Homeचिट चॅट५वी अजित घोष...

५वी अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा आजपासून


मुंबईतल्या स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फौंडेशनच्या विद्यमाने होणाऱ्या ५व्या अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेला आज, १३ जानेवारीपासून प्रारंभ होत असून १७ जानेवारीला अंतिम लढत होऊन स्पर्धेची सांगता होईल. गतविजेते डॅशिंग स्पोर्ट्स क्लब यांच्यासह ८ संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये असून मुंबई क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने ती होत आहे. त्याकरीता माटुंगा येथील रमेश दडकर मैदानावरील माटुंगा जिमखाना आणि न्यू हिंद क्लबची मैदाने मुंबई क्रिकेट संघटनेने उपलब्ध करुन दिली आहेत.

स्पर्धेमधील ८ संघांची २ गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक संघाला किमान तीन सामने खेळण्याची संधी प्राप्त होत आहे. विशेष म्हणजे यंदा “एसजी”चे आंतरराष्ट्रीय दर्जाचे चेंडू उपलब्ध झाल्याने गोलंदाजांना आपले कौशल्य प्रदर्शित करण्याची उत्तम संधी मिळत आहे. मुंबई शालेय क्रीडा संघटनेचे सचिव नदीम मेमन यांनी हॅरिस आणि जाईल्स शिल्ड स्पर्धेमध्ये “एसजी”चे चेंडू उपलब्ध करुन दिल्यानंतर स्थानिक स्पर्धा आणि विशेषत: ज्युनियर खेळाडूंना याचा आवश्य लाभ होईल. याशिवाय नदीम मेमन यांनी सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूंना पारितोषिके देऊ केल्याने स्पर्धेतील खेळाडूंना अधिकचे काही उत्तेजनार्थ मिळणार आहे. स्पर्धेतील उत्तम फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंना “एसजी”चे क्रिकेट किट भेट देण्यात येईल. प्राथमिक साखळीतून गटातील प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

भारताच्या माजी खेळाडू अरुंधती घोष यांच्या या उपक्रमाला हंसाबेन मेहता, रेड फॉक्सचे आशिष रेडिज्, क्रिकेट प्रशिक्षक संजय गायतोंडे, संदीप विचारे आणि दिपेन पारेख यांचे सहकार्य लाभले आहे.

अ गट: महाराष्ट्र यंग, स्पोर्टिंग युनियन, बोरीवली क्रिकेट क्लब, साईनाथ स्पोर्ट्स.

ब गट: जे भटिया सी. सी., भामा सी. सी., डॅशिंग स्पोर्ट्स, एस.आर.जी.स्पोर्ट्स ऑफिशियल.

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content