Homeन्यूज अँड व्ह्यूजग्रामीण भागात डिजिटल...

ग्रामीण भागात डिजिटल कनेक्टीव्हिटी वाढणार?

डिजिटल समावेशनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ग्रामीण भागाच्या सामाजिक आर्थिक विकासासाठी, दूरसंचार विभागाने एक योजना सुरू केली असून त्याद्वारे, ग्रामीण भागात फायबर टु द होम (एफटीटीएच) ब्रॉड बॅन्ड सेवेचा विस्तार करण्यासाठी इंटरनेट सेवा प्रदात्यांना (आयएसपी) मान्यता दिली जाणार आहे.

योजनेची ठळक वैशिष्ट्ये :

या योजनेअंतर्गत, दूरसंचार विभागाने नऊ इंटरनेट सेवा प्रदाते निश्चित केले असून, अ, ब आणि क अशा तीन श्रेणीत प्रत्येकी तीन प्रदाते असतील. ज्यांनी, ग्रामीण भागात, एका वर्षात जास्तीत जास्त फायबर टु द होम जोडण्या दिल्या आहेत, अशा प्रदात्यांमधून या नऊ जणांची निवड करण्यात आली आहे.

या मान्यताप्राप्त प्रदात्यांना, प्रमाणपत्र आणि आयएसपी चे नाव दूरसंचार विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल. एका वर्षासाठी म्हणजेच एप्रिल ते मार्च या काळासाठी ही मान्यता असेल. पहिली मान्यता एक एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या काळासाठी असेल.

प्रत्येक श्रेणीसाठी किमान नेट जोडणीचे निकष खालीलप्रमाणे असतील:  

श्रेणी अ: या श्रेणीतील आयएसपी ने ग्रामीण फायबर टु द होम जोडण्याअंतर्गत,किमान 50,000 नेट जोडण्या देणे अपेक्षित आहे.

श्रेणी ब: या श्रेणीतील आयएसपी ने ग्रामीण फायबर टु द होम जोडण्याअंतर्गत,किमान 10,000 नेट जोडण्या देणे अपेक्षित आहे.

श्रेणी क: या श्रेणीतील आयएसपी ने ग्रामीण फायबर टु द होम जोडण्याअंतर्गत,किमान 2,000 नेट जोडण्या देणे अपेक्षित असेल.

यातून ग्रामीण भागाचा सामाजिक आर्थिक विकास आणि देशाच्या सर्वसमावेशक वृद्धीचे उद्दिष्ट साध्य होणार आहे. योजनेविषयी अधिक माहितीसाठी, कृपया दूरसंचार विभागाचे अधिकृत संकेतस्थळ https://dot.gov.in/data-services/2574 ला भेट द्या.

Continue reading

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...

आता फक्त २०० रुपयात करा कुटुंबातच होणाऱ्या वाटणीची मोजणी!

राज्यशासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत जमीन मोजणीच्या शुल्क आणि प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, आता कुटुंबातच होणाऱ्या संमतीच्या किंवा कोर्टाच्या वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपये प्रति पोटहिस्सा या नाममात्र शुल्कात केली...
Skip to content