Details
केएचएल न्यूज ब्युरो
“स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा समितीच्या महाराष्ट्र मिलिटरी स्कूलला आसाम येथील भास्कर संस्कार केंद्र, पार्वतीपूरच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली. आसामचे एकूण ३० विद्यार्थी, शिक्षक व आयोजक यावेळी उपस्थित होते. संस्थेचे कार्यवाह रणजित सावरकर, प्राचार्य काशिनाथ भोईर, राजेंद्र तिवारी, संदेश गपाट, अशोक वर्णेकर, अलका वर्णेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.”
“आसामच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर परेडचे शानदार संचलन महाराष्ट्र मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केले. तसेच चित्तथरारक प्रात्याक्षिकेही सादर करण्यात आली. हे विद्यार्थी आसामच्या सदानी भाषिक समुहाचे होते. चाय जमातीतील मूळ सदानी भाषा जपत तिथली संस्कृती, चालीरिती, सण, उत्सव, पारंपारिक पेहराव तसेच कामगार वर्गाचे कष्टप्रद जीवन ही त्यांची ओळख आहे.”
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अशोक आणि अलका वर्णेकर गेली २५ वर्षे कार्य करत आहेत. त्यांच्यासमवेत पुष्पा मुंडा व संजिता खडीया हे शिक्षकदेखील सहभागी आहेत. या सर्वांनी यावेळी महाराष्ट्र मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

