Homeन्यूज अँड व्ह्यूजमहायुती असो वा...

महायुती असो वा मविआ, चिपळूण मात्र विकासापासून दूरच

सध्या राज्यात सर्वत्र जिल्हापरिषदा आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांचे पडघम जोरशोरसे वाजत आहेत. सत्तारूढ महायुती व विरोधक असलेली महाविकास आघाडी समोरासमोर उभे ठाकले आहेत. काही कामानिमित्त चिपळूण, गुहागर व दाभोळ परिसरात जाण्याचा योग आला. जी स्थिती राज्यातील महापालिकांची आहे त्यापेक्षा कितीतरीपट गंभीर स्तिती तालुका पातळीवर नागरी सुविधांबाबत पाहवयास मिळाली. गेली सुमारे दहा वर्षे चिपळूण नगरपरिषद अस्तित्त्वातच नव्हती तरी प्रशासन कार्यरत होते. लोकप्रतिनिधी नसताना प्रशासन काय लायकीचे काम करते हे गेली काही वर्षे चिपळूणची जनता अनुभवत असल्याचे अनेकांनी सांगितले.

शहरातील रस्त्यांची तर दुरवस्था आहेच, पण नगरपरिषदेने स्वतः बांधलेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र परिसरातील रस्त्यांचीही धुळधाण झाली आहे. सांस्कृतिक केंद्र प्रांगणातील रस्ता तर केवळ केविलवाणाच दिसत आहे. खरंतर हा रस्ता नाहीच, ओबडधोबड खडीचा कुठल्यातरी दूरवर असलेल्या दुर्गम गावातील रस्त्यासारखा हा दिसत आहें. हे प्रांगण गेले दहा-बारा वर्षे याच स्थितीत असल्याची संतापजनक माहिती येथील नागरिकांनी सांगितली. यापेक्षाही संतापजनक गोष्ट म्हणजे या प्रांगणाशेजारीच आज संध्याकाळी महायुतीचे ज्येष्ठ नेते चिपळूण शहराच्या विकासाच्या ‘आणभाका’ घेणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी उदय सामंत असूनही रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख तालुक्यातील रस्त्यांची जर दुर्दशा दिसत असेल तर ग्रामीण भागातील रस्त्यांबाबत विचारच करायला नको!

Continue reading

जनरल नरवणेंच्या ‘डेस्टिनी’ची डेस्टिनी काय?

मुंबईच्या पुस्तक बाजारात देशात अद्याप प्रकाशित न झालेले पुस्तक उपलब्ध होण्याच्या अनेक वाटा आहेत. या देशात कधीही प्रकाशित होऊ न शकलेली पुस्तकेही येथे उपलब्ध असतात. काँग्रेस राजवटीतही प्रख्यात उद्योगपती धीरूभाई अंबानी यांनी आपले साम्राज्य कसे उभारले याची इथंबूत माहिती...

आता इंस्टावरही आम्ही ‘सेन्सेशन..’ पाहायचे?

बरोबर एका वर्षापूर्वी गुन्हेगारी जगत समाजमाध्यमांचा कसा गैरवापर करून स्वतःची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करतात, याबाबत चिंता व्यक्त केली हॊती. तरीही गृह विभाग, पोलीस आयुक्तालये तसेच सायबर गुन्हा प्रतिबंधक विभागाने काही ठोस कामगिरी केल्याचे आठवत नाही. मुख्यमंत्री व गृहमंत्री असलेल्या...

हा पाहा ठाणे स्टेशनवरचा प्रवाशांसाठीचा विश्रांतीकक्ष!

दोन दिवसांपूर्वीच भाजपच्या एका ज्येष्ठ नगरसेवकाने ठाणे रेल्वेस्थानक (प.) परिसरात बोगस डियोडरंट विक्रीचा भांडाफोड केला. त्याबाबत अभिनंदनच! परंतु, ठाणे स्थानक व स्थानक परिसर, हा दिवसेंदिवस बकाल व बेवारस लोकांचं आश्रयस्थान बनत असल्याचे दिसत आहे, त्याचे काय? (अनेकांच्या मते हे...
Skip to content