Monday, July 1, 2024
Homeबॅक पेजमुंबईतल्या सम्शानभूमीत पर्यावरणपूरक...

मुंबईतल्या सम्शानभूमीत पर्यावरणपूरक लाकडी दहन यंत्रणा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबईतल्या स्मशानभूमीत आता विद्युत आणि गॅस दाहिनींबरोबरच पर्यावरणपूक लाकडी दहन यंत्रणेचा (Eco – Friendly Pyre creation system technology) वापर करण्यात येणार आहे. मुंबई शहर आणि पूर्व–पश्चिम उपनगरात ९ ठिकाणी हे तंत्रज्ञान पालिकेमार्फत वापरण्यात येणार आहे. पर्यावरणाचा ऱ्हास टाळतानाच वायू प्रदूषण टाळण्यासाठी या पद्धतीचा वापर उपयुक्त ठरणार आहे.

वायू प्रदुषणाची पातळी कमी करण्यासाठीचे पाऊल म्हणून पर्यावरणपूरक लाकडी दहन यंत्रणेचा वापर संपूर्ण मुंबई महानगरामध्ये करण्याचे निर्देश पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले होते. त्यानुसार मुंबई शहर आणि उपनगरात असे मिळून नऊ ठिकाणी पर्यावरणपूरक लाकडी दहन यंत्रणेचा वापर करण्यात येत आहे.

मुंबई शहरात भोईवाडा, गोवारी (वडाळा), वैंकुठधाम (रे रोड) तसेच पूर्व उपनगरामध्ये टागोर नगर (विक्रोळी), देवनार कॉलनी (गोवंडी), अमरधाम पोस्टल कॉलनी (चेंबूर) आणि पश्चिम उपनगरामध्ये बाभई (बोरिवली), ओशिवरा, शिवधाम (गोरेगाव) आदी नऊ ठिकाणी स्मशानभूमीत पर्यावरणपूरक लाकडी दहन यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे.

सध्या मुंबईतील विविध स्मशानभूमीच्या ठिकाणी लाकडी चिता, विद्युत दाहिनी आणि गॅस शवदाहिनीचा वापर मृतदेहाच्या दहनासाठी करण्यात येतो. सद्यस्थितीत १० स्मशानभूमींमध्ये विद्युत दाहिनी आणि १८ स्मशानभूमीच्या ठिकाणी गॅस शवदाहिनी बसविली आहे. आता ९ लाकडी दाहिनीच्या ठिकाणी पर्यावरणपूरक लाकडी दहन यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे. याआधी २०२० साली शीव येथील स्मशानभूमीत लाकडी दहन यंत्रणेचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला होता. त्यानंतर नऊ ठिकाणी ही पद्धती अंमलात आणण्याची प्रक्रिया पालिकेच्या यांत्रिकी आणि विद्युत विभागामार्फत सुरू आहे. मृतदेहाच्या दहनासाठी लाकडाएवजी पर्यायी इंधन म्हणून ब्रिकेट्स / पॅलेट्स बायोमासचा वापर करण्यासाठी १४ स्मशानभूमी निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास टाळतानाच वायू प्रदुषण टाळण्यासाठीही मदत होत आहे. 

काय आहे पर्यावरणपूरक लाकडी दहन यंत्रणा?

मृतदेहाच्या दहनासाठी कम्बशन चेंबरचा वापर करण्यात येतो. तसेच दाहिनीच्या भट्टीच्या विशिष्ट रचनेमुळे कमीतकमी लाकडांचा वापर दहनाच्या प्रक्रियेत होतो. परिणामी प्रदूषणात घट करण्यासाठी मदत होते. प्रत्येत मृतदेहाच्या दहनासाठी लागणाऱ्या ३५० किलो ते ४०० किलो लाकडांच्या तुलनेत १०० ते १२५ किलो इतक्या लाकडाचा वापर करण्यात येतो. त्यामुळे सरासरी २५० किलो इतक्या लाकडाची बचत प्रत्येक दहनाच्या प्रक्रियेत होणार आहे. परिणामी कार्बन उर्त्सजनाचे प्रमाणही कमी होण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त आहे. पर्यावरणपूरक आणि वैज्ञानिक पद्धतीवर आधारित अशी अद्ययावत स्वरूपाची लाकडी दहन यंत्रणा जरी तयार करण्यात आलेली असली, तरीही धार्मिक विधींचा विचारही या संरचनेत करण्यात आला आहे. ट्रॉलीच्या बाहेरील बाजूच्या सुविधेमुळे अतिशय सोप्या पद्धतीने धार्मिक विधी करणे शक्य आहे.

ऊर्जा वहनासाठी तसेच कमीतकमी धूर पर्यावरणात चिमणीतून जाईल अशा पद्धतीची रचना दहन यंत्रणेसाठी करण्यात आली आहे. विशिष्ट व्यवस्थेमुळे कमीतकमी धूर निर्माण होतो. वॉटर स्क्रबर आणि सायक्लोनिक सेपरेटरमध्ये वायू प्रदूषकांमधील कण व विषारी वायू काढून टाकले जातात. या प्रक्रियेनंतर निर्माण झालेली हवा ३० मीटर उंच चिमणीमधून हवेत सोडली जाते. मुंबईतील ९ ठिकाणी या यंत्रणेच्या अंमलबजावणीनंतर सध्याचे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे.

Continue reading

लष्करप्रमुख मनोज पांडे सेवानिवृत्त

लष्करातील आपल्या चार दशकांहून अधिक काळच्या सेवेनंतर लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे काल सेवानिवृत्त झाले. त्यांचा कार्यकाळ उच्चस्तरीय युद्धसज्जता, परिवर्तनाच्या प्रक्रियेला चालना देण्याबरोबरच आत्मनिर्भरता उपक्रमाचे बळकटीकरण करण्यासाठी स्मरणात राहील. लष्करप्रमुख म्हणून जनरल मनोज पांडे यांनी उत्तर आणि पश्चिम सीमेवर सैन्य परिचालन तयारीला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांनी...

जनरल उपेंद्र द्विवेदी भारताचे नवे लष्करप्रमुख!

जनरल उपेंद्र द्विवेदी, पीव्हीएसएम, एव्हीएसएम आता भारताचे नवे लष्करप्रमुख झाले. काल त्यांनी जनरल मनोज पांडे, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम, एडीसी यांच्याकडून 30वे लष्करप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. जनरल मनोज पांडे काल 30 जून 2024 रोजी चार दशकांहून अधिक काळ देशसेवा केल्यानंतर सेवानिवृत्त झाले. जनरल उपेंद्र द्विवेदी एक कुशल लष्करी अधिकारी असून त्यांनी सशस्त्र...

तंबाखूच्या जादा उत्पादनावरील दंड होणार माफ?

तंबाखू मंडळातील कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे तसेच शेतकऱ्यांनी यावर्षी उत्पादित केलेल्या अतिरिक्त तंबाखूवरील दंड माफ करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी दिले. शनिवारी गोयल यांनी हैदराबादमधील शमशाबाद येथील नोवोटेल येथे...
error: Content is protected !!