Homeपब्लिक फिगरअणुऊर्जाविषयक दुर्घटनेतील पीडितांसाठी...

अणुऊर्जाविषयक दुर्घटनेतील पीडितांसाठी पुरेसे विमा संरक्षण

केंद्रीय अणुउर्जा आणि अवकाश विभागाचे राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, अणुउर्जा विषयक दुर्घटना घडल्यास, त्यासाठी पुरेसे आणि समाधानकारक प्रमाणातील विमा संरक्षण पुरवण्यात आलेले आहे.

लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या लिखित उत्तराद्वारे केंद्रीय मंत्र्यांनी असे सांगितले की भारताने आण्विक हानीसाठीचा नागरी दायित्व (सीएलएनडी) कायदा 2010 लागू केला असून या कायद्याअंतर्गत अणुउर्जा प्रकल्पांमुळे झालेल्या हानीची नागरी जबाबदारी स्वीकारण्याविषयक तरतूद आहे. तसेच, प्रकल्पाच्या परिचालकावर घटनेची जबाबदारी टाकून नो-फॉल्ट पद्धती अंतर्गत अणुउर्जाविषयक दुर्घटनेतील पीडितांना योग्य प्रमाणात नुकसानभरपाई देण्याची तरतूद केलेली आहे.

या कायद्याअंतर्गत प्रकल्प अणुऊर्जेशी संबंधित प्रत्येक दुर्घटनेच्या संदर्भात परिचालकाला त्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी विमा संरक्षण किंवा आर्थिक सुरक्षा ठेव किंवा दोन्हींचे मिश्रण अशी तरतूद करून ठेवावी लागते.

कोणतेही विमा संरक्षण अथवा आर्थिक सुरक्षा ठेवीची तरतूद असल्याशिवाय अणुउर्जा क्षेत्रातील परिचालक अणुउर्जा केंद्र चालवू शकत नाही आणि वैधतेचा कालावधी संपण्याच्या आत परिचालकाला अशी विमा पॉलिसी किंवा आर्थिक सुरक्षा ठेवींचे नूतनीकरण करणे अनिवार्य असते अशी माहिती केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी दिली.

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content