HomeArchiveपाकिस्तानला जशास तसे...

पाकिस्तानला जशास तसे उत्तर देणे शक्य – मान्यवरांचा सूर

Details
पाकिस्तानला जशास तसे उत्तर देणे शक्य – मान्यवरांचा सूर

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
पाकिस्तानाच्या दहशतवादाला किंवा कुरापत्यांना जशास तसे उत्तर प्रत्येक पातळ्यांवर देणे शक्य आहे. प्रॉक्सी वॉर, मुत्सद्देगिरीशिवायच सैनिकी कारवाई, दहशतवादाविरूद्ध दहशतवादाने तसेच आर्थिक नाड्या आवळून एवढेच काय पण समाजमाध्यमं, प्रसारमाध्यमं अशा साध्या सोप्या पद्धतीने मानसिक खच्चीकरणदेखील करता येणे शक्य आहे, जेणेकरून त्या राष्ट्राला जेरबंद करून चांगलाच धडा शिकवता येऊ शकतो, असे विचार मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरच्या वतीने आय़ोजित पुलवामा आणि बालाकोटनंतर पाकिस्तानच्या दहशतवादाविरूद्ध करावयाच्या उपाययोजनांबद्दलच्या परिसंवादात ब्रिगेडिअर (निवृत्त) हेमंत महाजन यांनी व्यक्त केले.

 

प्रत्येक नागरिकामध्ये सैनिक दडलेला असावा, बांगलादेशी घुसखोरांना वेळीच रोखले पाहिजे तसेच मुख्य भूमीपासून 1200 किमी अंतरावर असलेल्या अंदमान आणि अन्य बेटांचा उपयोग सैनिकी तळ म्हणून व्हावा, या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांमागचा दृष्टीकोनदेखील स्पष्ट करून त्यांचे महत्त्वदेखील त्यांनी विशद केले.

पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांबाबतचे अभ्यासक आणि ज्येष्ठ पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी पाकिस्तानने केवळ दहशतवादी भारतात पाठविले नाही तर वेगवेगळ्या घटकांमध्येही त्यांचे हस्तक बसविले आहेत, मग ते राजकारण किंवा समाजकारण असो, त्यामुळेच एका विशिष्ट धर्माचे लांगुलचालन होताना दिसते. त्यामुळे फोफावलेले हे कट्टरपंथी काश्मिरमध्ये जवानांवर दगडफेक करण्याचे धाडस करतात, त्यांचबरोबर त्यांनी भारताच्या विविध भागांमध्ये 3900 दंगे घडवून आणले आहेत, असे सांगितले. आपण धर्मनिरपेक्षच्या दांभिक बुरख्यात वावरत असून प्रतिक्रिया देत नाही, याचा फायदा पाकिस्तान भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रोत्साहित होतो. हिंदू दहशतवादी ही व्याख्या मुळात चुकीची असून त्याचा बागुलबुवा म्हणजे एक मोठे षडयंत्र आहे. काऊंटर अॅटॅक हे तंत्र आपण यापुढे वापरले पाहिजे. आपली शक्ती ओळखून आपणच पाकिस्तानवर वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला झेपेल आणि जमेल, त्या पद्धतीने दबाव निर्माण केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

 

माजी नौदल उपप्रमुख अभय कर्वे यांनी इंडियन आर्मी ही अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने युद्ध करून आपले लक्ष्य साध्य करत असते. त्यामुळे आपल्या सैन्य दलाला अधिकाधिक अद्ययावत ठेवण्यावर भर दिला पाहिजे तसेच आवश्यक खर्चासाठी अर्थसंकल्पात पुरेसा निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. मग पाकिस्तानच काय अन्य राष्ट्रांनादेखील आपण पुरून उरू, असे सांगितले.

