HomeArchiveटेबल टेनिस स्पर्धेत...

टेबल टेनिस स्पर्धेत हिरानंदानी शाळेला रौप्यपदक!

Details

 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
“राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत ठाण्यातील हिरानंदानी फाऊंडेशन शाळेच्या संघाने १४ वर्षांखालील मुलींच्या गटात रौप्यपदक पटकावले. ख्याती पांडे, प्रियांका गुप्ते व सायली प्रधान यांनी या संघाचे प्रतिनिधीत्व केले.”
 

वैयक्तिक गटात १७ वर्षांखालील मुलींच्या स्पर्धेत ठाण्याच्या सरस्वती विद्यामंदीरच्या श्रावणी सावंतने ७ पैकी ६ सामने जिंकून निर्विवाद वर्चस्व गाजवले. या कामगिरीच्या जोरावर श्रावणी सावंत बडोदा येथे ०५ ते ०९ जानेवारी २०२० दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी १७ वर्षांखालील महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदाची मानकरी ठरली आहे. या खेळाडूंना पिनॅकल क्लबचे समीर सारळकर व प्रदीप मोकाशी यांचे मार्गदर्शन लाभले.
 
 
 
 
 
“परभणी येथे १२ ते १५ डिसेंबरदरम्यान क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी परभणी व परभणी जिल्हा टे. टे. असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी येथील क्रीडा संकुलात राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धा २०१९-२० चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन उज्वला राठोड, अध्यक्षा, जिल्हा परिषद, परभणी यांच्या हस्ते, परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाले.”

Continue reading

न्यायालये माणसे चालवतात, एआय नाही!

"न्यायालयं ही माणसांद्वारे चालवली जातात, कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (एआय) नाही," अशा कडक शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकाकर्त्याची तातडीच्या सुनावणीची विनंती फेटाळून लावली. २०२१पासून प्रलंबित असलेल्या एका 'प्रथम अपिलावर' प्राधान्याने सुनावणी घेण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली होती. मात्र, न्यायाधीशांच्या मानवी मर्यादा...

‘जेईई ॲडव्हान्स्ड’ परीक्षा १७ मे रोजी; २३ एप्रिलपासून नोंदणी!

देशातील प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधील (आयआयटी) प्रवेशासाठी घेतली जाणारी 'जेईई ॲडव्हान्स्ड २०२६' ही परीक्षा यंदा रविवार, १७ मे २०२६ रोजी होणार आहे. यावर्षी या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आयआयटी रुरकीकडे सोपवण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत वेळापत्रक आणि माहितीपुस्तिका प्रसिद्ध करण्यात...

येत्या शनिवार/रविवारी पायात बेड्या घालून फिरवा कौलू!

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अंदमानच्या कारागृहात स्वा. सावरकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी भोगलेल्या यातनांची जाणीव सर्वसामान्यांना व्हावी म्हणून मुंबईच्या स्वा. सावरकर स्मारकाने येत्या शनिवार आणि रविवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सर्वसामान्यांना पायात बेड्या घालून कौलू फिरवण्याची संधी उपलब्ध करून दिली...
Skip to content