HomeArchiveपुन्हा एकदा मेंदीच्या...

पुन्हा एकदा मेंदीच्या पानावर..

Details
पुन्हा एकदा मेंदीच्या पानावर..

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
पंचवीस वर्षांपूर्वी अविट गोडीच्या सुमधूर गीतांनी अवघ्या महाराष्ट्र व मराठी जगताला नादावून सोडलेल्या अष्टगंध निर्मित मेंदीचं पान पुन्हा प्रकटले आहे. 26 जुलैला तुफानी पर्जन्यवृष्टी असतानाही डोंबिवलीत मेंदीच्या पानाचा पुनरागमनाचा शुभारंभ सोहळा संपऩ्न झाला. रसिकांनी उदंड प्रतिसाद देत आपण या प्रतिक्षेत होतो याची पावती दिली.

सर्वेश सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात प्रथम तुला वंदितो, मेंदीच्या पानावर, हा रूसवा सोड सखे, माझे राणी.. यासह सोळा गीतं सादर झाली. उत्तरार्धात रात्रीस खेळ चाले, येग रामाच्या, गोमू माहेरला जा, चंद्र आहे साक्षीला, गोमू संगतीनं.. यासह 12 गाणी सादर झाली. प्रभंजन-कीर्ति मराठे, दीपक कुंटे-काश्मिरा, भानुदास, प्रणिता, यांच्या संयुक्त व एकल गीत सादरीकरणाला रसिक जोरदार प्रतिसाद देत होते. मेंदीच्या पान प्रयोगाचं वैशिष्ट्य असलेले सूत्रधार व निवेदक बच्चू पांडे. त्यांच्या सादरीकरणाला प्रचंड प्रतिसाद डोंबिवलीकरांचा लाभला.

सूर म्हणतो साथ दे.., दिवा म्हणतो वात दे.., गाण्याच्या या मैफलीला रसिका अशाीच साथ दे.., या गोड आवाहनाने मेंदीच्या पानाची सुरूवात हे एक आगळे वैशिष्ट्य. या दुसऱ्या शुभारंभातही ती तशीच झाली, त्यामुळे रसिक हरखून गेले.

अष्टगंध एकत्र आले

पंचवीस वर्षांनी उदय चितळे, प्रभंजन मराठे, भानूदास देशपांडे, अनिल जोशी, मधू बने, श्रूतकीर्ति मराठे, वासुदेव बापट, बच्चू पांडे हे अष्टगंध एका अनामिक प्रेरणेने एकत्र आले. पाच जून 2019 रोजी, प्रदीर्घ काळानंतर बच्चू पांडे यांनी सर्वांना एकत्र आणले. मेंदीच्या पानाचं पुनरूज्जीवन करण्याचा निर्णय सर्वांनी चार तास सुसंवाद साधून घेतला. त्यानंतर सारेच तयारीस लागले. त्यानंतर अवघ्या दिड महिन्यातच मेंदीचं पान.. पुन्हा प्रकटले. आता संगीतवेडा महाराष्ट्र त्याचे स्वागत कसे करतो याची उत्सुकता आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
पंचवीस वर्षांपूर्वी अविट गोडीच्या सुमधूर गीतांनी अवघ्या महाराष्ट्र व मराठी जगताला नादावून सोडलेल्या अष्टगंध निर्मित मेंदीचं पान पुन्हा प्रकटले आहे. 26 जुलैला तुफानी पर्जन्यवृष्टी असतानाही डोंबिवलीत मेंदीच्या पानाचा पुनरागमनाचा शुभारंभ सोहळा संपऩ्न झाला. रसिकांनी उदंड प्रतिसाद देत आपण या प्रतिक्षेत होतो याची पावती दिली.

सर्वेश सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात प्रथम तुला वंदितो, मेंदीच्या पानावर, हा रूसवा सोड सखे, माझे राणी.. यासह सोळा गीतं सादर झाली. उत्तरार्धात रात्रीस खेळ चाले, येग रामाच्या, गोमू माहेरला जा, चंद्र आहे साक्षीला, गोमू संगतीनं.. यासह 12 गाणी सादर झाली. प्रभंजन-कीर्ति मराठे, दीपक कुंटे-काश्मिरा, भानुदास, प्रणिता, यांच्या संयुक्त व एकल गीत सादरीकरणाला रसिक जोरदार प्रतिसाद देत होते. मेंदीच्या पान प्रयोगाचं वैशिष्ट्य असलेले सूत्रधार व निवेदक बच्चू पांडे. त्यांच्या सादरीकरणाला प्रचंड प्रतिसाद डोंबिवलीकरांचा लाभला.

सूर म्हणतो साथ दे.., दिवा म्हणतो वात दे.., गाण्याच्या या मैफलीला रसिका अशाीच साथ दे.., या गोड आवाहनाने मेंदीच्या पानाची सुरूवात हे एक आगळे वैशिष्ट्य. या दुसऱ्या शुभारंभातही ती तशीच झाली, त्यामुळे रसिक हरखून गेले.

अष्टगंध एकत्र आले

पंचवीस वर्षांनी उदय चितळे, प्रभंजन मराठे, भानूदास देशपांडे, अनिल जोशी, मधू बने, श्रूतकीर्ति मराठे, वासुदेव बापट, बच्चू पांडे हे अष्टगंध एका अनामिक प्रेरणेने एकत्र आले. पाच जून 2019 रोजी, प्रदीर्घ काळानंतर बच्चू पांडे यांनी सर्वांना एकत्र आणले. मेंदीच्या पानाचं पुनरूज्जीवन करण्याचा निर्णय सर्वांनी चार तास सुसंवाद साधून घेतला. त्यानंतर सारेच तयारीस लागले. त्यानंतर अवघ्या दिड महिन्यातच मेंदीचं पान.. पुन्हा प्रकटले. आता संगीतवेडा महाराष्ट्र त्याचे स्वागत कसे करतो याची उत्सुकता आहे.”

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content