Homeचिट चॅट'अक्षरधन' या ई-चारोळी...

‘अक्षरधन’ या ई-चारोळी संग्रहाचे प्रकाशन

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, उत्तर मुंबई विभागातर्फे आंतरराष्ट्रीय पुस्तक दिनाचे औचित्य साधून ‘अक्षरधन’ या प्रातिनिधिक ई-चारोळी संग्रहाचे प्रकाशन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. अ.भा.म.सा.प.चे राष्टीय कार्याध्यक्ष शरद गोरे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष फुलचंद नागटिळक, कोकण प्रदेशाध्यक्ष डॉ. अ. ना. रसनकुटे व मुंबई प्रदेश अध्यक्षा हिरकणी राजश्री बोहरा यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आले. 

सदर कार्यक्रम हा ऑनलाईन स्वरुपात संपन्न झाला असला तरी जवळपास 200 जण यात सहभागी झाले होते. उत्तर मुंबई विभागाच्या अध्यक्षा गीतांजली वाणी यांनी सुंदर प्रस्तावना व आभार प्रदर्शन केले. कार्याध्यक्ष विठ्ठल घाडी यांनी पुस्तकाची सुंदर व आकर्षक रचना व ग्राफिक्स तयार केले. उपाध्यक्षा योगिता तकतराव यांनी तांत्रिक बाबी सांभाळत सर्व नियोजनानुसार कार्यक्रमास सहकार्य केले. सचिव कल्पना पाटकर व सरचिटणीस राखी जोशी यांनी सुंदर शब्दातून सूत्रसंचालन केले. शरद गोरे यांनी  शुभेच्छा व मार्गदर्शन दिले. डॉ. रसनकुटे यांनी शुभेच्छा दिल्या. राजश्री बोहरा यांनीही मनोगत व्यक्त केले.

या बहारदार कार्यक्रमास जान्हवी कुंभारकर- नवी मुंबई जिल्हाध्यक्षा, सुलभा पवार- राहता तालुकाध्यक्षा, संगीता बांबोळे- अध्यक्षा विदर्भ महिला आघाडी, अनिता गुजर- अध्यक्षा डोंबिवली शहर, अश्विनी मेंगाणे- पन्हाळा तालुकाध्यक्षा, सविता काळे- उपाध्यक्षा विक्रोळी शहर, कुलदीप रुघे- आंबड तालुकाध्यक्ष, नेहा तलाठी- उपाध्यक्षा महाड तालुका, सारीका चव्हाण- अध्यक्षा भांडूप शहर, तसेच  आजीवन सदस्या हर्षदा गुळमिरे, यश घोडे, कांचन नेवे, चंद्कला जोशी, मंजू वणवे, उषा राऊत,  आप्पा तरे इ. सर्व ऑनलाईन स्वरुपातून उपस्थित होते. 

पीडीएफ स्वरुपात या पुस्तकाचे अनावरण करुन सर्वत्र ते पाठवण्यात आले. 

स्वत:बद्दलचे वर्णन चारोळीत करुन नाविन्यपूर्ण उपक्रम व्हॉट्सअच्या माध्यमातून बहारदार स्वरुपाचा साजरा आला. साहित्यक्षेत्रात सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम व स्पर्धा, संकल्पना राबवत, आधुनिक तंत्रज्ञानाचा मेळ जुळवत या कार्यक्रमाला सौंदर्य प्रप्त झाले.  बाहेरील परिस्थिती कितीही भयावह असली तरी त्यावरील भाष्य व चर्चा न  करता गोड आठवणींना स्मरून लेखन करत असताना मनावरील ताण तणाव कमी होत आहेत. ह्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक सबंध साहित्य क्षेत्रातून आवर्जून होत आहे. एकूण 105 चारोळ्यांनी बहरलेला हा चारोळी संग्रह वाचकांच्या पसंतीला नक्कीच खरा उतरणार आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content