HomeArchiveकलम 370 रद्द...

कलम 370 रद्द व्हावे, ही बाळासाहेबांची इच्छा – राहुल शेवाळे

Details
“कलम 370 रद्द व्हावे, ही बाळासाहेबांची इच्छा – राहुल शेवाळे”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत मांडलेल्या ‘जम्मू-काश्मीर आरक्षण (दुरूस्ती) विधेयक 2019 ला शिवसेनेने समर्थन दिले. “कलम 370 रद्द व्हावे, यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच प्रत्येक केंद्र सरकारला इशारा दिला होता” अशा शब्दांत आपल्या भाषणाची सुरूवात करून खासदार राहुल शेवाळे यांनी विधेयक दुरूस्तीचे समर्थन केले. लोकसभेत या ऐतिहासिक विधेयकाची दुरूस्ती शुक्रवारी पारित झाली.

जम्मू-काश्मीर विधयेकाच्या दुरूस्तीला समर्थन देताना खासदार राहुल शेवाळे म्हणाले की, “1949 मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 370 चा ड्राफ्ट बनविण्यास नकार दिला होता. परंतु, नेहरूजींच्या सांगण्यावरून गोपालस्वामी अय्यंगार यांनी 370 कलमाचा ड्राफ्ट बनविला. मूळ रूपात या कलमात प्रोविजन होती की महाराजा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शिफारशींनुसार कार्य करेल, पण नेहरूजी आणि शेख अब्दुला यांच्या संगनमताने यात दुरूस्ती करून मंत्रिमंडळाऐवजी राज्य सरकार असा बदल करण्यात आला.”

 

आपल्या भाषणात खासदार शेवाळे यांनी काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांविषयीदेखील माहिती सभागृहात ठेवली. “वास्तविक, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार पटेल हेदेखील कलम 370 च्या बाजूने नव्हते. आम्ही गृहमंत्री अमित शाह यांच्यामध्ये सरदार पटेल यांचं रूप बघतोय. यांच्या कार्यकाळात सातत्यपूर्ण प्रयत्नांनी लवकरच जम्मू-काश्मीर समस्येवर योग्य तोडगा काढला जाईल” अशा शब्दांत खासदार शेवाळे यांनी गृहमंत्री शाह यांची स्तुती केली.

जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देऊन या राज्याला वेगळं करण्याचा घाट घालणाऱ्या काँग्रेस सरकारवर शेवाळे यांनी सडकून टीका केली. या दुरूस्तीमुळे सगळ्यांनाच म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सवर्ण आणि इतर नागरिकांप्रमाणे आरक्षण मिळून काश्मीरमधील सर्वांचा फायदा होईल, असे ते म्हणाले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत मांडलेल्या ‘जम्मू-काश्मीर आरक्षण (दुरूस्ती) विधेयक 2019 ला शिवसेनेने समर्थन दिले. “कलम 370 रद्द व्हावे, यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच प्रत्येक केंद्र सरकारला इशारा दिला होता” अशा शब्दांत आपल्या भाषणाची सुरूवात करून खासदार राहुल शेवाळे यांनी विधेयक दुरूस्तीचे समर्थन केले. लोकसभेत या ऐतिहासिक विधेयकाची दुरूस्ती शुक्रवारी पारित झाली.

जम्मू-काश्मीर विधयेकाच्या दुरूस्तीला समर्थन देताना खासदार राहुल शेवाळे म्हणाले की, “1949 मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 370 चा ड्राफ्ट बनविण्यास नकार दिला होता. परंतु, नेहरूजींच्या सांगण्यावरून गोपालस्वामी अय्यंगार यांनी 370 कलमाचा ड्राफ्ट बनविला. मूळ रूपात या कलमात प्रोविजन होती की महाराजा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शिफारशींनुसार कार्य करेल, पण नेहरूजी आणि शेख अब्दुला यांच्या संगनमताने यात दुरूस्ती करून मंत्रिमंडळाऐवजी राज्य सरकार असा बदल करण्यात आला.”

 

आपल्या भाषणात खासदार शेवाळे यांनी काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांविषयीदेखील माहिती सभागृहात ठेवली. “वास्तविक, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार पटेल हेदेखील कलम 370 च्या बाजूने नव्हते. आम्ही गृहमंत्री अमित शाह यांच्यामध्ये सरदार पटेल यांचं रूप बघतोय. यांच्या कार्यकाळात सातत्यपूर्ण प्रयत्नांनी लवकरच जम्मू-काश्मीर समस्येवर योग्य तोडगा काढला जाईल” अशा शब्दांत खासदार शेवाळे यांनी गृहमंत्री शाह यांची स्तुती केली.

जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देऊन या राज्याला वेगळं करण्याचा घाट घालणाऱ्या काँग्रेस सरकारवर शेवाळे यांनी सडकून टीका केली. या दुरूस्तीमुळे सगळ्यांनाच म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सवर्ण आणि इतर नागरिकांप्रमाणे आरक्षण मिळून काश्मीरमधील सर्वांचा फायदा होईल, असे ते म्हणाले.”
 

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content