Homeबॅक पेजगोव्यात शुक्रवारपासून रंगणार...

गोव्यात शुक्रवारपासून रंगणार आशियाई अजिंक्यपद अ‍ॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स

१४वी अ‍ॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स आशियाई अजिंक्यपद स्पर्धा येत्या ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान गोव्यात रंगणार आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या आयोजनाखाली होणार असून या स्पर्धेत आशियातील अग्रगण्य जिम्नॅस्ट आपली कौशल्ये, नियंत्रण आणि कलात्मकता दाखवणार आहेत. स्पर्धैत १९ देशांचे खेळाडू सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेसाठी मुंबईतल्या चेंबूर येथील नारायण आचार्य विद्यालयातील १९ खेळाडू भारतीय संघात निवडले गेले आहेत. भारतीय संघात जागतिक खेळांचे विजेते ऋतुजा जगदाळे, अर्णा पाटील, आचल गुरव यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय पदकविजेते आकाश गोसावी, आदित्य खसासेही भारताचं प्रतिनिधित्व करतील. अलीकडे उत्तराखंड येथे झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत

सर्व सुवर्णपदके जिंकणारे सान्वी शिंदे, आदित्य दिघे या स्पर्धेत भारतासाठी चांगली कामगिरी करतील, अशी आशा आहे. गोव्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात भारतीय संघ जोरदार तयारी करत आहे.

अनुभवी प्रशिक्षक राहुल ससाणे संघाच्या तयारीबाबत म्हणाले की, आपले खेळाडू शिस्त, निष्ठा आणि मेहनतीने प्रशिक्षण घेत आहेत. प्रत्येकाला देशाचं प्रतिनिधित्व करण्याचं महत्त्व समजलं आहे. ते आपली सर्वोत्तम कामगिरी करतील. भारतीय अ‍ॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स तांत्रिक समितीचे प्रमुख सुमित एम. के. म्हणाले की, आमच्याकडे अनुभवी आणि तरुण खेळाडूंचे संतुलित मिश्रण आहे. गोव्यात ही स्पर्धा आयोजित केल्यामुळे भारतातील अ‍ॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्सचा दर्जा आणखी उंचावेल. आंतरराष्ट्रीय ज्युरी योगेश पवार यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत भारतीय खेळाडूंनी तांत्रिक अचूकता आणि कलात्मक सादरीकरणात उल्लेखनीय प्रगती केली आहे. ही स्पर्धा केवळ स्पर्धात्मक दर्जा नव्हे, तर भारतीय अ‍ॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्सची वाढती ताकददेखील दाखवेल.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content