Homeपब्लिक फिगरगेली ५ वर्षे...

गेली ५ वर्षे तो फक्त शूटिंगला गेला..

मागील खासदारामुळे पाच वर्षे वाया गेली. तो फक्त शूटिंगला गेला. मतदारसंघातील रस्ते, धरणे, रेल्वे असे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपल्याला केंद्राची, राज्याची मदत लागणार आहे. त्यामुळे काम करणारा माणूस म्हणून आढळराव पाटलांना निवडून द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल केले.

महायुतीचे शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ घोडेगाव येथे आयोजित प्रचारसभेत अजित पवार बोलत होते. शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शाह, शिवसेना उपनेते इरफान सय्यद, भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख जयसिंग एरंडे, जिल्हा पदाधिकारी भानुदास काळे, तालुका अध्यक्ष संदीप बाणखेले, उपाध्यक्ष राजेश काळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, अरुण गिरे, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष विष्णूकाका हिंगे, युवक अध्यक्ष निलेश थोरात, पंचायत समिती माजी सभापती कैलासबुवा काळे, नंदकुमार सोनवले, बाजार समिती संचालक सोमनाथ काळे, पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले, सरपंच अश्विनी तिटकारे, माजी सरपंच क्रांती गाढवे,उपसरपंच कपील सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते.

जुलैमध्ये आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये सामील झालो. त्यामुळे आंबेगावात ६०० कोटींची कामे मार्गी लावता आली. ८ दिवसांत हिरड्याच्या नुकसानीची १७ कोटींची भरपाई दिली. जिल्हा नियोजनमधून आंबेगावसाठी ६८ कोटी रुपये निधी दिला. सत्तेशिवाय काही उपयोग नाही. आम्ही जर सत्तेत नसतो तर ही कामे झाली असती का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कांदा निर्यातबंदी उठविण्याचा प्रश्न आम्ही सर्वांनी एकत्रित असल्याने मार्गी लावला. दुधाच्या दरवाढीचा प्रश्न आता सुटेल. सत्तेत राहिलो तर विकासकामे मार्गी लागणार आहेत, हे पक्कं ध्यानात ठेवा आणि आढळरावांना निवडून द्या, असेही अजितदादा म्हणाले.

खेड आंबेगावची कामे मार्गी लावणार..

कळमोडी धरण, चासकमान धरणांचे प्रलंबित प्रश्न अल्पसंख्यांकांचे वक्क बोर्डाचे प्रश्न, हरिश्चंद्र देवस्थानचा विकास, पीर देवस्थानचा विकास अशी विविध कामे मार्गी लावायची आहेत. हे सर्व करण्यासाठी दिलीप वळसे पाटील, आढळराव हे आहेतच. त्यांना निधी देण्याचं काम आम्ही करणार. कुठेही निधीची कमतरता पडून देणार नाही, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.

आढळराव पाटील म्हणाले की, समोरचा उमेदवार म्हणतो बैलगाड्याचा प्रश्न, रेल्वेचा प्रश्न मी मार्गी लावला. मधु दंडवतेंना कोकण रेल्वे प्रत्यक्षात आणायला २८ वर्षे लागली. मी पुणे-नाशिक रेल्वेसाठी १३ वर्षे पाठपुरावा करतोय. बैलगाडा सुरु करण्यासाठी २५ ते ३० वर्षे मी लढतोय. ३ केसेस अंगावर घेतल्या. हायकोर्ट सुप्रिम कोर्टांपर्यंत लढलो. पैसे खर्च केले आणि बैलगाड्याचा लढा जिंकला. समोरच्या महाभागाने पाच वर्षे काय केले?,

बनकरफाटा-घोडेगाव-भिमाशंकर-तळेघर-राजगुरुनगर या रस्त्याचा प्रश्न नितीन गडकरींच्या माध्यमातून मार्गस्थ केला. वाडा घोडा रस्त्याला अडीच कोटी निधी दिला. संभाजी महाराजांच्या वढू येथील स्मारकाचं १९० कोटींतून काम सुरु झालं. कोल्हे खासदार असताना त्यांनी त्यांच्या कोपरे दत्तक गावाला पाने पुसली. तेथील महिलांना २ ते अडीच किमी पायपीट करुन पाणी आणायला लागत असताना, माझ्या संस्था आणि कार्यकर्त्यांकडून २ महिन्यापासून टॅंकर सुरु आहेत. त्यामुळे कोणतेही काम न करता, आरोप करणाऱ्या निष्क्रीय खासदाराला त्याची जागा दाखवा. मोदींचे हात बळकट करण्यासाठी मला निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.

Continue reading

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...
Skip to content