Homeचिट चॅटअजित घोष ट्रॉफी...

अजित घोष ट्रॉफी महिला क्रिकेटः साईनाथ स्पोर्ट्सला विजेतेपद

सेजल विश्वकर्मा (६४), श्रावणी पाटील (नाबाद ४७) यांच्या शानदार प्रदर्शनाच्या बळावर साईनाथ स्पोर्ट्स क्लबला ५व्या अजित घोष ट्रॉफी महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकवण्यात यश आले. त्यांनी यजमान स्पोर्टिंग युनियन क्लबचा ३५ धावांनी पराभव केला.

सेजल आणि श्रावणीच्या दुसऱ्या विकेटच्या ९९ धावांच्या भागिदारीने जणू सामान्याचा निकालच लावला. साईनाथने २० षटकांमध्ये ३ बाद १५१ अशी चांगली धावसंख्या त्यायोगे उभी केली. मात्र सेजलला तिच्या खेळीच्या सुरुवातीलाच जे जीवदान मिळाले, त्याबद्दल साईनाथने प्रतिस्पर्धी संघाचे अवश्य आभार मानले असतील. श्रावणीने सलामीला येत ५३ चेंडूंमध्ये केवळ ३ चौकार मारत संयमपूर्ण खेळी रचल्याने सेजलला आक्रमणावर भर देता आला. सेजलने ६४ धावा ५४ चेंडूत केल्या, ज्यामध्ये ९ चौकार आणि २ षटकार होते.

स्पोर्टिंगने लक्ष्याचा पाठलाग करताना छान सुरुवात केली. पहिल्या ६ षटकांच्या “पॉवर प्ले”मध्ये त्यांनी ४७ धावा केल्या. मात्र त्यांच्या प्रांजल मळेकरला विनाकारण “स्टेप-आऊट” होऊन चेंडू फटकाविण्याचा मोह झाला आणि ती यष्टिचीत झाली. ही चूक फारच महाग ठरली. स्पोर्टिंगने जी लय गमावली त्यानंतर त्यांच्या विजयाच्या आशांना ओहोटी लागली. ध्रुवी पटेल (२६) आणि कश्वी होसाळकर (३०) यांनी प्रतिकार केला खरा, पण तो विजय देण्यासाठी पुरेसा नव्हता. अमिषा म्हात्रेने ध्रुवीला आपल्या ऑफ-ब्रेकवर बोल्ड केले आणि स्पोर्टिंगला पराभवाच्या छायेत ढकलले. स्पोर्टिंगच्या दोन खेळाडू धावबाद तर एक यष्टिचीत झाल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले.

भामा सी. सी.ची अंजू सिंग (स्पर्धेत सर्वोत्तम), डॅशिंगची खुशी निजाई (सर्वोत्तम फलंदाज) आणि साईनाथची श्रावणी पाटील (उत्तम गोलंदाज) तसेच स्पोर्टिंगची प्रांजल मळेकर (उदयोन्मुख खेळाडू) यांना “अविसा”तर्फे “किट” प्रदान करण्यात आले. एमसीएचे सचिव अभय हडप, मैदानातील कार्यकर्ते नदीम मेमन, अॅपेक्स कौंसिलचे केदार गोडबोले यांची उपस्थिती पारितोषिक वितरण समारंभाला लाभली. तसेच कमल सावंत, रेखा गर्दे या महिला खेळाडू खास पुण्याहून मुंबईत आल्या होत्या.

संक्षिप्त धावफलक-

साईनाथ स्पोर्ट्स- २० षटकांत ३ बाद १५१ धावा (श्रावणी पाटील नाबाद ४७, सेजल विश्वकर्मा ६४) विजयी विरुद्ध स्पोर्टिंग युनियन- २० षटकांत ७ बाद ११६ (ध्रुवी पटेल २६, प्रांजल मळेकर १४, कश्वी होसाळकर ३०, अमिशा म्हात्रे १२ धावांत २ बळी) सामन्यात सर्वोत्तम: श्रावणी पाटील

Continue reading

नासाची ऐतिहासिक भरारी: चंद्राजवळून घेतले पृथ्वीचे विलोभनीय दर्शन!

नासाच्या 'आर्टेमिस २' मोहिमेने अंतराळ संशोधनाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. या मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्राच्या अतिशय जवळून पृथ्वीचे जे फोटो पाठवले आहेत, ते पाहून संपूर्ण जग थक्क झाले आहे. अथांग काळोखात तरंगणाऱ्या आपल्या निळ्याशार पृथ्वीचे हे फोटो इतके...

भारताचा राष्ट्रीय समुद्री दिवस! समुद्री स्वातंत्र्याची धाडसी कहाणी!!

आज ५ एप्रिल २०२६. ५ एप्रिल १९१९... मुंबई बंदरात रात्रीचा अंधार, वादळी वारे आणि उंच लाटांचा गर्जना! ब्रिटिश साम्राज्य समुद्रावर पूर्णपणे राज करत होतं. भारतीयांना जहाज चालवण्याचीसुद्धा परवानगी नव्हती. एक चूक आणि सगळं संपलं! पण, त्या रात्री एक छोटंसं...

तुमचा कॅमेरा बंद तर नाही ना?

एक एप्रिल २०२६पासून भारतात लागू झालेल्या नव्या सीसीटीव्ही नियमांमुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. “घरातील कॅमेरा बंद पडणार का?” असा प्रश्न अनेकांकडून विचारला. मात्र, केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार, आधीपासून वापरात असलेल्या कॅमेर्‍यांवर कोणताही परिणाम होणार नसून, हा निर्णय मुख्यतः...
Skip to content