HomeArchiveबीडीडी चाळींच्या पुनर्वसनासाठी...

बीडीडी चाळींच्या पुनर्वसनासाठी दर महिन्याला आढावा – मधु चव्हाण

Details
बीडीडी चाळींच्या पुनर्वसनासाठी दर महिन्याला आढावा – मधु चव्हाण

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

कामात व्यत्यय आणणाऱ्यांसाठी ऑर्डीनन्स काढणार
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
बीडीडी चाळीच्या पुनर्वसनाच्या कामाला गती मिळावी म्हणून प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेला म्हाडामध्ये आढावा बैठक घेण्यात येणार असून या पुनर्वसनाच्या कामात अडथळा आणणाऱ्या कायदेशीर कारवाई करण्यासाठी २३ मेनंतर अध्यादेश काढण्यात येणार असल्याची माहिती मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सभापती मधु चव्हाण यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत दिली.
बीडीडी चाळीच्या रहिवाशांना संक्रमण शिबिरात जागा देण्यात येणार असून ३० महिन्यात ते त्यांच्या पुनर्वसनाच्या जागेत राहण्यास जातील. ५०० चौ.फूट जागा प्रत्येक गाळेधारकांना देण्यात येणार असल्याचे मधु चव्हाण यांनी यावेळी सांगितले. विशेष म्हणजे पुनर्वसन होणाऱ्या रहिवाशांचे मेंटेनंस दहा वर्षे म्हाडा भरणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

नायगाव बीडीडी चाळीतील पुनर्वसन गाळ्याची संख्या निवासी ३३८९ व अनिवासी ५५ आहे. पुनर्वसन इमारत २३ मजल्यापर्यंत आणि विक्रीयोग्य इमारत ६० मजल्यापर्यंत असणार आहे, अशी माहिती देऊन चव्हाण यांनी मध्यम उत्पन्न गटासाठी १,४०८ विक्रीयोग्य गाळे, उच्च उत्पन्न गटासाठी ४४८ गाळे, तर व्यापारी क्षेत्रासाठी २१,४५५.९१ चौ.मी. जागा उपलब्ध आहे. ना. म. जोशी मार्ग, लोअर परळ बीडीडी चाळीत निवासी गाळे २,४५६ व अनिवासी गाळे २४ असतील. यामध्ये मध्यम उत्पन्न गटासाठी ७२८ गाळे तर उच्च उत्पन्न गटासाठी ५४० गाळे आणि व्यापारी क्षेत्रासाठी २६, ६३६ चौ. मी. जागा मिळणार आहे. वरळी बीडीडी चाळीत निवासी गाळे ९,३१४ तर अनिवासी गाळे २९५ असतील. वरळी बीडीडी चाळी प्रकल्पात विक्रीयोग्य मध्यम उत्पन्न गटाना ३,२२४, उच्च उत्पन्न गटासाठी १,७७२ गाळे असतील. या प्रकल्पात ९८,०१४ चौ.मी. व्यापारी क्षेत्रासाठी उपलब्ध असणार आहे, असे चव्हाण म्हणाले.”
 
“कामात व्यत्यय आणणाऱ्यांसाठी ऑर्डीनन्स काढणार
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
बीडीडी चाळीच्या पुनर्वसनाच्या कामाला गती मिळावी म्हणून प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेला म्हाडामध्ये आढावा बैठक घेण्यात येणार असून या पुनर्वसनाच्या कामात अडथळा आणणाऱ्या कायदेशीर कारवाई करण्यासाठी २३ मेनंतर अध्यादेश काढण्यात येणार असल्याची माहिती मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सभापती मधु चव्हाण यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत दिली.
बीडीडी चाळीच्या रहिवाशांना संक्रमण शिबिरात जागा देण्यात येणार असून ३० महिन्यात ते त्यांच्या पुनर्वसनाच्या जागेत राहण्यास जातील. ५०० चौ.फूट जागा प्रत्येक गाळेधारकांना देण्यात येणार असल्याचे मधु चव्हाण यांनी यावेळी सांगितले. विशेष म्हणजे पुनर्वसन होणाऱ्या रहिवाशांचे मेंटेनंस दहा वर्षे म्हाडा भरणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

नायगाव बीडीडी चाळीतील पुनर्वसन गाळ्याची संख्या निवासी ३३८९ व अनिवासी ५५ आहे. पुनर्वसन इमारत २३ मजल्यापर्यंत आणि विक्रीयोग्य इमारत ६० मजल्यापर्यंत असणार आहे, अशी माहिती देऊन चव्हाण यांनी मध्यम उत्पन्न गटासाठी १,४०८ विक्रीयोग्य गाळे, उच्च उत्पन्न गटासाठी ४४८ गाळे, तर व्यापारी क्षेत्रासाठी २१,४५५.९१ चौ.मी. जागा उपलब्ध आहे. ना. म. जोशी मार्ग, लोअर परळ बीडीडी चाळीत निवासी गाळे २,४५६ व अनिवासी गाळे २४ असतील. यामध्ये मध्यम उत्पन्न गटासाठी ७२८ गाळे तर उच्च उत्पन्न गटासाठी ५४० गाळे आणि व्यापारी क्षेत्रासाठी २६, ६३६ चौ. मी. जागा मिळणार आहे. वरळी बीडीडी चाळीत निवासी गाळे ९,३१४ तर अनिवासी गाळे २९५ असतील. वरळी बीडीडी चाळी प्रकल्पात विक्रीयोग्य मध्यम उत्पन्न गटाना ३,२२४, उच्च उत्पन्न गटासाठी १,७७२ गाळे असतील. या प्रकल्पात ९८,०१४ चौ.मी. व्यापारी क्षेत्रासाठी उपलब्ध असणार आहे, असे चव्हाण म्हणाले.”

Continue reading

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...
Skip to content