HomeArchiveस्वा. सावरकर स्मारकारच्या...

स्वा. सावरकर स्मारकारच्या मोडी लिपी स्पर्धेला उत्तम प्रतिसाद

Details
स्वा. सावरकर स्मारकारच्या मोडी लिपी स्पर्धेला उत्तम प्रतिसाद

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि जागतिक मोडी लिपी प्रसार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने १ मे २०१९ या दिवशी पाचवी राज्यस्तरीय मोडी लिपी स्पर्धा मुंबई, नाशिक, अहमदनगर आणि कोल्हापूर या चार शहरांमध्ये भरविण्यात आली. चारही केन्द्रांवर मिळून २०० स्पर्धकांनी भाग घेतला. यातील ठळक वैशिष्ट्य म्हणजे सर्वात तरूण कोल्हापूर येथे १२ वर्षीय पार्थ कांबळे तर मुंबई केंद्रावर १४ वर्षीय जिष्णू बांदोडकर तसेच सर्वात ज्येष्ठ ८२ वर्षीय रमेश वाघ, मुंबई तर ८१ वर्षाचे पांडुरंग गुजर, कोल्हापूर यांनीही सहभाग नोंदवला.

 

जिष्णू बांदोडकर आणि त्याची माता राजश्री बांदोडकर यांनी सलग पाचव्या वर्षी उपस्थिती नोंदवली. नाशिकमध्ये सत्तरी ओलांडलेले ज्येष्ठ नागरीक मोठ्या उस्ताहाने सहभागी झाले. अहमदनगर शहरामध्ये तरूणांचा मोठा सहभाग होता. मुंबई केन्द्रावरील व्यवस्था सर्वोत्तम होती. सर्व स्पर्धकांना सावरकर स्मारकाने मध्यंतराला चहा/कॉफी आणि नाष्ट्याची विनामूल्य व्यवस्था केली होती. मुंबई केन्द्रावर मिश्र वयोगट होते. मुंबई आणि अहमदनगर या केन्द्रांवर काही स्पर्धकांनी सलग पाचव्या वर्षी स्पर्धेत भाग घेतला. धुळे, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, चिपळूण, पालघर, डहाणू अशा दूरच्या ठिकाणांहून स्पर्धक सावरकर स्मारक, मुंबई येथे स्पर्धेकरीता आले. सातारा, सांगली, मिरज, बेळगाव, बीड, उस्मानाबाद येथून स्पर्धक कोल्हापूर केन्द्रावर पोहोचले होते. स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर तसेच कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. तसेच पुढील वर्षी अधिक शहारांचा समावेश यात केला जाईल असे सांगितले. विलास कडू, सुहास पटवर्धन, गंगाराम बाईत, मिलिंद रहाटे आणि जागतिक मोडी लिपी प्रसार समितीच्या सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी कौतुक केले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि जागतिक मोडी लिपी प्रसार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने १ मे २०१९ या दिवशी पाचवी राज्यस्तरीय मोडी लिपी स्पर्धा मुंबई, नाशिक, अहमदनगर आणि कोल्हापूर या चार शहरांमध्ये भरविण्यात आली. चारही केन्द्रांवर मिळून २०० स्पर्धकांनी भाग घेतला. यातील ठळक वैशिष्ट्य म्हणजे सर्वात तरूण कोल्हापूर येथे १२ वर्षीय पार्थ कांबळे तर मुंबई केंद्रावर १४ वर्षीय जिष्णू बांदोडकर तसेच सर्वात ज्येष्ठ ८२ वर्षीय रमेश वाघ, मुंबई तर ८१ वर्षाचे पांडुरंग गुजर, कोल्हापूर यांनीही सहभाग नोंदवला.

 

जिष्णू बांदोडकर आणि त्याची माता राजश्री बांदोडकर यांनी सलग पाचव्या वर्षी उपस्थिती नोंदवली. नाशिकमध्ये सत्तरी ओलांडलेले ज्येष्ठ नागरीक मोठ्या उस्ताहाने सहभागी झाले. अहमदनगर शहरामध्ये तरूणांचा मोठा सहभाग होता. मुंबई केन्द्रावरील व्यवस्था सर्वोत्तम होती. सर्व स्पर्धकांना सावरकर स्मारकाने मध्यंतराला चहा/कॉफी आणि नाष्ट्याची विनामूल्य व्यवस्था केली होती. मुंबई केन्द्रावर मिश्र वयोगट होते. मुंबई आणि अहमदनगर या केन्द्रांवर काही स्पर्धकांनी सलग पाचव्या वर्षी स्पर्धेत भाग घेतला. धुळे, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, चिपळूण, पालघर, डहाणू अशा दूरच्या ठिकाणांहून स्पर्धक सावरकर स्मारक, मुंबई येथे स्पर्धेकरीता आले. सातारा, सांगली, मिरज, बेळगाव, बीड, उस्मानाबाद येथून स्पर्धक कोल्हापूर केन्द्रावर पोहोचले होते. स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर तसेच कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. तसेच पुढील वर्षी अधिक शहारांचा समावेश यात केला जाईल असे सांगितले. विलास कडू, सुहास पटवर्धन, गंगाराम बाईत, मिलिंद रहाटे आणि जागतिक मोडी लिपी प्रसार समितीच्या सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी कौतुक केले.”
 

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content