Homeटॉप स्टोरीअयोध्येतल्या रामजन्मभूमी मंदिराचे...

अयोध्येतल्या रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे निधन

अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे आज सकाळी निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. लखनौ येथील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालयात त्यांच्यावर ब्रेन स्ट्रोकवरील उपचार सुरू होते. ब्रेन स्ट्रोकव्यतिरिक्त, ते मधुमेह आणि उच्च रक्तदाबसारख्या गंभीर आजारांशी झुंजत होते.

आचार्य सत्येंद्र दास यांना 2 फेब्रुवारीला ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर सुरुवातीला त्यांना अयोध्येतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु नंतर त्यांना प्रगत वैद्यकीय सेवेसाठी लखनौ येथील एसजीपीजीआय येथे रेफर करण्यात आले. त्यांना गंभीर अवस्थेत 3 फेब्रुवारीला न्यूरोलॉजी वॉर्डच्या एचडीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 4 फेब्रुवारीला आचार्य सत्येंद्र दास यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी एसजीपीजीआयएमएसला भेट दिली होती.

6 डिसेंबर 1992 रोजी जेव्हा बाबरी मशीद पाडण्यात आली, तेव्हाही दास मुख्य पुजारी होते. मशीद पडण्यापूर्वी त्यांनी मूर्ती जवळच्या फकीरे मंदिरात हलवल्या होत्या आणि मशीद पडल्यानंतर त्यांनी रामजन्मभूमी येथील तात्पुरत्या मंदिरात मूर्ती ठेवल्या होत्या. अयोध्येतील नवीन श्री राम मंदिराच्या अभिषेक समारंभापासून सत्येंद्र दास त्याचे मुख्य पुजारी म्हणून काम करत होते. आचार्य सत्येंद्र दास यांनी नुकताच 11 जानेवारीला अयोध्येच्या नव्याने उभारण्यात आलेल्या श्री राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा पहिला वर्धापनदिन साजरा केला होता. त्यांनी वयाच्या 20व्या वर्षी आध्यात्मिक मार्ग स्वीकारला आणि आपले जीवन धार्मिक सेवेसाठी समर्पित केले. आचार्य सत्येंद्र दास यांनी 2024च्या “द बॅटल ऑफ अयोध्या” या माहितीपट मालिकेतही काम केले होते.

Continue reading

४ दिवसांत आज पुन्हा पेट्रोल व डिझेल महागले!

देशात गेल्या चार दिवसांत आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेल महागले. पेट्रोलच्या किंमतीत ८७ पैसे प्रति लीटर तर डिझेसच्या किंमतीत ९१ पैसे प्रति लीटर वाढ करण्यात आली आहे. आज, मंगळवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ अंमलात आली आहे. तीन दिवसांपूर्वी १६ मे...

अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांसाठी २० मेपासून प्रवेश

दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान तसेच वास्तुकला पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७साठी येत्या २० मेपासून प्रवेशप्रक्रिया सुरू होत आहे. ही प्रवेशप्रक्रिया वेळेत राबविण्यासाठी कालबद्ध नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांना...

आधार समुदाय पोहोच शिबिरांचे यशस्वी आयोजन

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI)अंतर्गत आधार सेवा केंद्र (ASK), वाशी यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) यांच्या सहकार्याने १० आणि ११ मे २०२६ रोजी नवी मुंबईतल्या महापे आणि सीबीडी बेलापूर येथे विशेष आधार...
Skip to content