HomeArchiveसुट्टीत विद्यार्थी घेताहेत...

सुट्टीत विद्यार्थी घेताहेत आरोग्याची विशेष काळजी

Details

 
hegdekiran17@gmail.com
 
“कोव्हिड-१९च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना आरोग्यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी अधिक वेळ मिळत आहे. कोरोनाचा वाढत प्रभाव पाहता विद्यार्थी स्वतःच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेत असल्याचे जागतिक आरोग्य दिनानिमित्त विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठीची जगातील सर्वात मोठी ऑनलाईन कम्युनिटी ब्रेनलीने केलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे.”
 
“भारतात २२१७ विद्यार्थ्यांनी या सर्व्हेमध्ये सहभाग नोंदवला. त्यात ब्रेनलीला आढळले की, कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे ८४.६% विद्यार्थी त्यांच्या आरोग्य व स्वच्छतेसाठी सध्या जास्त वेळ देत आहेत. घरी असल्यामुळे ६४.३% विद्यार्थी म्हणाले की, त्यांनी आता ते आरोग्याच्या नव्या वेळापत्रकानुसार वागण्याचा प्रयत्न करत आहेत.”
 
“सर्व्हेच्या निष्कर्षात असे आढळून आले की, आरोग्यदायी दिनचर्या आणि जीवनशैली राखण्यासाठी ४०.८% विद्यार्थी त्यांच्या आहाराची काळजी घेत असून सकस आहार घेण्यावर त्यांचा भर आहे. तसेच ३५.६% विद्यार्थी दररोज व्यायाम करत आहेत. एकूण सर्वत्र चांगले व्हावे, ही जाणीव ठेवत ९०.५% विद्यार्थ्यांना शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक आरोग्यही उत्तम राहिले पाहिजे, असे वाटते. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ७५.१% विद्यार्थ्यांनी त्यांचे आरोग्य राखण्याचे, स्वच्छता ठेवण्याचे, भविष्यात निरोगी राहण्याचे वचन दिले आहे.”
 

Continue reading

सुटीच्या रविवारी दिवशी २०७ शासननिर्णयांची आतषबाजी!

काल रविवार, २९ मार्चचा सुटीचा दिवस असला तरी महाराष्ट्र सरकारच्या मंत्रालयातील संगणक टायपिंग मात्र थांबले नाही. आर्थिक वर्षाचा शेवट (३१ मार्च) जवळ येत असताना, महायुती सरकारने रविवारी (२९ मार्च २०२६) एकाच दिवसात तब्बल २०७ शासननिर्णय (जीआर) निर्गमित करून प्रशासकीय...

तृप्ती देसाईंच्या आरोपांवर नीलम गोऱ्हेंचा पलटवार!

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महिला नेतृत्त्वावरून नवा संघर्ष पाहायला मिळत आहे. भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी केलेल्या खळबळजनक आरोपांनंतर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज मुंबईत तातडीची पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. या दोन्ही नेत्यांमधील...

युद्धाच्या वणव्यात गुंतवणूकदारांचे लाखो कोटी स्वाहा!

पश्चिम आशियातील युद्धाचा ३१वा दिवस जागतिक अर्थव्यवस्थेसाठी 'ब्लॅक मंडे' ठरला आहे. इस्रायल आणि इराणमधील संघर्ष शिगेला पोहोचल्याने जागतिक बाजारपेठेत भीतीचे वातावरण पसरले असून, त्याचे थेट पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटले आहेत. सोमवारी बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी पडझड...
Skip to content