Homeन्यूज अँड व्ह्यूजगणरायही गुदमरले रेल्वेस्थानक...

गणरायही गुदमरले रेल्वेस्थानक परिसरातल्या या प्रचंड गर्दीने!

सरकारी व रेल्वे खात्याच्या आकडेवारीच्या आधारे विचार केला तर ठाणे रेल्वेस्थानकातून दररोज सुमारे पाच ते सहा लाख प्रवासी ये-जा करीत असतात. प्रवासी नागरिकांबरोबरच स्थानक परिसरात असलेल्या लाखो फेरीवाल्यांमुळे आधीच हैराण झालेल्या प्रवाशांच्या हालात परिसरातच मोठा मंडप घालून सार्वजनिक गणपती उत्सव साजरा करून प्रवाशांच्या हालात भर का घालत आहेत, असा लाखो ठाणेकरांचा सवाल आहे. ठाणे शहराच्या जवळजवळ प्रत्येक लहानमोठ्या गल्लीत जोरशोरसे गणपती उत्सव साजरा केला जात असताना ठाणे स्थानकाला वेठीस धरण्याचा हट्ट गणेशभक्त का करीत आहेत, असा सर्वसामान्य ठाणेकरांचा प्रश्न आहे. महापालिका प्रशासन, सरकारी यंत्रणा, पोलीस व भाराभर असलेल्या लोकप्रतिनिधींनी ठाणे रेल्वेस्थानक व तेथील परिसराला नको इतके ओंगळवाणे स्वरूप दिले असून ते सुधारण्याऐवजी प्रवासी अधिक गर्दी व चेंगराचेंगरीने गुदमरून हवालदिल व्हावेत, असा तर आयोजकांचा होरा नाही ना? प्रत्येक गल्लीत व लाखो घरांत गणपती आणले जात असताना स्थानकात आणखी एक गणपती असा हट्ट कशाला?

चालायला जागा नसते

ठाणे स्थानकात पाऊल टाकताच कासारवडवलीला जाणारे रिक्षावाले ‘वडवली-वडवली’ असे ओरडणारे.. त्यांच्याआधी ‘वागळे वागळे’ ओरडणारे तर सॅटिस पुलाजवळ येऊन ओरडणारे घोडबंदर घोडबंदर, व भिवंडी भिवंडी ओरडून साद घालणारे… ही सर्व मंडळी प्रवाशांना पीडत असतातच. त्यातच स्वस्त सिमकार्ड देणारे, काही बँकाची टेबले, महिलांसाठी सुशोभित

रेल्वेस्थानक

प्रसाधनगृह, शेंगवाले, ‘आपके पैर मे कुछ गडबड है..’ असं सांगणारे आयुर्वेदिक भोंदू, अशा शेकडो नमुनेदार माणसांना दाखवण्यासाठी का गणरायांना येथे बसवले? असले सर्व किळसवाणे प्रकार गणरायाला दाखवायलाच हवेत का? गणरायाच काय पण, प्रत्येक राजकीय पक्षही रेल्वेस्थानक परिसर ही हक्काची जागा असल्याप्रमाणे मनाला येईल त्याप्रमाणे या जागेचा वापर करत आहे. अनेक प्रभावशाली नेत्यांच्या वाढदिवसाचे कार्यक्रमही येथेच उरकले जातात.

भारतरत्न डॉ. आंबेडकरही झाले खजिल

ठाणे रेल्वेस्थानक परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसरातील सर्व धिंगाणा खाली मान घालून पाहत असतात. या महामानवाची मान भले वाकलेली दिसत नसेल पण आपल्या बाळांच्या कर्तृत्त्वाने मात्र ते नक्कीच खजिल झाले असतील.. देशासाठी नियमावली तयार करणाऱ्या या महामानवाला आपल्या डोळ्यादेखत सर्व नियम धाब्यावर बसलेले पाहवे लागत आहे, यासारखे दुर्दैव नाही, अशी बोलकी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ नागरिकाने व्यक्त केली. आयोजकांना उत्सव करायचाच असेल तर मंडप छोटा करून पूजाअर्चा करण्यापूरताच उत्सव सीमित केला जावा. लाऊडस्पीकर्सचा गोंगाटही नसावा. गणपती उत्सवाला विरोध नाही. पण, गणरायालाही ही गर्दी व धावपळ सहन होणार नाही, या हेतूनेच काळजी व्यक्त केली आहे. बाकी सर्व समजण्यास कार्यकर्ते समजूतदार आहेतच. बाप्पा मोरयाss

(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

मुंढेंच्या कारवाईविरूद्ध न्यायालयाचे अर्थशून्य ताशेरे! बहोत नाइंसाफी है यह…

तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध विभागाचे आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतल्यापासून संपूर्ण राज्यभर एकच हलकल्लोळ माजला आहे. भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. औषध नियंत्रण नियमावलीचे पालन न करणाऱ्यांचे तर आता पितळ उघडे पडत आहे. अधूनमधून कारवाईचा दणका बसलेली...

शिवसेनाप्रमुखांची अटक हे पोलीस कर्तव्याचे फलित! संबंध मधुरच!!

पोलीस आयुक्त नियम आणि कायद्याच्या चौकटीतच काम करत असतो, नव्हे त्याला तसे करावेच लागते. म्हणूनच सत्तारूढ राजकीय नेत्यांनी 'आवडता-नावडता' अधिकारी असे शिक्के कुणावरही मारू नयेत, अशी स्पष्टोक्ती मुंबईचे माजी पोलीस आयुक्त एम. एन. सिंग यांनी येथे केली. ज्येष्ठ पत्रकार...

दिल्ली पोलिसांचे आता ‘बेटी जरा धीरे से’…

अहो, ऐकलं का, दिल्ली पोलीस म्हणे त्यांची 'प्रतिमा' बदलणार! दरवेळेस 'पिछवाडा' काढणारे आता नमस्ते जी.. बोलणार. हे वाचून चकित झालात ना? आम्ही तर थेट चक्रावूनच गेलो. खरंतर विश्वासच बसेना. इतकी वर्षे 'पिछवाडा', 'मादxxx', 'घुसा देंगे', 'दादीके मय्यतमे नहीं आये...
Skip to content