Homeपब्लिक फिगरकरवीरचे आमदार पी....

करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांचे निधन

कोल्हापूरच्या करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील यांचे आज मेंदूतल्या रक्तस्त्रावाने आज निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वीच ते पाय घसरून पडले होते. या अपघातात त्यांच्या मेंदूला इजा झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली.

पी. एन. पाटील यांनी तरुण वयापासून काँग्रेसच्या माध्यमातून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. शेवटच्या श्वासापर्यंत ते काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले. कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी २२ वर्षे कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसची पक्षसंघटना वाढवण्याचे काम केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी पक्षवाढीत मोठे योगदान दिले होते. ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी होते.

जिल्हा बँकेचे संचालक आणि अध्यक्ष,गोकुळ दूध संघाचे संचालक म्हणून त्यांनी जिल्ह्याच्या सहकार आणि कृषी क्षेत्रात भरीव कार्य केले. सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील. पी. एन. पाटील हे कार्यकर्ते आणि जनतेमध्ये रमणारे नेते होते. प्रत्येकाच्या अडचणीच्यावेळी हाकेला धावून जाणारे अशी त्यांची ओळख होती. त्यांनी कायमच सर्वसामन्य माणूस केंद्रबिंदू माणून राजकारण केले. राजकारणासोबतच, कृषी, सहकार, शिक्षण व क्रीडा क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले. त्यांच्या निधनामुळे कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा भावना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.

Continue reading

आयडियल मोफत कबड्डी स्पर्धात्मक शिबिरात ४० खेळाडू

मुंबईच्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे यंग स्पोर्ट्स क्लब-घाटकोपर यांच्या सहकार्याने शालेय मुलांसाठी मोफत कबड्डी स्पर्धात्मक मार्गदर्शन शिबीर येत्या २७ एप्रिलपासून माणिकलाल मैदान, घाटकोपर येथे सुरु होत असून त्यात शालेय ४० खेळाडू सहभागी झाले आहेत. नवोदित खेळाडूंना तंत्रशुद्ध कबड्डी खेळाची प्राथमिक...

उत्तर प्रदेशातले शेखा झील पक्षी अभयारण्य झाले ‘रामसर स्थळ’!

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे. उत्तर प्रदेशात ही संख्या 12पर्यंत पोहोचली आहे. “उत्तर प्रदेशने हा...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...
Skip to content