Homeन्यूज अँड व्ह्यूजमहायुती असो वा...

महायुती असो वा मविआ, चिपळूण मात्र विकासापासून दूरच

सध्या राज्यात सर्वत्र जिल्हापरिषदा आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांचे पडघम जोरशोरसे वाजत आहेत. सत्तारूढ महायुती व विरोधक असलेली महाविकास आघाडी समोरासमोर उभे ठाकले आहेत. काही कामानिमित्त चिपळूण, गुहागर व दाभोळ परिसरात जाण्याचा योग आला. जी स्थिती राज्यातील महापालिकांची आहे त्यापेक्षा कितीतरीपट गंभीर स्तिती तालुका पातळीवर नागरी सुविधांबाबत पाहवयास मिळाली. गेली सुमारे दहा वर्षे चिपळूण नगरपरिषद अस्तित्त्वातच नव्हती तरी प्रशासन कार्यरत होते. लोकप्रतिनिधी नसताना प्रशासन काय लायकीचे काम करते हे गेली काही वर्षे चिपळूणची जनता अनुभवत असल्याचे अनेकांनी सांगितले.

शहरातील रस्त्यांची तर दुरवस्था आहेच, पण नगरपरिषदेने स्वतः बांधलेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र परिसरातील रस्त्यांचीही धुळधाण झाली आहे. सांस्कृतिक केंद्र प्रांगणातील रस्ता तर केवळ केविलवाणाच दिसत आहे. खरंतर हा रस्ता नाहीच, ओबडधोबड खडीचा कुठल्यातरी दूरवर असलेल्या दुर्गम गावातील रस्त्यासारखा हा दिसत आहें. हे प्रांगण गेले दहा-बारा वर्षे याच स्थितीत असल्याची संतापजनक माहिती येथील नागरिकांनी सांगितली. यापेक्षाही संतापजनक गोष्ट म्हणजे या प्रांगणाशेजारीच आज संध्याकाळी महायुतीचे ज्येष्ठ नेते चिपळूण शहराच्या विकासाच्या ‘आणभाका’ घेणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी उदय सामंत असूनही रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख तालुक्यातील रस्त्यांची जर दुर्दशा दिसत असेल तर ग्रामीण भागातील रस्त्यांबाबत विचारच करायला नको!

Continue reading

ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांना खुले पत्र!

नवनिर्वाचित महापौर शर्मिलाताई यांना सविनय प्रणाम. शर्मिलाताई, प्रथम आपले अभिनंदन! आज आपण ठाणे शहराच्या महापौर म्हणून अधिकृतरित्या पदभार सांभाळला. त्याबरोबरच आपले अभिनंदन करण्याचा मान मी घेत आहे. महापौरपदाचा भार सांभाळल्यानंतर आपण शिवसेना-भाजप- राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे म्हणजेच सत्तारूढ महायुतीचे सरकार ठाणे...

जेलवारी करणारे छगन भुजबळ होते ‘राजबंदी’?

महाराष्ट राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना बेहिशेबी संपत्ती जमवल्याच्या आरोपतून सरकारच्या इडी यंत्रणेने आरोपमुक्त केल्याची बातमी काल आली आणि इंग्रजीतील आघाडीचे साप्ताहिक 'आउटलूक'मध्ये 'Thou Shalt Not Dissent' ही मुखपृष्ठकथाही कालच बाहेर आली! तसा भुजबळ यांचा...

वाड्यातला रस्ता २० वर्षे अर्धवट!

पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील रस्त्यांची ही स्थिती आहे. वाड्यातील एसटी थांब्याच्या आसपास सर्वत्र असेच रस्ते आहेत. मधला रस्ता सिमेंट काँक्रिटचा व बाजूच्या दोन्ही बाजूस कच्चा रस्ता. वास्तविक ज्या कंत्राटदाराने काँक्रिटचा रस्ता बांधला त्यानेच बाजूचा भागही व्यवस्थित डांबरी रस्ता करायचे...
Skip to content