंत्र्य सेनानी, मुत्सद्दी राजकारणी आणि पत्रकार असा त्रिवेणी संगम असलेले दिवंगत जवाहरलाल दर्डा खऱ्या अर्थाने रत्न म्हणजे जवाहर होते. राज्यातील विविध मंत्रीपदे भूषविताना त्यांनी आपल्या...
नागपूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत अधिसंख्य कर्मचाऱ्यांना वारसाहक्क सोडून, लाड-पागे समितीने केलेल्या शिफारशीनुसार इतर सर्व लाभ देण्यात येत असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी काल विधान परिषदेत दिली....
संपूर्ण देशभरातील विविध स्थानांसाठी 1:10K स्केलची उच्च रिझोल्यूशन उपग्रह प्रतिमा प्रदान करण्यासाठी व्हिज्युअलायझेशन आणि नियोजनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ग्रामीण भू-अभिलेखासाठी 'भुवन पंचायत (आवृत्ती. 4.0)' पोर्टल आणि भारतीय अंतराळ संशोधन...
मुंबईतली महाराष्ट्र राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था व राज्यातील सर्व भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रात नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षणास (एसआयएसी) प्रवेशासाठी २५...
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबईतल्या स्मशानभूमीत आता विद्युत आणि गॅस दाहिनींबरोबरच पर्यावरणपूक लाकडी दहन यंत्रणेचा (Eco – Friendly Pyre creation system technology) वापर करण्यात येणार आहे....