HomeArchiveमुंबईच्या विकास आराखडयाच्या...

मुंबईच्या विकास आराखडयाच्या अंमलबजावणीसाठी केंद्राचे विशेष पॅकेज आणणार

Details
मुंबईच्या विकास आराखडयाच्या अंमलबजावणीसाठी केंद्राचे विशेष पॅकेज आणणार

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांचे आश्वासन
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईच्या विकास आराखडयाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारकडून 14 लाख 600 कोटींचे विशेष पॅकेज आणण्यासाठी पुढील पाच वर्षांत प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन, शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी दिले.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापात शेवाळे बोलत होते. पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या या वार्तालापापूर्वी अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी शेवाळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी कोषाध्यक्ष मंगेश वरवडेकर, कार्यकारिणी सदस्या स्वाती घोसाळकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून गेल्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले राहुल शेवाळे पुन्हा एकदा याच मतदारसंघातून महायुतीच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून आल्यावर आपण कोणत्या कामाला प्राधान्य द्याल, असा प्रश्न पत्रकारांनी राहुल शेवाळे यांना विचारला. त्यावर उत्तर देताना शेवाळे म्हणाले, मुंबईचा खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी कोणतीही मोठी गोष्ट न करता केवळ मुंबई विकास आराखड्याची 100% अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. गेल्या वेळेस जो विकास आराखडा मंजूर झाला होता, त्यातील केवळ 7 टक्के आराखड्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात झाली. जगातील कोणत्याही देशात विकास आराखड्याची इतकी अल्प अंमलबजावणी होत नसावी. यंदाचा विकास आराखडा तयार झाला असून त्याच्या अंमलबजावणीसाठी 14 लाख 600 कोटींच्या निधीची गरज आहे. मात्र, मुंबई महानगरपालिकेला इतका अवाढव्य खर्च शक्य नसल्याने पालिकेने यासाठी केवळ 3400 कोटींची तरतूद केली आहे. या वेगाने आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी तब्बल 100 वर्षांचा अवधी लागेल. म्हणून या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने विशेष पॅकेज द्यायला हवे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.

केंद्र सरकारने मुंबईच्या विकास आराखड्याला निधी दिला तर ती त्यांची गुंतवणूक असेल. कारण मुंबईचा विकास झाला तर केंद्र सरकारलाही मोठ्या प्रमाणात टॅक्स मिळू शकेल. यासाठीच 14 लाख 600 कोटींचे विशेष पॅकेज देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही शेवाळे यांनी स्पष्ट केले. विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका या तीनही आस्थापनांनी समन्वय साधणे गरजेचे असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली.”
 
“महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांचे आश्वासन
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईच्या विकास आराखडयाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारकडून 14 लाख 600 कोटींचे विशेष पॅकेज आणण्यासाठी पुढील पाच वर्षांत प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन, शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी दिले.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापात शेवाळे बोलत होते. पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या या वार्तालापापूर्वी अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी शेवाळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी कोषाध्यक्ष मंगेश वरवडेकर, कार्यकारिणी सदस्या स्वाती घोसाळकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून गेल्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले राहुल शेवाळे पुन्हा एकदा याच मतदारसंघातून महायुतीच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून आल्यावर आपण कोणत्या कामाला प्राधान्य द्याल, असा प्रश्न पत्रकारांनी राहुल शेवाळे यांना विचारला. त्यावर उत्तर देताना शेवाळे म्हणाले, मुंबईचा खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी कोणतीही मोठी गोष्ट न करता केवळ मुंबई विकास आराखड्याची 100% अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. गेल्या वेळेस जो विकास आराखडा मंजूर झाला होता, त्यातील केवळ 7 टक्के आराखड्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात झाली. जगातील कोणत्याही देशात विकास आराखड्याची इतकी अल्प अंमलबजावणी होत नसावी. यंदाचा विकास आराखडा तयार झाला असून त्याच्या अंमलबजावणीसाठी 14 लाख 600 कोटींच्या निधीची गरज आहे. मात्र, मुंबई महानगरपालिकेला इतका अवाढव्य खर्च शक्य नसल्याने पालिकेने यासाठी केवळ 3400 कोटींची तरतूद केली आहे. या वेगाने आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी तब्बल 100 वर्षांचा अवधी लागेल. म्हणून या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने विशेष पॅकेज द्यायला हवे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.

केंद्र सरकारने मुंबईच्या विकास आराखड्याला निधी दिला तर ती त्यांची गुंतवणूक असेल. कारण मुंबईचा विकास झाला तर केंद्र सरकारलाही मोठ्या प्रमाणात टॅक्स मिळू शकेल. यासाठीच 14 लाख 600 कोटींचे विशेष पॅकेज देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही शेवाळे यांनी स्पष्ट केले. विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका या तीनही आस्थापनांनी समन्वय साधणे गरजेचे असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली.”
 

Continue reading

मुंबईत पालिका सुविधा केंद्रात जन्म-मृत्यू नोंदणीसाठी स्वतंत्र खिडकी

मुंबई महापालिका क्षेत्रातील जन्म व मृत्यूंची नोंदणी करण्यासाठी तसेच नोंदणीकृत जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांतील आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी पालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयातल्या नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिक सेवा केंद्रात ऑनलाईन सेवा विभागस्तरावर जन्म...

‘माझ्या सोन्या’तली अभिनेत्री ऐश्वर्या नक्की आहे तरी कोण?

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत वेगाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री, निर्माती आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर ऐश्वर्या हरिशंकर सध्या चांगल्याच चर्चेत आहे. अमेरिकेतील डेट्रॉईट (मिशिगन) येथे जन्मलेल्या आणि पुण्यात वाढलेल्या ऐश्वर्याने अवघ्या २१व्या वर्षी अभिनय, चित्रपट निर्मिती आणि सोशल मीडिया...

शिक्षणाचे माहेरघर पुणे ठरले ‘नीट’ पेपरफुटीमागचे मुख्य केंद्र!

वैद्यकीय प्रवेश अर्थात 'नीट' परीक्षेचा पेपर छापखान्यातून फुटला नव्हता. उलट नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच 'एनटीए'च्याच मंडळींनी नीट पेपर फोडण्याचा उद्योग केला आहे. गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय)ने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात हा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. 'एनटीए'च्या विषय...
Skip to content