 

भारत हा अहिंसावादी देश असल्याचा प्रचार केला जातो, पण शांततेसाठी अहिंसक बनणे, हा तर्क अशक्यप्राय आहे, शांतीसाठी शक्तीचे प्रदर्शन आवश्यक आहे. कारण मारून युद्ध जिंकता येते, मरून नाही, हे ध्यानात ठेवले पाहिजे, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक काळे यांनी केले. या चर्चासत्रास पोलीस तसेच सैनिकी दलातील आजी-माजी वरिष्ठ अधिकारी, सावरकरभक्त तसेच देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
पाकिस्तानाच्या दहशतवादाला किंवा कुरापत्यांना जशास तसे उत्तर प्रत्येक पातळ्यांवर देणे शक्य आहे. प्रॉक्सी वॉर, मुत्सद्देगिरीशिवायच सैनिकी कारवाई, दहशतवादाविरूद्ध दहशतवादाने तसेच आर्थिक नाड्या आवळून एवढेच काय पण समाजमाध्यमं, प्रसारमाध्यमं अशा साध्या सोप्या पद्धतीने मानसिक खच्चीकरणदेखील करता येणे शक्य आहे, जेणेकरून त्या राष्ट्राला जेरबंद करून चांगलाच धडा शिकवता येऊ शकतो, असे विचार मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरच्या वतीने आय़ोजित पुलवामा आणि बालाकोटनंतर पाकिस्तानच्या दहशतवादाविरूद्ध करावयाच्या उपाययोजनांबद्दलच्या परिसंवादात ब्रिगेडिअर (निवृत्त) हेमंत महाजन यांनी व्यक्त केले.

 

प्रत्येक नागरिकामध्ये सैनिक दडलेला असावा, बांगलादेशी घुसखोरांना वेळीच रोखले पाहिजे तसेच मुख्य भूमीपासून 1200 किमी अंतरावर असलेल्या अंदमान आणि अन्य बेटांचा उपयोग सैनिकी तळ म्हणून व्हावा, या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांमागचा दृष्टीकोनदेखील स्पष्ट करून त्यांचे महत्त्वदेखील त्यांनी विशद केले.

पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांबाबतचे अभ्यासक आणि ज्येष्ठ पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी पाकिस्तानने केवळ दहशतवादी भारतात पाठविले नाही तर वेगवेगळ्या घटकांमध्येही त्यांचे हस्तक बसविले आहेत, मग ते राजकारण किंवा समाजकारण असो, त्यामुळेच एका विशिष्ट धर्माचे लांगुलचालन होताना दिसते. त्यामुळे फोफावलेले हे कट्टरपंथी काश्मिरमध्ये जवानांवर दगडफेक करण्याचे धाडस करतात, त्यांचबरोबर त्यांनी भारताच्या विविध भागांमध्ये 3900 दंगे घडवून आणले आहेत, असे सांगितले. आपण धर्मनिरपेक्षच्या दांभिक बुरख्यात वावरत असून प्रतिक्रिया देत नाही, याचा फायदा पाकिस्तान भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रोत्साहित होतो. हिंदू दहशतवादी ही व्याख्या मुळात चुकीची असून त्याचा बागुलबुवा म्हणजे एक मोठे षडयंत्र आहे. काऊंटर अॅटॅक हे तंत्र आपण यापुढे वापरले पाहिजे. आपली शक्ती ओळखून आपणच पाकिस्तानवर वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला झेपेल आणि जमेल, त्या पद्धतीने दबाव निर्माण केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

 

माजी नौदल उपप्रमुख अभय कर्वे यांनी इंडियन आर्मी ही अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने युद्ध करून आपले लक्ष्य साध्य करत असते. त्यामुळे आपल्या सैन्य दलाला अधिकाधिक अद्ययावत ठेवण्यावर भर दिला पाहिजे तसेच आवश्यक खर्चासाठी अर्थसंकल्पात पुरेसा निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. मग पाकिस्तानच काय अन्य राष्ट्रांनादेखील आपण पुरून उरू, असे सांगितले.

 

भारत हा अहिंसावादी देश असल्याचा प्रचार केला जातो, पण शांततेसाठी अहिंसक बनणे, हा तर्क अशक्यप्राय आहे, शांतीसाठी शक्तीचे प्रदर्शन आवश्यक आहे. कारण मारून युद्ध जिंकता येते, मरून नाही, हे ध्यानात ठेवले पाहिजे, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक काळे यांनी केले. या चर्चासत्रास पोलीस तसेच सैनिकी दलातील आजी-माजी वरिष्ठ अधिकारी, सावरकरभक्त तसेच देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.”
 
 
 

Continue reading

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...
Skip to content