Homeन्यूज अँड व्ह्यूजमहायुती असो वा...

महायुती असो वा मविआ, चिपळूण मात्र विकासापासून दूरच

सध्या राज्यात सर्वत्र जिल्हापरिषदा आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांचे पडघम जोरशोरसे वाजत आहेत. सत्तारूढ महायुती व विरोधक असलेली महाविकास आघाडी समोरासमोर उभे ठाकले आहेत. काही कामानिमित्त चिपळूण, गुहागर व दाभोळ परिसरात जाण्याचा योग आला. जी स्थिती राज्यातील महापालिकांची आहे त्यापेक्षा कितीतरीपट गंभीर स्तिती तालुका पातळीवर नागरी सुविधांबाबत पाहवयास मिळाली. गेली सुमारे दहा वर्षे चिपळूण नगरपरिषद अस्तित्त्वातच नव्हती तरी प्रशासन कार्यरत होते. लोकप्रतिनिधी नसताना प्रशासन काय लायकीचे काम करते हे गेली काही वर्षे चिपळूणची जनता अनुभवत असल्याचे अनेकांनी सांगितले.

शहरातील रस्त्यांची तर दुरवस्था आहेच, पण नगरपरिषदेने स्वतः बांधलेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र परिसरातील रस्त्यांचीही धुळधाण झाली आहे. सांस्कृतिक केंद्र प्रांगणातील रस्ता तर केवळ केविलवाणाच दिसत आहे. खरंतर हा रस्ता नाहीच, ओबडधोबड खडीचा कुठल्यातरी दूरवर असलेल्या दुर्गम गावातील रस्त्यासारखा हा दिसत आहें. हे प्रांगण गेले दहा-बारा वर्षे याच स्थितीत असल्याची संतापजनक माहिती येथील नागरिकांनी सांगितली. यापेक्षाही संतापजनक गोष्ट म्हणजे या प्रांगणाशेजारीच आज संध्याकाळी महायुतीचे ज्येष्ठ नेते चिपळूण शहराच्या विकासाच्या ‘आणभाका’ घेणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी उदय सामंत असूनही रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख तालुक्यातील रस्त्यांची जर दुर्दशा दिसत असेल तर ग्रामीण भागातील रस्त्यांबाबत विचारच करायला नको!

Continue reading

बांगलादेशींना हाकलायचंय? मग, वंदे भारतने दिल्ली गाठा…

सध्या मुंबई विभागीय विकास प्राधिकरणात म्हणेच MMRA मध्ये हो, बिचकून जाऊ नका; बांगलादेशी बेकायदा नागरिकांच्या विषयाला नको इतके महत्त्व दिले जात असल्याचे वाटत आहे. नको इतके इतक्यासाठीच म्हटले की, जी मंडळी बांगलादेशींविरुद्ध आवाज उठवत आहेत त्यांचेच सरकार केंद्रात व...

अजि म्या नवल पाहिले…

अजि म्या नवल पाहिले.. तुम्ही चकीत झालात ना? वाचक हो, तुम्ही तर चकीत झाला असाल, पण मला काहीस चुकीच्या ठिकाणी तर उतरलो नाही ना? अशी शंका आली. डोक्याला जास्त ताण देऊ नका! अहो हा आहे मुंबईतल्या दादर रेल्वेस्थानकाबाहेरचा फेरीवालामुक्त...

जेव्हा फोटो जिवंत करणाराच ‘फोटो’त जातो…

गेल्या आठवड्यात एक दुःखद बातमी सकाळी, सकाळीच आली.. रजनीश गेला. वय अवघे ५५ वर्षे. हे वय होत का जाण्याचं? नाही. पण नियतीला काय माहित की त्याच्या हातून अजून कुणाकुणाचे फोटो कुठल्या परिस्थितीत काढायचे ते! फोटोलाच गुंगारा देऊन (तसा तो...
Skip to content