HomeArchiveवेसाव्यात शिपीलच्या तराफ्यातून...

वेसाव्यात शिपीलच्या तराफ्यातून होते गणपती विसर्जन

Details
वेसाव्यात शिपीलच्या तराफ्यातून होते गणपती विसर्जन

    12-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 
 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
केरळनंतर देशात मासेमारीत दुसरा क्रमांक असणाऱ्या मुंबईतील अंधेरी रेल्वेस्थानकापासून सात किमी अंतरावर असलेल्या वेसावे कोळीवाडयाची विसर्जनाची एक आगळीवेगळी परंपरा आहे. येथील मांडवी गल्ली कोळी जमात विसर्जन सोहळयासाठी सज्ज झाली आहे. आज अनंत चतुर्दशीला सायंकाळपासून वेसावे समुद्ररकिनारी पश्चिम उपनगरातील गणेश मूर्ती विसर्जनासाठी येण्यास सुरूवात होणार असून सुमारे १२५ मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन येथे केले जाते.
 
 
येथील विसर्जनासाठी चार होड्यांचा एक तराफा, असे दोन तराफे तयार करण्यात आले असून येथील विसर्जनावर देखरेख ठेवण्यासाठी खास चार बोटीदेखील तैनात करण्यात आल्या आहेत. येथील विसर्जन सोहळा उद्या दि. १३ रोजी, (दुसऱ्या दिवशी) दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
 
 
येथे शिपीलच्या (छोट्या बोटी) तराफ्यातून विसर्जनाची आगळी वेगळी व देखणी परंपरा आहे. येथील मांडवी गल्ली कोळी जमातीच्या वतीने लहान मूर्तींपासून ते मोठ्या गणेश मूर्तींचे येथील खोल समुद्रात विसर्जन केले जाते. येथील नेत्रदीपक विसर्जन सोहळा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात एकमेव असा विसर्जन सोहळा असल्याचा दावा मांडवी गल्ली कोळी जमातीचे अध्यक्ष जगदीश भिकरू व सचिव मनोज कास्कर यांनी केला.
 
 
येथील गणपती विसर्जनाची वेसावकरांची जुनी परंपरा आहे. 1995पूर्वी येथील बाजार गल्ली कोळी जमातीतर्फे गणपती विसर्जन केले जात होते. मात्र १९९५पासून येथील मांडवी गल्ली कोळी जमातीच्या वतीने पाच, सात दिवसांचे सुमारे २५ ते ३० गणेश मूर्ती आणि अनंत चतुर्दशीला पश्चिम उपनगरातील सुमारे १२५ गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. तराफ्यावर फळी ठेऊन त्यावर गणपतीची मूर्ती ठेवली जाते. मग वेसावे येथील खोल समुद्रात फळीवरील ठेवलेल्या गणेश मूर्तीला कोणताही धक्का न लागता विसर्जन केले जाते. या विसर्जनाच्या कार्यात या जमातीचे सुमारे ३०० कार्यकर्ते झटत असतात, असे मांडवी गल्ली कोळी जमातीचे सचिव मितेश चाके व खजिनदार नरेश कोळी यांनी सांगितले.

 
 

 ”

 
 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
केरळनंतर देशात मासेमारीत दुसरा क्रमांक असणाऱ्या मुंबईतील अंधेरी रेल्वेस्थानकापासून सात किमी अंतरावर असलेल्या वेसावे कोळीवाडयाची विसर्जनाची एक आगळीवेगळी परंपरा आहे. येथील मांडवी गल्ली कोळी जमात विसर्जन सोहळयासाठी सज्ज झाली आहे. आज अनंत चतुर्दशीला सायंकाळपासून वेसावे समुद्ररकिनारी पश्चिम उपनगरातील गणेश मूर्ती विसर्जनासाठी येण्यास सुरूवात होणार असून सुमारे १२५ मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन येथे केले जाते.
 
 
“येथील विसर्जनासाठी चार होड्यांचा एक तराफा, असे दोन तराफे तयार करण्यात आले असून येथील विसर्जनावर देखरेख ठेवण्यासाठी खास चार बोटीदेखील तैनात करण्यात आल्या आहेत. येथील विसर्जन सोहळा उद्या दि. १३ रोजी, (दुसऱ्या दिवशी) दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.”
 
 
येथे शिपीलच्या (छोट्या बोटी) तराफ्यातून विसर्जनाची आगळी वेगळी व देखणी परंपरा आहे. येथील मांडवी गल्ली कोळी जमातीच्या वतीने लहान मूर्तींपासून ते मोठ्या गणेश मूर्तींचे येथील खोल समुद्रात विसर्जन केले जाते. येथील नेत्रदीपक विसर्जन सोहळा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात एकमेव असा विसर्जन सोहळा असल्याचा दावा मांडवी गल्ली कोळी जमातीचे अध्यक्ष जगदीश भिकरू व सचिव मनोज कास्कर यांनी केला.
 
 
“येथील गणपती विसर्जनाची वेसावकरांची जुनी परंपरा आहे. 1995पूर्वी येथील बाजार गल्ली कोळी जमातीतर्फे गणपती विसर्जन केले जात होते. मात्र १९९५पासून येथील मांडवी गल्ली कोळी जमातीच्या वतीने पाच, सात दिवसांचे सुमारे २५ ते ३० गणेश मूर्ती आणि अनंत चतुर्दशीला पश्चिम उपनगरातील सुमारे १२५ गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. तराफ्यावर फळी ठेऊन त्यावर गणपतीची मूर्ती ठेवली जाते. मग वेसावे येथील खोल समुद्रात फळीवरील ठेवलेल्या गणेश मूर्तीला कोणताही धक्का न लागता विसर्जन केले जाते. या विसर्जनाच्या कार्यात या जमातीचे सुमारे ३०० कार्यकर्ते झटत असतात, असे मांडवी गल्ली कोळी जमातीचे सचिव मितेश चाके व खजिनदार नरेश कोळी यांनी सांगितले.”

 
 

 

Continue reading

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...
Skip to content