Friday, February 14, 2025
Homeन्यूज अँड व्ह्यूजअवाडा एनर्जी महाराष्ट्रात...

अवाडा एनर्जी महाराष्ट्रात करणार ५० अब्जांची गुंतवणूक

शाश्वत ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी आणि सौर उर्जा सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणून, अवाडा ग्रुपच्या अवाडा एनर्जी या अक्षय ऊर्जा विभागाला महाराष्ट्र शासनाच्या  एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर लिमिटेड या उपकंपनीने ‘लेटर ऑफ अवॉर्ड’ देऊन नुकतेच सन्मानित केले आहे. या प्रतिष्ठित मान्यतेमुळे अवाडा एनर्जीला २०२५पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात विकेंद्रित कृषी सौर पीव्ही प्रकल्पांच्या विकास आणि कार्यसंचालन करणे अनिवार्य आहे. याद्वारे एकूण १,१३८ मेगावॅट ऊर्जा उपलब्ध होणार आहे. हा प्रकल्प मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०  किंवा ‘मिशन २०२५’चा एक भाग आहे. यानिमित्ताने अवाडा एनर्जी महाराष्ट्रात ५० अब्ज रूपयांची गुंतवणूक करणार आहे.

या योजनेचे महत्त्व अधोरेखित करताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामीण समृद्धी आणि शाश्वत ऊर्जा उपायांना पुढे नेण्यासाठी तिच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भाष्य केले. अवाडा ग्रुपचे अध्यक्ष विनीत मित्तल यांनीदेखील या उपक्रमाच्या सिंचनासाठी, रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे मार्ग सुधारण्यासाठी स्थिर वीजपुरवठा करण्याच्या क्षमतेबद्दल आशावाद व्यक्त केला.

२०२५पर्यंत ३० टक्के कृषी फीडरचे सौरीकरण करण्याच्या उद्दिष्टासह महाराष्ट्राच्या कृषी उर्जेच्या लँडस्केपमध्ये क्रांती घडवून आणण्याचा एक महत्त्वाकांक्षी प्रयत्न आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या समारंभात याला अधिकृत मान्यता देत शेतकरी समुदायाचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि जागतिक स्तरावर राज्याची औद्योगिक स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी सरकारचे समर्पण अधोरेखित केले.

महाराष्ट्राचा अंदाजे २९ दशलक्ष इतका विशाल ग्राहक आधार आहे, ज्यापैकी ४.५ दशलक्ष राज्याच्या वीजेचा २२ टक्के वापर करणारे कृषी क्षेत्रात गुंतलेले आहेत. सिंचनासाठी विश्वसनीय दिवसा वीजपुरवठा सुनिश्चित करण्याच्या आव्हानांना दीर्घकाळ तोंड द्यावे लागले आहे. कृषी सौर पीव्ही प्रकल्पांचे विकेंद्रीकरण करणे, १० जिल्ह्यांमधील १९२ ठिकाणी ५० अब्ज रुपयांची गुंतवणूक करून या समस्येवर एक धोरणात्मक उपाय हे कार्य पुढे सरकणार आहे. अखंडित दिवसभर उर्जा आणि सुमारे २ हजार ५०० प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्यांची निर्मिती, ज्यामुळे स्थानिक आर्थिक विकासाला चालना मिळते.

Continue reading

मोदींचा मास्टरस्ट्रोक: 26/11चा मास्टरमाईंड राणाच्या प्रत्यार्पणास ट्रम्पची मंजुरी

26/11च्या मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड आरोपी असलेला पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन उद्योगपती तहव्वुर राणा याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास अमेरिकेने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका भेटीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज, 14 फेब्रुवारीला पहाटे या प्रत्यार्पणास मान्यता दिली. 26/11...

शरद आचार्य क्रीडा केंद्राच्या खेळाडूंचे यश

मुंबईतल्या चेंबूर येथील लोकमान्य शिक्षण संस्था संचालित शरद आचार्य क्रीडा केंद्रातील नारायणराव आचार्य विद्यानिकेतन शाळेत सराव करणाऱ्या अक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स खेळातील 9 खेळाडूंनी देहराडून, उत्तराखंड येथे पार पडलेल्या 38व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत 9 सुवर्णपदके पटकावून महाराष्ट्राला पदक तालिकेत द्वितीय क्रमांकावर...

नाना पटोलेंच्या जागी हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारत त्यांच्याजागी हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे आमदार विजय वडेट्टीवार यांची विधिमंडळ काँग्रेसचे गटनेते म्हणूनही नियुक्ती केली आहे. हर्षवर्धन सपकाळ...
Skip to content