HomeArchiveजयंत पाटील, वेळीच...

जयंत पाटील, वेळीच सावरा – उद्धव ठाकरे

Details
“जयंत पाटील, वेळीच सावरा – उद्धव ठाकरे”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
जयंत पाटील या मातीशी आणि जमिनीशी द्रोह करू नका. तुम्ही चुकीच्या मार्गाने जात आहात. वेळीच तुम्ही सावरा. पाकिस्तान आमचा दुश्मन आहे, तसा तुमचा दुश्मन आहे. जर उद्या युद्ध झाले पाकिस्तानने टाकलेला बॉम्ब घर पाहून पडणार नाही. धर्म बघून पडणार नाही. म्हणून सर्व मुसलमान बांधवांना आवाहन आहे की देशासाठी एकत्र या, असे आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी माणगाव येथील जाहीर सभेत केले.

आपल्यासमोर मुद्दा सरळ आहे. उमेदवार कसा आहे, तो काय करणार आहे? रायगड म्हणजे शिवराय. अंतुले साहेबांनी कुलाबा याचे रायगड असे नाव केले, असे आमचे जुने नाते आहे. धनुष्यबाणाला मत म्हणजे स्वतःच्या हितासाठी दिलेले मत. आमचे भाजपसोबत मतभेद होते. ते वैयक्तिक नसून जनतेसाठी होते आणि आताही युतीसुद्धा जनतेसाठीच केलेली आहे. युती ही देव, देश आणि धर्मासाठी केली. पाच वर्षे आम्ही काम करत असताना हे थंडगार झोपले होते आणि आता निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांची भेट घेत आहेत. आता शरद पवार यांना दुष्काळग्रस्त शेतकरी दिसतो आहे का, असा सवालही त्यांनी केला.

गीते साहेब तुमच्यात आणि तटकरे यामध्ये खूप फरक आहे. त्यांनी किती प्रॉपर्टी जमवलेली आहे. तुम्हाला ते इतके वेळेस खासदार करूनही जमले नाही. माझ्या कोकणवासियांची जमीन घेऊन हे कारखानदार होणार आणि माझ्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार हे आम्हाला पटणारे नाही. शिवराय यांना आपण देव का मानतो, कारण तो रयतेचा राजा होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी 50 ते 60 वर्षांत केंद्रात आणि राज्यात सत्ता केली. ते इतके माजले आहेत की पाच वर्षांत सुधारतील का, असा सवालही ठाकरे यांनी केला.

 

देशद्रोहाचे कलम काँग्रेसवाले काढून टाकणार. हे तुम्हा मतदारांना पटतंय का? आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे ठरलेले आहेत. काँग्रेसमध्ये त्यांचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही. या देशाचे मुसलमानदेखील आमच्या सोबत आहेत. प्रत्येक मतदाराचं मत देशाचं भवितव्य घडवणारे आहे. गेली ६० ते ६५ वर्षे काँग्रेस आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी घोटाळ्यांमागून घोटाळे करत देशावर दरोडा घातला. अशा काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुपडासाफ करा, असे आवाहनही त्यांनी केले.

तटकरे तुम्ही काय केले?

गीतेसाहेब तुम्ही विचारायचे होते की, तटकरे तुम्ही काय केले? उत्तर मिळेल की अनेक जमिनींमध्ये गुंतवणूक आहे. 100 कंपन्या आहेत. 100 हून अधिक कंपन्या तटकरे यांच्या आहेत. 800 एकर जमीन आपल्या नावाने आहे. धीरूभाई अंबानी यांच्या 32 आणि तुमच्या 100, ही प्रगती नैसर्गिक आहे का? जमीन आणि कंपन्यांसाठी तुमच्याकडे पैसे कुठून आले, असा सवाल शिवसेनेचे सुभाष देसाई यांनी यावेळी केला.

