Tuesday, September 17, 2024
HomeArchiveमुंबईच्या प्रवेशद्वारावर महिलांसाठी...

मुंबईच्या प्रवेशद्वारावर महिलांसाठी वातानुकूलित स्वछतागृह!

Details
मुंबईच्या प्रवेशद्वारावर महिलांसाठी वातानुकूलित स्वछतागृह!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

उद्या अमृता फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन

केएचएल न्यूज ब्युरो
मुंबईत प्रवेश करणाऱ्या पूर्व व पश्चिम द्रूतगती मार्गावर महिलांसाठी स्वछतागृह नसल्याने लांबचा प्रवास करून येणाऱ्या महिलांची कुचंबणा रोजचीच होऊन बसली आहे. या परिस्थितीचा विचार करून भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या प्रयत्नातून मुंबईतील एकमेव व वातानुकूलित फक्त महिलांसाठी स्वछतागृह साकारले आहे. सामाजिक प्रश्नावर भान जागविणाऱ्या अमृता देवेंद्र फडणवीस यांच्याच हस्ते रविवारी या स्वच्छतागृहाचे उदघाटन होणार आहे.

दहिसर नाका म्हणजे मुंबईचे प्रवेशद्वार. या पश्चिम द्रूतगती मार्गावर वाहने प्रचंड संख्येने मुंबईत येत असतात. मात्र या मार्गावर महिलांसाठीचे स्वच्छतागृह शोधूनही सापडत नाही. त्यामुळे अत्यंत दर्जेदार आणि तेही फक्त महिलांसाठी स्वछतागृह उभारण्यासाठी दहिसर नाक्याची निवड करण्यात आली आहे. या स्वछतागृहात दोन सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनही बसविण्यात आली आहेत. या शौचालयासाठी स्वच्छता आणि सुरक्षेच्या दृष्टीने हाय मास्ट लॅम्प बसविण्यात आला आहे. हे शौचालय मुंबईसाठी एक पॅटर्न म्हणून पुढे यावे अशी रचना करण्यात आली आहे.

 

पालघर, वसई विरारकडून मोठा प्रवास करून मुंबईत प्रवेश करणाऱ्या महिलांसाठी, प्रवेशद्वारावरच फक्त महिलांसाठी हे स्वछतागृह उपलब्ध झाल्याने महिला वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः येथे महिलांच्या सन्मान आणि सुरक्षेच्या दृष्टीनेसुद्धा पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे स्वछतागृहाच्या परिसरात बसविण्यात आले आहेत.

स्वच्छ व सुरक्षित स्वच्छतागृहाची गरज

यापूर्वी कांदिवली हायवेला आमदार प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातून वातानुकूलित स्वच्छतागृह उभारण्यात आले होते. त्याची पाहणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. या स्वच्छ व नीटनेटक्या स्वच्छतागृहाचे कौतुक करीत, महिलांसाठीही असेच स्वच्छ व सुरक्षित स्वछतागृह असावे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या. त्यानुसार दहिसर चेकनाक्याजवळ महिलांसाठी अद्ययावत स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे.”
 
“उद्या अमृता फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन

केएचएल न्यूज ब्युरो
मुंबईत प्रवेश करणाऱ्या पूर्व व पश्चिम द्रूतगती मार्गावर महिलांसाठी स्वछतागृह नसल्याने लांबचा प्रवास करून येणाऱ्या महिलांची कुचंबणा रोजचीच होऊन बसली आहे. या परिस्थितीचा विचार करून भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या प्रयत्नातून मुंबईतील एकमेव व वातानुकूलित फक्त महिलांसाठी स्वछतागृह साकारले आहे. सामाजिक प्रश्नावर भान जागविणाऱ्या अमृता देवेंद्र फडणवीस यांच्याच हस्ते रविवारी या स्वच्छतागृहाचे उदघाटन होणार आहे.

दहिसर नाका म्हणजे मुंबईचे प्रवेशद्वार. या पश्चिम द्रूतगती मार्गावर वाहने प्रचंड संख्येने मुंबईत येत असतात. मात्र या मार्गावर महिलांसाठीचे स्वच्छतागृह शोधूनही सापडत नाही. त्यामुळे अत्यंत दर्जेदार आणि तेही फक्त महिलांसाठी स्वछतागृह उभारण्यासाठी दहिसर नाक्याची निवड करण्यात आली आहे. या स्वछतागृहात दोन सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनही बसविण्यात आली आहेत. या शौचालयासाठी स्वच्छता आणि सुरक्षेच्या दृष्टीने हाय मास्ट लॅम्प बसविण्यात आला आहे. हे शौचालय मुंबईसाठी एक पॅटर्न म्हणून पुढे यावे अशी रचना करण्यात आली आहे.

 

पालघर, वसई विरारकडून मोठा प्रवास करून मुंबईत प्रवेश करणाऱ्या महिलांसाठी, प्रवेशद्वारावरच फक्त महिलांसाठी हे स्वछतागृह उपलब्ध झाल्याने महिला वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः येथे महिलांच्या सन्मान आणि सुरक्षेच्या दृष्टीनेसुद्धा पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे स्वछतागृहाच्या परिसरात बसविण्यात आले आहेत.

स्वच्छ व सुरक्षित स्वच्छतागृहाची गरज

यापूर्वी कांदिवली हायवेला आमदार प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातून वातानुकूलित स्वच्छतागृह उभारण्यात आले होते. त्याची पाहणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. या स्वच्छ व नीटनेटक्या स्वच्छतागृहाचे कौतुक करीत, महिलांसाठीही असेच स्वच्छ व सुरक्षित स्वछतागृह असावे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या. त्यानुसार दहिसर चेकनाक्याजवळ महिलांसाठी अद्ययावत स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे.”
 

Continue reading

बुधवारी खुली राहणार भायखळ्यातली ‘राणीची बाग’!

मुंबईतल्या भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय (म्हणजेच पूर्वीची राणीची बाग) येत्या बुधवारी, १८ सप्टेंबरला जनतेकरिता खुले राहणार आहे. त्याऐवजी हे उद्यान दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार, १९ सप्टेंबर रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाकडून प्रसिद्ध...

यापुढे ‘बाबू’ ठरवणार, सणवार कधी साजरे करायचे ते?

यापुढे मुहूर्त, रितीरिवाज, चालीरीती, परंपरा अशा सर्व बाबींना तिलांजली दिली जाणार आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या मनात येईल त्याप्रमाणे या महाराष्ट्रातील जनता सण, उत्सव साजरे करेल असे एकूण चित्र दिसते. आज होणारी ईद असो किंवा गणेशोत्सव, सरकारी बाबू म्हणतील त्याप्रमाणे हे...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोलांटउडी! 

दारू घोटाळ्यात अडकलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या अटींवर कोणतेही भाष्य न करता जनतेचा कौल मागण्यासाठी आपण मुख्यमंत्रीपद सोडत असल्याचा आव आणत त्यांनी जनतेच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते. नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी...
error: Content is protected !!
Skip to content