Homeन्यूज अँड व्ह्यूजचंद्रानंतर शनिवारपासून 'सूर्या'ला...

चंद्रानंतर शनिवारपासून ‘सूर्या’ला गवसणी?

यशस्वी चांद्रयान मोहिमेनंतर, भारत पहिल्या सूर्यमंडलाच्या मोहिमेसाठी सज्ज आहे. या मोहिमे अंतर्गत “आदित्य-एल 1”, हे यान इस्रो 2 सप्टेंबर रोजी प्रक्षेपित करण्याची शक्यता असून त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती  केंद्रीय अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी दिली.

संपूर्ण जग भारताच्या चांद्रयान मोहिमेचा उत्सव साजरा करत असताना, सूर्य मोहिमेबद्दल लोकांचे स्वारस्यही अनेक पटींनी वाढले आहे, असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी मैनपुरी येथे एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितले.

भारताच्या अंतराळ क्षेत्राला भूतकाळातील बंधनातून मुक्त करण्याचा धाडसी निर्णय पंतप्रधानांनी घेतला नसता तर हे सर्व शक्य झाले नसते, यासाठी मागील सरकारने पुढाकार घेतला नव्हता, असे सांगत मंत्र्यांनी याचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. परिणामी, चार वर्षांच्या अल्प कालावधीत, इस्रोच्या आर्थिक स्त्रोतांमध्ये वाढ झाली आहे, या क्षेत्रातील स्टार्टअपची संख्या 4 वरून 150 वर गेली आहे आणि भारताच्या उपग्रह प्रक्षेपण सुविधेची विश्वासार्हता अचानक इतकी वाढली आहे की, युरोपियन उपग्रहांच्या प्रक्षेपणातून आतापर्यंत भारताने 260 दशलक्ष युरोपेक्षा अधिक आणि अमेरिकन उपग्रह प्रक्षेपणातून भारताने 150 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सपेक्षा अधिक कमाई केली आहे, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैज्ञानिक जगताचा सन्मान वाढवल्यामुळेच आज आपल्याला सूर्याच्या दिशेने पहिले अंतराळ यान प्रक्षेपित करण्याचा आत्मविश्वास आणि खात्री आहे, असे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.

सूर्याचा अभ्यास करण्यासाठीच्या आदित्य-एल 1 या अंतराळ मोहिमेमध्ये, सात पेलोडसह (यानांमधील उपकरणे) ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहनाचा (पीएसएलव्ही) वापर करण्यात येणार आहे, असे  डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले. हे अंतराळयान पृथ्वीपासून सुमारे 1.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सूर्य-पृथ्वी प्रणालीच्या लॅग्रेंज पॉइंट-1(एल 1) भोवती प्रभामंडल कक्षेत स्थापित केले जाईल. प्रभामंडल कक्षेत ठेवलेल्या उपग्रहाला सूर्याला कोणत्याही ग्रहणाशिवाय सतत पाहण्याचा मोठा फायदा मिळणार आहे, असेही ते म्हणाले. मंगळ आणि चंद्र मोहिमेनंतर आदित्य एल-1 ही तिसरी मोहीम आहे. या मोहीमेच्या माध्यमातून सूर्यापासून मिळणार्‍या ऊर्जास्रोतांचा अभ्यास केला जाईल.

Continue reading

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...

आता फक्त २०० रुपयात करा कुटुंबातच होणाऱ्या वाटणीची मोजणी!

राज्यशासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत जमीन मोजणीच्या शुल्क आणि प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, आता कुटुंबातच होणाऱ्या संमतीच्या किंवा कोर्टाच्या वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपये प्रति पोटहिस्सा या नाममात्र शुल्कात केली...
Skip to content