Homeन्यूज अँड व्ह्यूजग्रामीण भागात डिजिटल...

ग्रामीण भागात डिजिटल कनेक्टीव्हिटी वाढणार?

डिजिटल समावेशनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ग्रामीण भागाच्या सामाजिक आर्थिक विकासासाठी, दूरसंचार विभागाने एक योजना सुरू केली असून त्याद्वारे, ग्रामीण भागात फायबर टु द होम (एफटीटीएच) ब्रॉड बॅन्ड सेवेचा विस्तार करण्यासाठी इंटरनेट सेवा प्रदात्यांना (आयएसपी) मान्यता दिली जाणार आहे.

योजनेची ठळक वैशिष्ट्ये :

या योजनेअंतर्गत, दूरसंचार विभागाने नऊ इंटरनेट सेवा प्रदाते निश्चित केले असून, अ, ब आणि क अशा तीन श्रेणीत प्रत्येकी तीन प्रदाते असतील. ज्यांनी, ग्रामीण भागात, एका वर्षात जास्तीत जास्त फायबर टु द होम जोडण्या दिल्या आहेत, अशा प्रदात्यांमधून या नऊ जणांची निवड करण्यात आली आहे.

या मान्यताप्राप्त प्रदात्यांना, प्रमाणपत्र आणि आयएसपी चे नाव दूरसंचार विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल. एका वर्षासाठी म्हणजेच एप्रिल ते मार्च या काळासाठी ही मान्यता असेल. पहिली मान्यता एक एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या काळासाठी असेल.

प्रत्येक श्रेणीसाठी किमान नेट जोडणीचे निकष खालीलप्रमाणे असतील:  

श्रेणी अ: या श्रेणीतील आयएसपी ने ग्रामीण फायबर टु द होम जोडण्याअंतर्गत,किमान 50,000 नेट जोडण्या देणे अपेक्षित आहे.

श्रेणी ब: या श्रेणीतील आयएसपी ने ग्रामीण फायबर टु द होम जोडण्याअंतर्गत,किमान 10,000 नेट जोडण्या देणे अपेक्षित आहे.

श्रेणी क: या श्रेणीतील आयएसपी ने ग्रामीण फायबर टु द होम जोडण्याअंतर्गत,किमान 2,000 नेट जोडण्या देणे अपेक्षित असेल.

यातून ग्रामीण भागाचा सामाजिक आर्थिक विकास आणि देशाच्या सर्वसमावेशक वृद्धीचे उद्दिष्ट साध्य होणार आहे. योजनेविषयी अधिक माहितीसाठी, कृपया दूरसंचार विभागाचे अधिकृत संकेतस्थळ https://dot.gov.in/data-services/2574 ला भेट द्या.

Continue reading

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...
Skip to content