प्रतिज्ञापत्रात पैशांचा उल्लेख केला गेलेला नाही. तुमचा मुलगा तुमच्यासोबत असतो. राहतो, फिरतो, मग तुम्हाला व्यवहार माहीत नाही यावर विश्वास कसा ठेवायचा? भ्रष्टाचाराने करोडो कमावणाऱ्या सुनील तटकरेंसारख्या नेत्याला तुम्ही निवडून देणार का, असेही ते म्हणाले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
जयंत पाटील या मातीशी आणि जमिनीशी द्रोह करू नका. तुम्ही चुकीच्या मार्गाने जात आहात. वेळीच तुम्ही सावरा. पाकिस्तान आमचा दुश्मन आहे, तसा तुमचा दुश्मन आहे. जर उद्या युद्ध झाले पाकिस्तानने टाकलेला बॉम्ब घर पाहून पडणार नाही. धर्म बघून पडणार नाही. म्हणून सर्व मुसलमान बांधवांना आवाहन आहे की देशासाठी एकत्र या, असे आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी माणगाव येथील जाहीर सभेत केले.

आपल्यासमोर मुद्दा सरळ आहे. उमेदवार कसा आहे, तो काय करणार आहे? रायगड म्हणजे शिवराय. अंतुले साहेबांनी कुलाबा याचे रायगड असे नाव केले, असे आमचे जुने नाते आहे. धनुष्यबाणाला मत म्हणजे स्वतःच्या हितासाठी दिलेले मत. आमचे भाजपसोबत मतभेद होते. ते वैयक्तिक नसून जनतेसाठी होते आणि आताही युतीसुद्धा जनतेसाठीच केलेली आहे. युती ही देव, देश आणि धर्मासाठी केली. पाच वर्षे आम्ही काम करत असताना हे थंडगार झोपले होते आणि आता निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांची भेट घेत आहेत. आता शरद पवार यांना दुष्काळग्रस्त शेतकरी दिसतो आहे का, असा सवालही त्यांनी केला.

गीते साहेब तुमच्यात आणि तटकरे यामध्ये खूप फरक आहे. त्यांनी किती प्रॉपर्टी जमवलेली आहे. तुम्हाला ते इतके वेळेस खासदार करूनही जमले नाही. माझ्या कोकणवासियांची जमीन घेऊन हे कारखानदार होणार आणि माझ्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार हे आम्हाला पटणारे नाही. शिवराय यांना आपण देव का मानतो, कारण तो रयतेचा राजा होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी 50 ते 60 वर्षांत केंद्रात आणि राज्यात सत्ता केली. ते इतके माजले आहेत की पाच वर्षांत सुधारतील का, असा सवालही ठाकरे यांनी केला.

 

देशद्रोहाचे कलम काँग्रेसवाले काढून टाकणार. हे तुम्हा मतदारांना पटतंय का? आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे ठरलेले आहेत. काँग्रेसमध्ये त्यांचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही. या देशाचे मुसलमानदेखील आमच्या सोबत आहेत. प्रत्येक मतदाराचं मत देशाचं भवितव्य घडवणारे आहे. गेली ६० ते ६५ वर्षे काँग्रेस आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी घोटाळ्यांमागून घोटाळे करत देशावर दरोडा घातला. अशा काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुपडासाफ करा, असे आवाहनही त्यांनी केले.

तटकरे तुम्ही काय केले?

गीतेसाहेब तुम्ही विचारायचे होते की, तटकरे तुम्ही काय केले? उत्तर मिळेल की अनेक जमिनींमध्ये गुंतवणूक आहे. 100 कंपन्या आहेत. 100 हून अधिक कंपन्या तटकरे यांच्या आहेत. 800 एकर जमीन आपल्या नावाने आहे. धीरूभाई अंबानी यांच्या 32 आणि तुमच्या 100, ही प्रगती नैसर्गिक आहे का? जमीन आणि कंपन्यांसाठी तुमच्याकडे पैसे कुठून आले, असा सवाल शिवसेनेचे सुभाष देसाई यांनी यावेळी केला.

प्रतिज्ञापत्रात पैशांचा उल्लेख केला गेलेला नाही. तुमचा मुलगा तुमच्यासोबत असतो. राहतो, फिरतो, मग तुम्हाला व्यवहार माहीत नाही यावर विश्वास कसा ठेवायचा? भ्रष्टाचाराने करोडो कमावणाऱ्या सुनील तटकरेंसारख्या नेत्याला तुम्ही निवडून देणार का, असेही ते म्हणाले.”
 

Continue reading

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...
Skip to content