Homeचिट चॅटउद्यापासून बोरीवलीत घ्या...

उद्यापासून बोरीवलीत घ्या साहित्यिक मेजवानी

मुंबई, महाराष्ट्रातील लोकशाहीचा उत्सव संपताच उद्यापासून म्हणजेच मंगळवार, २१ मे २०२४पासून मुंबईतल्या बोरीवलीतल्या जय महाराष्ट्र नगर येथे ही वसंत व्याख्यानमाला सुरु होत आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ४१ वर्षांपासून सुरु असलेल्या या वसंत व्याख्यानमालेचे यंदा ४२वे वर्ष आहे.

एक संध्याकाळ शाहीरांसमवेत या नामाभिधानाने वसंत व्याख्यानमालेचे मंगळवारी, २१ मे २०२४ रोजी सायंकाळी पहिले पुष्प गुंफताना लोककलेचे गाढे अभ्यासक, मुंबई विद्यापीठाच्या शाहीर अमर शेख अध्यासनाचे प्रमुख डॉ. ‌गणेश चंदनशिवे आणि त्यांचे सहकारी पोवाडे सादर करतील. बुधवार, २२ मे २०२४ रोजी ‘मी भारतीय’ या विषयावर पुण्याचे रवींद्र देवधर हे दीर्घांक सादर करुन आपण सारे भारतीय आहोत ही त्यांची संकल्पना मांडतील. गुरुवार, २३ मे २०२४ रोजी चॉकलेट हिरो देव आनंद, ही संकल्पना घेऊन ख्यातनाम चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर देव आनंद यांच्या सदाबहार अभिनेत्याच्या आठवणी, किस्से आपल्या खुमासदार शैलीत रसिक प्रेक्षकांसमोर सादर करतील तर संगीत संयोजक संतोष पिसाट आणि प्रमोद कुंभार हे देव आनंद यांच्या गाजलेल्या चित्रपटांतील निवडक गाणी सादर करतील.

शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी आपल्या आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड या राजधानीवर तब्बल पाचशे वेळा जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राचा खराखुरा परिचय शिवभक्तांना करुन देत एक ऐतिहासिक विक्रम पूर्ण केला आहे. या त्यांच्या रायगड दर्शन @५००निमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी शुक्रवार, २४ मे २०२४ रोजी त्यांच्या विशेष प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

विजय वैद्य आणि प्रा. नयना रेगे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा ही वसंत व्याख्यानमाला ४२ वर्षांची होत आहे. हे औचित्य साधून शनिवार, २५ मे २०२४ रोजी प्रख्यात सुसंवादिनी मंगला खाडिलकर या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी रसिक श्रोत्यांशी थेट संवाद साधतील.

रोज सायंकाळी ७.३० वाजता ही वसंत व्याख्यानमाला सुरु होणार असून रसिक प्रेक्षक, श्रोतृवृंदांनी वेळेपूर्वी आपापले स्थान ग्रहण करुन या बौद्धिक मेजवानीचा यथायोग्य लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content