Homeन्यूज अँड व्ह्यूजचंद्रानंतर शनिवारपासून 'सूर्या'ला...

चंद्रानंतर शनिवारपासून ‘सूर्या’ला गवसणी?

यशस्वी चांद्रयान मोहिमेनंतर, भारत पहिल्या सूर्यमंडलाच्या मोहिमेसाठी सज्ज आहे. या मोहिमे अंतर्गत “आदित्य-एल 1”, हे यान इस्रो 2 सप्टेंबर रोजी प्रक्षेपित करण्याची शक्यता असून त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती  केंद्रीय अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी दिली.

संपूर्ण जग भारताच्या चांद्रयान मोहिमेचा उत्सव साजरा करत असताना, सूर्य मोहिमेबद्दल लोकांचे स्वारस्यही अनेक पटींनी वाढले आहे, असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी मैनपुरी येथे एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितले.

भारताच्या अंतराळ क्षेत्राला भूतकाळातील बंधनातून मुक्त करण्याचा धाडसी निर्णय पंतप्रधानांनी घेतला नसता तर हे सर्व शक्य झाले नसते, यासाठी मागील सरकारने पुढाकार घेतला नव्हता, असे सांगत मंत्र्यांनी याचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. परिणामी, चार वर्षांच्या अल्प कालावधीत, इस्रोच्या आर्थिक स्त्रोतांमध्ये वाढ झाली आहे, या क्षेत्रातील स्टार्टअपची संख्या 4 वरून 150 वर गेली आहे आणि भारताच्या उपग्रह प्रक्षेपण सुविधेची विश्वासार्हता अचानक इतकी वाढली आहे की, युरोपियन उपग्रहांच्या प्रक्षेपणातून आतापर्यंत भारताने 260 दशलक्ष युरोपेक्षा अधिक आणि अमेरिकन उपग्रह प्रक्षेपणातून भारताने 150 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सपेक्षा अधिक कमाई केली आहे, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैज्ञानिक जगताचा सन्मान वाढवल्यामुळेच आज आपल्याला सूर्याच्या दिशेने पहिले अंतराळ यान प्रक्षेपित करण्याचा आत्मविश्वास आणि खात्री आहे, असे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.

सूर्याचा अभ्यास करण्यासाठीच्या आदित्य-एल 1 या अंतराळ मोहिमेमध्ये, सात पेलोडसह (यानांमधील उपकरणे) ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहनाचा (पीएसएलव्ही) वापर करण्यात येणार आहे, असे  डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले. हे अंतराळयान पृथ्वीपासून सुमारे 1.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सूर्य-पृथ्वी प्रणालीच्या लॅग्रेंज पॉइंट-1(एल 1) भोवती प्रभामंडल कक्षेत स्थापित केले जाईल. प्रभामंडल कक्षेत ठेवलेल्या उपग्रहाला सूर्याला कोणत्याही ग्रहणाशिवाय सतत पाहण्याचा मोठा फायदा मिळणार आहे, असेही ते म्हणाले. मंगळ आणि चंद्र मोहिमेनंतर आदित्य एल-1 ही तिसरी मोहीम आहे. या मोहीमेच्या माध्यमातून सूर्यापासून मिळणार्‍या ऊर्जास्रोतांचा अभ्यास केला जाईल.

Continue reading

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...
Skip to content