Homeहेल्थ इज वेल्थमुंबईत यंदापासून सुरू...

मुंबईत यंदापासून सुरू होणार आणखी एक वैद्यकीय महाविद्यालय

मुंबईत आणखी एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे. गोकुळदास तेजपाल रुग्णालय आणि कामा रुग्णालय, मुंबई येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येत्या शैत्रणिक वर्षापासून म्हणजेच २०२४-२५ पासून ५० विद्यार्थी प्रवेशसंख्येचे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल विधानसभेत एका निवेदनाद्वारे दिली. मुंबईत सध्या जे.जे. हॉस्पिटलमध्ये राज्य शासनाचे वैद्यकीय महाविद्यालय चालविले जाते.

गोकुळदास तेजपाल रुग्णालय आणि कामा रुग्णालय, मुंबई येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याबाबतचा शासन निर्णय ३१ जानेवारी २०१२ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वीत करण्याच्यादृष्टीने त्याबाबतची प्रशासकीय कार्यवाही व

कागदपत्रांच्या पूर्ततेचे निकष पूर्ण करण्यात आले आहेत. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यास अनुमती दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुढील शैक्षणिक वर्षापासून ही विद्यार्थीसंख्या वाढविण्यात येईल. नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोकुळदास तेजपाल रुग्णालय व कामा रुग्णालयांशी संलग्न असेल. त्यामुळे डॉक्टरांची संख्या वाढून दक्षिण मुंबईतील जनतेला रुग्णसेवा तत्काळ उपलब्ध होण्यास मदत होईल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबाबतीत पुढाकार घेऊन सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यामुळे सर्व विभागाच्या समन्वयातून हे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वीत करण्यात येत असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content