Homeटॉप स्टोरीउद्याच्या 'छठ पूजे'वर...

उद्याच्या ‘छठ पूजे’वर पावसाचे सावट!

सध्या अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यातच ‘चौध्रुवीय कोल’ स्थितीही निर्माण झाली आहे. अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्र पणजीच्या आसपास स्थिर आहे तर, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र मोंथा चक्रीवादळात रूपांतरित होण्याची चिन्हे आहेत. ते दक्षिण आंध्र, तेलंगणा किंवा तामिळनाडू, केरळकडे आगेकूच करू शकते. यामुळे राज्यासह देशभरच्या हवामानात मोठे बदल होत आहेत. उत्तर विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात, महाराष्ट्रात 28 ऑक्टोबरपर्यंत पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दोन दिवस यलो अलर्ट आहे. यंदा उद्याची महानगरातील छठ पूजा पावसाच्या सावटाखाली असणार आहे.

बदलत्या हवामानाने राज्यामध्ये पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. वातावरणातील आर्द्रता वाढल्याने मुंबईसह राज्यातील अनेक शहरांत किमान तापमानाचा पारा चढला आहे. त्यात सरासरीपेक्षा तीन ते चार अंशांनी वाढ नोंदविली जात आहे. वाढत्या आर्द्रतेमुळे सकाळच्या वेळीही तीव्र उकाड्याची जाणीव होत आहे. यामुळे साधारणतः दुपारनंतर संध्याकाळच्या सुमारास पावसाची जास्त शक्यता निर्माण होते. दरम्यान, मच्छिमारांनी रविवारी मासेमारीसाठी अरबी समुद्रात जाऊ नये, असा इशारा  हवामान विभागाने दिला आहे.

एकाचवेळी 4 कमी दाबाचे क्षेत्र

ऑक्टोबरच्या अखेरीस पश्चिम किनाऱ्यावर काहीतरी नाट्यमय घडामोडी अपेक्षित आहेत. हिंदी महासागर, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरील हवामान उष्ण झाले असून एकाचवेळी 4 कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहेत. ते नकाशावर एक परिपूर्ण चौरस तयार करत आहेत. हिंदी महासागरात MJO म्हणजे मॅडेन ज्युलियन ऑसिलेशनद्वारे पाऊस पाडणारा ‘चौध्रुवीय कोल’ सॅडल पॉइंट दिसत आहे. त्यामुळे पश्चिम किनाऱ्यावर मान्सूनसारखे दिवस अपेक्षित आहेत. दक्षिण भारतात उत्तर-पूर्व मान्सून ऑक्टोबरमध्ये सुरू होतो, ज्यामुळे बंगालच्या उपसागरातून ओलावा येतो आणि महाराष्ट्रात पावसाला चालना मिळते. सध्या ही प्रणाली कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सक्रिय आहे.

महाराष्ट्रात “या” जिल्ह्यात असेल पावसाची शक्यता

* महामुंबई परिसरात रविवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता.

* जळगाव जिल्ह्यात हवामान ढगाळ राहणार असून 27 ऑक्टोबरपर्यंत हलका ते मध्यम पावसाची शक्यता.

* नाशिक जिल्ह्यात दोन दिवस हलक्या-मध्यम तर घाट क्षेत्र, तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता.

* 26 ऑक्टोबर रोजी मुंबई, नाशिक, खान्देश, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, संभाजी नगर, नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता.

* 27 ऑक्टोबर रोजी धुळे, मुंबई, नाशिक, खान्देश, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, संभाजी नगर जिल्ह्यात पावसाची शक्यता.

* 28 ऑक्टोबर रोजी पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, नांदेडमध्ये पावसाची शक्यता.

देशभरातील हवामान बदल

* केरळ किनारपट्टी, तामिळनाडू, पदुचेरीमध्ये मोंथा चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाची शक्यता.

* रायलसीमा, किनारी आंध्र प्रदेश, तेलंगणात हवामान विभागाचा अलर्ट; तिरुपतीतही 26 ते 28 ऑक्टोबरदरम्यान जोरदार पावसाची शक्यता.

* ओडिशात 27 ते 29 ऑक्टोबरपर्यंत अति मुसळधार पावसाची शक्यता.

* पूर्व उत्तर प्रदेशात 29-30 ऑक्टोबर रोजी मुसळधार तर पश्चिम युपीमध्ये थंडीच्या तीव्र लाटेची शक्यता.

* दिल्ली महानगर क्षेत्रातही दोन दिवस पाऊस.

* राजस्थानात उद्यापासून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता. आयएमडीकडून काही जिल्ह्यात यलो अलर्ट जारी.

“एमजेओ” म्हणजे काय?

मॅडेन-ज्युलियन ऑसिलेशन (MJO) ही एक उप-हंगामी वातावरणीय पद्धत आहे, जी उष्णकटिबंधीय पर्जन्यमानावर परिणाम करते. हा पावसाचा उष्णकटिबंधीय प्रवास आहे, जो हिंद महासागरावरून सुरू होतो आणि पूर्वेकडे सरकतो. पावसाच्या सरी आणि गडगडाटी वादळांचा हा समूह इंडोनेशिया आणि हिंद महासागरात विषुववृत्ताच्या बाजूने, ऑस्ट्रेलियाच्या वायव्येस एकत्र येतो. सामान्यतः 30 ते 60 दिवसांचा हा पुनरावृत्ती प्रवास असतो, जो कधी-कधी 90 दिवस लांबतो. वाढलेल्या आणि कमी झालेल्या पावसाचे आलटूनपालटून कालावधी निर्माण करून जगभरातील हवामान पद्धतींवर “एमजेओ”चा परिणाम होतो. मान्सून आणि चक्रीवादळांसारख्या प्रमुख हवामान घटनांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. विशिष्ट ऋतूंमध्ये “एमजेओ”चा प्रभाव अधिक स्पष्ट किंवा “स्थिर” असू शकतो, ज्यामुळे जगाच्या एका भागात दीर्घकाळासाठी अधिक सुसंगत हवामान विसंगती निर्माण होतात.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content