Tuesday, September 17, 2024
HomeArchiveमुलुंड-गोरेगाव लिंक रोड...

मुलुंड-गोरेगाव लिंक रोड नियोजित वेळेतच पूर्ण होणार – मनोज कोटक

Details
मुलुंड-गोरेगाव लिंक रोड नियोजित वेळेतच पूर्ण होणार – मनोज कोटक

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा आणि ईशान्य मुंबई मतदारसंघासाठी महत्त्वाचाअसलेला मुलुंड-गोरेगाव लिंक रोड नियोजित वेळेत सुरू होऊन वेळेत पूर्ण होणारच, असा विश्वास महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी व्यक्त केला आहे. गोरेगाव फिल्मसिटी ते अमर नगर नाहूर, हा १४ किमी.चा सहापदरी नियोजित मार्ग ईशान्य मुंबईत राहणाऱ्या मुंबईकरांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा ठरणार असून त्यामुळे घाटकोपर, विक्रोळी व मुलुंड परिसरातील वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे.

मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या या प्रकल्पाची संकल्पना सर्वप्रथम १९६० साली मांडण्यात आली होती. मात्र इतकी वर्षे कागदावर असलेला हा प्रकल्प केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर झटपट मार्गी लागला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून हा मार्ग जाणार असला तराही या नियोजित मार्गामुळे राष्ट्रीय उद्यानातील जैवविविधतेला कोणताही धोका पोहोचणार नसल्याने नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफनेही या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. मुंबई महापालिकेने तयार केलेला हा प्रस्ताव राज्यशासनाच्या वन विभागाने मंजूर करून अंतिम मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवला आहे. तीन हजार कोटींचा अंदाजित खर्च असलेल्या या प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेत तसेच राज्यशासनाच्या पातळीवर भाजपने जोरदार प्रयत्न केले आहेत.

या प्रकल्पाबाबत बोलताना कोटक म्हणाले की, मुलुंड-गोरेगाव लिंक रोड या माझ्या मतदारसंघातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आम्ही महापालिकेत जोरदार पाठपुरावा केला होता. याशिवाय केंद्र आणि राज्यसरकारच्या पातळीवर ज्या अडचणी आल्या, त्यातूनही कायदेशीर चौकटीत राहून आम्ही मार्ग काढला. आता केंद्राच्या औपचारिक मंजुरीनंतर येत्या ऑक्टोबर महिन्यात हा प्रकल्प सुरू होणार असून नियोजित वेळेत तो पूर्ण होईल, असा आपणास विश्वास आहे. त्यासाठी आपण खासदार म्हणून आवश्यक तो सर्वपाठपुरावा करणार आहोत.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा आणि ईशान्य मुंबई मतदारसंघासाठी महत्त्वाचाअसलेला मुलुंड-गोरेगाव लिंक रोड नियोजित वेळेत सुरू होऊन वेळेत पूर्ण होणारच, असा विश्वास महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी व्यक्त केला आहे. गोरेगाव फिल्मसिटी ते अमर नगर नाहूर, हा १४ किमी.चा सहापदरी नियोजित मार्ग ईशान्य मुंबईत राहणाऱ्या मुंबईकरांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा ठरणार असून त्यामुळे घाटकोपर, विक्रोळी व मुलुंड परिसरातील वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे.

मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या या प्रकल्पाची संकल्पना सर्वप्रथम १९६० साली मांडण्यात आली होती. मात्र इतकी वर्षे कागदावर असलेला हा प्रकल्प केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर झटपट मार्गी लागला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून हा मार्ग जाणार असला तराही या नियोजित मार्गामुळे राष्ट्रीय उद्यानातील जैवविविधतेला कोणताही धोका पोहोचणार नसल्याने नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफनेही या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. मुंबई महापालिकेने तयार केलेला हा प्रस्ताव राज्यशासनाच्या वन विभागाने मंजूर करून अंतिम मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवला आहे. तीन हजार कोटींचा अंदाजित खर्च असलेल्या या प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेत तसेच राज्यशासनाच्या पातळीवर भाजपने जोरदार प्रयत्न केले आहेत.

या प्रकल्पाबाबत बोलताना कोटक म्हणाले की, मुलुंड-गोरेगाव लिंक रोड या माझ्या मतदारसंघातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आम्ही महापालिकेत जोरदार पाठपुरावा केला होता. याशिवाय केंद्र आणि राज्यसरकारच्या पातळीवर ज्या अडचणी आल्या, त्यातूनही कायदेशीर चौकटीत राहून आम्ही मार्ग काढला. आता केंद्राच्या औपचारिक मंजुरीनंतर येत्या ऑक्टोबर महिन्यात हा प्रकल्प सुरू होणार असून नियोजित वेळेत तो पूर्ण होईल, असा आपणास विश्वास आहे. त्यासाठी आपण खासदार म्हणून आवश्यक तो सर्वपाठपुरावा करणार आहोत.”

Continue reading

बुधवारी खुली राहणार भायखळ्यातली ‘राणीची बाग’!

मुंबईतल्या भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय (म्हणजेच पूर्वीची राणीची बाग) येत्या बुधवारी, १८ सप्टेंबरला जनतेकरिता खुले राहणार आहे. त्याऐवजी हे उद्यान दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार, १९ सप्टेंबर रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाकडून प्रसिद्ध...

यापुढे ‘बाबू’ ठरवणार, सणवार कधी साजरे करायचे ते?

यापुढे मुहूर्त, रितीरिवाज, चालीरीती, परंपरा अशा सर्व बाबींना तिलांजली दिली जाणार आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या मनात येईल त्याप्रमाणे या महाराष्ट्रातील जनता सण, उत्सव साजरे करेल असे एकूण चित्र दिसते. आज होणारी ईद असो किंवा गणेशोत्सव, सरकारी बाबू म्हणतील त्याप्रमाणे हे...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोलांटउडी! 

दारू घोटाळ्यात अडकलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या अटींवर कोणतेही भाष्य न करता जनतेचा कौल मागण्यासाठी आपण मुख्यमंत्रीपद सोडत असल्याचा आव आणत त्यांनी जनतेच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते. नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी...
error: Content is protected !!
Skip to content