HomeArchiveअहल-ए-अदब फाऊंडेशनद्वारा मुशायराचे...

अहल-ए-अदब फाऊंडेशनद्वारा मुशायराचे शानदार आयोजन!

Details
अहल-ए-अदब फाऊंडेशनद्वारा मुशायराचे शानदार आयोजन!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
अहल ए अदब या साहित्यिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मुशायरा व शायरी संध्या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेल्या या कार्यक्रमाने श्रोते व रसिक मंत्रमुग्ध झाले.

 

अहल ए अदब या संस्थेचा हा पहिलाच कार्यक्रम भरगच्च गर्दीत झाला. दीप प्रज्वलन आणि सरस्वती वंदना झाल्यानंतर गजल गायक आजम असादत खान यांनी रूचि दरोलियाची गजल ‘जब से गिरे हैं इश्क में उडने लगे हैं देखिए’ गाऊन श्रोत्यांना कार्यक्रमाच्या अंतरंगात नेले. ग़ज़ल गायक सचिन शर्मा यांनी हस्तीमल हस्तीजींची प्रसिद्ध ग़ज़ल, ‘प्यार का पहला खत लिखने में वक़्त तो लगता है’ सादर केली. गझल गायकीनंतर मुशायराला प्रारंभ झाला. त्यात डॉ वसिफ, जनाब स्वप्नील, जुबैर अली तबिश यांनी सादर केलेल्या गझलांना श्रोत्यांमध्ये विशेषतः युवा वर्गाने विशेष दाद दिली. लुधियानाचे शायर मुकेश आलम यांनी शेर, ‘इतने सारे राबतों में इक सहारा ढूंढना, तसेच जैसे एक तारा ढूंढना’ यांना श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

 

डॉ. राजेश मोहन यांनी तरन्नुममध्ये गझल सादर केली. ‘खयाल ए यार में उलझे हुए हैं, नए अशआर में उलझे हुए हैं’ यांना श्रोत्यांकडून वन्समोअर मिळाला. वरिष्ठ शायर जनाब शारिक कैफी काही अपरिचित शायरी सादर केल्या. त्याला सर्व स्तरातील श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. जनाब शमीम अब्बास साहब यांनी शेर,’ तुममे कुछ भी वाहियात नहीं, जाओ तुम आदमी की जात नहीं’ याच्याबरोबरच गझल सादर केली. संस्थापक रोहित दरोलिया यांनी श्रोत्यांच्या मागणीवरून आणखी एक कार्यक्रम घेण्याचे जाहीर केले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
अहल ए अदब या साहित्यिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मुशायरा व शायरी संध्या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेल्या या कार्यक्रमाने श्रोते व रसिक मंत्रमुग्ध झाले.

 

अहल ए अदब या संस्थेचा हा पहिलाच कार्यक्रम भरगच्च गर्दीत झाला. दीप प्रज्वलन आणि सरस्वती वंदना झाल्यानंतर गजल गायक आजम असादत खान यांनी रूचि दरोलियाची गजल ‘जब से गिरे हैं इश्क में उडने लगे हैं देखिए’ गाऊन श्रोत्यांना कार्यक्रमाच्या अंतरंगात नेले. ग़ज़ल गायक सचिन शर्मा यांनी हस्तीमल हस्तीजींची प्रसिद्ध ग़ज़ल, ‘प्यार का पहला खत लिखने में वक़्त तो लगता है’ सादर केली. गझल गायकीनंतर मुशायराला प्रारंभ झाला. त्यात डॉ वसिफ, जनाब स्वप्नील, जुबैर अली तबिश यांनी सादर केलेल्या गझलांना श्रोत्यांमध्ये विशेषतः युवा वर्गाने विशेष दाद दिली. लुधियानाचे शायर मुकेश आलम यांनी शेर, ‘इतने सारे राबतों में इक सहारा ढूंढना, तसेच जैसे एक तारा ढूंढना’ यांना श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

 

डॉ. राजेश मोहन यांनी तरन्नुममध्ये गझल सादर केली. ‘खयाल ए यार में उलझे हुए हैं, नए अशआर में उलझे हुए हैं’ यांना श्रोत्यांकडून वन्समोअर मिळाला. वरिष्ठ शायर जनाब शारिक कैफी काही अपरिचित शायरी सादर केल्या. त्याला सर्व स्तरातील श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. जनाब शमीम अब्बास साहब यांनी शेर,’ तुममे कुछ भी वाहियात नहीं, जाओ तुम आदमी की जात नहीं’ याच्याबरोबरच गझल सादर केली. संस्थापक रोहित दरोलिया यांनी श्रोत्यांच्या मागणीवरून आणखी एक कार्यक्रम घेण्याचे जाहीर केले.”
 
 

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content