Friday, October 18, 2024
Homeबॅक पेज१० वर्षांत मोदी...

१० वर्षांत मोदी सरकारने कामगारांना देशोधडीला लावले!

देशाच्या प्रगतीत शेतकरी व कामगारांचा मोठा वाटा आहे. कामगारशक्तीच्या जोरावरच देशाने प्रगती केली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्या सरकारने कामगारहिताचे कायदे केले, कामगारांना संरक्षण दिले. परंतु मागील १० वर्षांतील नरेंद्र मोदी सरकाने मात्र कामगारहिताचे कायदे बदलून उद्योगपतीधार्जिणे कायदे बनवले व कामगारांना देशोधडीला लावले, असा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला.

प्रदेश काँग्रेसचे मुंबई कार्यालय, टिळक भवन येथे आज राष्ट्रीय मजदूर काँग्रेसचा (इंटक) मेळावा पार पडला. या मेळाव्यात ते बोलत होते. नरेंद्र मोदी सरकारच्या काळात लाखो कामगार देशोधडीला

लागले. छोटे, मध्यम उद्योग बंद पडले. मोदी सरकारला कामगारांची चिंता नाही. त्यांना चिंता आहे ती फक्त मुठभर उद्योगपतींची. महागाईचा सर्वात जास्त परिणाम कामगारांवर होतो. १० वर्षांत महागाई गगनाला भिडली. पण मोदी सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. मोदी सरकार शेतकरी, कामागार व गरिबांचे नाही तर मालकधार्जिणे सरकार आहे, असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने खोटे बोलत आहेत. मोदी खोट्यांचे सरदार आहेत. काँग्रेसच्या जाहिरनाम्याबद्दल अपप्रचार करत आहेत. १५ टक्के बजेट मुस्लिमांसाठी ठेवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता असा खोटा आरोप मोदींनी केला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव होत असल्याने नरेंद्र मोदींचा भ्रमनिरास झाला आहे. या निराशेतून ते काहीही बोलत आहेत. लोकसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून कामगारांनी इंडिया आघाडीचे उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही चेन्नीथला यांनी केले.

या मेळाव्याला प्रभारी रमेश चेन्नीथला, शिवसेना नेते व आमदार सचिन अहिर, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, इंटकचे प्रदेशाध्यक्ष कैलास कदम, गोविंदराव मोहिते, दिवाकर दळवी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या समन्वयक प्रगती अहिर व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Continue reading

यंदाची विधानसभा निवडणूक बिनचेहऱ्याची!

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि सर्वच राजकीय पक्षांमध्ये लगीनघाई सुरू झाली. राज्यातल्या सत्तारूढ महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद झाली. मंगळवारी होणारी ही पत्रकार परिषद देशाच्या मुख्य निवडणूक...

उत्तर प्रदेशात एन्काऊंटरचे सत्र सुरूच!

उत्तर प्रदेशमध्ये संशयित आरोपीचा एन्काऊंटर (पोलीस चकमक) करण्याचे सत्र अजूनही चालूच आहे. आज बेहराईचमधल्या रामगोपाल मिश्रा यांच्या हत्त्येतल्या दोघा संशयित आरोपींबरोबर पोलिसांची चकमक झाली. त्यात सर्फराज आणि तालीब, हे दोन आरोपी जखमी झाल्याचे समजते. गेल्या ७ वर्षांत उत्तर प्रदेशात...

प्रेम, नुकसान आणि उपचार म्हणजेच जिंदगीनामा!

जिंदगीनामा, सोनी लिव्हवरील सहा भागांचा काव्यसंग्रह, शक्तिशाली कथनातून मानसिक आरोग्याच्या गुंतागुंतीचा शोध घेतो, ज्यातील प्रत्येक अद्वितीय आव्हाने हाताळते. मालिका सहानुभूती वाढवण्याचा आणि अनेकदा न बोललेल्या विषयांबद्दल संभाषण वाढवण्याचा प्रयत्न करते. प्रिया बापटसाठी, हा प्रकल्प फक्त दुसऱ्या भूमिकेपेक्षा अधिक होता–...
Skip to content